शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

'आधीच अडीच वर्षे राज्याचे नुकसान झालंय', नवनीत राणांची दोन्ही नेत्यांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 15:40 IST

अमरावती - अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला पोहचला आहे. विशेष म्हणजे ...

अमरावती - अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला पोहचला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. तरीही, राणा विरुद्ध कडू यांच्यातील वाद पुन्हा समोर आला आहे. बच्चू कडूंनी जाहीर सभेतून टीका केल्यानंतर राणांनीही दम भरला. त्यानंतर, आमदार रवि राणा यांनीही प्रत्युत्तर देत बच्चू कडूंना थेट आव्हान दिलं. त्यामुळे, पुन्हा एकदा दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी आता प्रथमच खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केलं आहे.  

राणा विरुद्ध कडू यांच्यातील वादावर खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. रवी राणा व बच्चू कडू यांना दोघांनाही त्यांनी विनंती केली आहे, ''आधीच अडीच वर्ष राज्याचे नुकसान झाले आहे, आता सक्षम सरकार आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे दोघांनी एकत्रित यायला पाहिजे, आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावा. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपले मतभेद बाजूला ठेवा,'' अशी विनंती नवनीत राणा यांनी दोघांना केली. पती रवि राणा यांनाही एकप्रकारे त्यांनी आवाहनच केलं आहे. त्यामुळे, लवकरच या वादावर आता पडद पडण्याची शक्यता आहे.        

काय म्हणाले बच्चू कड़ू

रवि राणा यांच्यासोबतच्या वादावर बोलताना कडू म्हणाले की, माध्यमांनी हा वाद वाढवू नये, सभेत मी शाळांबाबत चांगलं बोललो होतो, ते नाही दाखवलं पण वादाचं तेवढं दाखवलं. आमच्याकडून हा वाद नाही थांबला, तर मीडियाने थांबवलं पाहिजे. मीडियाने चांगले विषय घ्यावेत, असेही कडू यांनी म्हटले. मी राणांचे आभार मानले, ते दोन पावलं मागे येत असतील तर मी ४ पाऊलं मागे येईल, असेही मी सभेत बोललो. मी आत्ता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जात आहे. माझ्या मतदारसंघातील प्रकल्पाला सुप्रिमा दिली. त्यामुळे, मतदारसंघातील २० हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानायला जात आहे, असेही कडू यांनी म्हटले. 

राणा हा विषय नॉर्मल आहे, मी काही चौथ्या वर्गातील विद्यार्थी नाही. त्याने दिलगिरी व्यक्त केली, मीही आभार मानले, आता हा विषय संपल्याचे कडू यांनी म्हटले. त्यानंतर, राणा यांनी केलेल्या विधानासंदर्भात बोलताना, ते म्हणाले मी फूल घेऊन येतो, मी म्हणतो त्यांनी तलवार घेऊन यावे. ५ आणि ६ तारखेला मी घरीच आहे. त्यांनी कोणते कोणते तुकडे पाहिजे माझे, हात पाहिजे की पाय. माझं मुंडकं पाहिजे असेल तर तिथं कापावं मला, अशा शब्दात कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाले होते रवी राणा?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे बच्चू कडू यांच्यासोबतचा वाद मिटला आहे. पण लक्षात घ्या, कुणी मला दम देत असेल तर रवी राणाने उद्धव ठाकरेंचाही दम खाल्ला नाही. बच्चू कडू काहीच नाही. जर कडू दम देत बोलत असेल तर कुठल्याही स्तरावर मी उत्तर देईन. तो ज्या स्तरावर बोलेल त्यावर उत्तर देईन. प्रेमाच्या भाषेपुढे रवी राणा एकदा नाही तर दहावेळा झुकेल. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायचीही हिंमत आहे असा इशारा आमदार रवी राणांनी दिला होता.  

त्याचसोबत मंत्री बनणं हा माझा अधिकार नाही. माझे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान ठेवत मी २ पाऊलं मागे आलो. दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यात कुणाचेही मन दुखायला नको म्हणून मी तो विषय तिथेच संपवला. पण वारंवार मला कुणी दम देत असेल मी रवी राणाला माफ करणार नाही म्हटलं. तुला कुणी सांगितले माफ करायला? तुझ्यात जेवढी हिंमत असेल तू कसा निवडून येतो पाहा. वेळ सांगेल बच्चू कडू पुन्हा आमदार निवडून येतो की नाही असंही रवी राणांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा