शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

अमरावतीची भेंडी होणार आखाती देशात निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:37 IST

शेतातून थेट वाहनाद्वारे नागपूर विमानतळावर पोहचविण्यात येईल.

अनिल कडू/परतवाडा : अमरावतीच्या अचलपूर येथील भेंडी आता आखाती देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी शेतातून तोडलेली भेंडी बहारिन येथे विमानाने पाठवण्यात येईल. त्यानंतर ती लगेचच स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होईल. 

ईवा नामक निर्यातदार कंपनी ही भेंडी बहारिनमध्ये पाठवणार आहे. ईवाचे संदीप चव्हाण, कृषी समृद्धी उत्पादक कंपनीचे रविकिरण पाटील, अचलपूरचे युवा शेतकरी रितेश पोटे, रुपेश उल्हे, राहुल ठाकरे, आशिष पोटे, वसंत सातरोटे, प्रवीण केदार, राहुल रेखाते यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी अभिजित बांगर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या मार्गदर्शनात हा पहिलाच प्रयोग राबविण्यात येत आहे. अचलपूर तालुक्यातील १६ शेतकरी भेंडी निर्यात करणार आहेत. आठवड्यातून पाच दिवस उपलब्धतेनुसार दररोज पाचशे ते हजार किलो भेंडी पाच-पाच किलोच्या बॉक्समध्ये शेतकºयांच्या शेतावरच पॅक केली जाणार आहे. शेतातून थेट वाहनाद्वारे नागपूर विमानतळावर पोहचविण्यात येईल. सायंकाळी ५.३० च्या विमानाने ती त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता बहरिनच्या मार्केटमध्ये दाखल होणार आहे. अचलपूरची ही भेंडी खाण्यायोग्य असून, आवश्यक सर्व चाचण्यांमध्ये ती उत्तीर्ण झाली आहे. गुरूवार ३१ मे रोजी अचलपूर शहरातील बीलनपुरा निवासी ललित शामराव कपले यांच्या शेतातील भेंडी निर्यात केली जाणार आहे. शेतकºयाला शेतातच २५ रुपये किलोप्रमाणे भेंडीचा भाव दिला जाणार आहे. यात अमरावती जिल्हा फळे व निर्यातदार संघाची भूमिका महत्त्वाची आहे. यात या पहिल्याच उपक्रमातून पाठविल्या जाणाºया भेंडीच्या वाहनाला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविणार आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती