शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

अमरावतीची भेंडी होणार आखाती देशात निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:37 IST

शेतातून थेट वाहनाद्वारे नागपूर विमानतळावर पोहचविण्यात येईल.

अनिल कडू/परतवाडा : अमरावतीच्या अचलपूर येथील भेंडी आता आखाती देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी शेतातून तोडलेली भेंडी बहारिन येथे विमानाने पाठवण्यात येईल. त्यानंतर ती लगेचच स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होईल. 

ईवा नामक निर्यातदार कंपनी ही भेंडी बहारिनमध्ये पाठवणार आहे. ईवाचे संदीप चव्हाण, कृषी समृद्धी उत्पादक कंपनीचे रविकिरण पाटील, अचलपूरचे युवा शेतकरी रितेश पोटे, रुपेश उल्हे, राहुल ठाकरे, आशिष पोटे, वसंत सातरोटे, प्रवीण केदार, राहुल रेखाते यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी अभिजित बांगर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या मार्गदर्शनात हा पहिलाच प्रयोग राबविण्यात येत आहे. अचलपूर तालुक्यातील १६ शेतकरी भेंडी निर्यात करणार आहेत. आठवड्यातून पाच दिवस उपलब्धतेनुसार दररोज पाचशे ते हजार किलो भेंडी पाच-पाच किलोच्या बॉक्समध्ये शेतकºयांच्या शेतावरच पॅक केली जाणार आहे. शेतातून थेट वाहनाद्वारे नागपूर विमानतळावर पोहचविण्यात येईल. सायंकाळी ५.३० च्या विमानाने ती त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता बहरिनच्या मार्केटमध्ये दाखल होणार आहे. अचलपूरची ही भेंडी खाण्यायोग्य असून, आवश्यक सर्व चाचण्यांमध्ये ती उत्तीर्ण झाली आहे. गुरूवार ३१ मे रोजी अचलपूर शहरातील बीलनपुरा निवासी ललित शामराव कपले यांच्या शेतातील भेंडी निर्यात केली जाणार आहे. शेतकºयाला शेतातच २५ रुपये किलोप्रमाणे भेंडीचा भाव दिला जाणार आहे. यात अमरावती जिल्हा फळे व निर्यातदार संघाची भूमिका महत्त्वाची आहे. यात या पहिल्याच उपक्रमातून पाठविल्या जाणाºया भेंडीच्या वाहनाला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविणार आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती