शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी द्या
By Admin | Updated: August 4, 2015 00:10 IST2015-08-04T00:10:07+5:302015-08-04T00:10:07+5:30
स्थानिक नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना रतन इंडिया कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करुन द्यावा, ..

शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी द्या
निवेदन : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अमरावती : स्थानिक नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना रतन इंडिया कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे केली आहे.
नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीसाठी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कौडीमोल भावाने संपादित करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून कमाविलेली ही जमीन तुटपुंज्या भावाने शासनाने ताब्यात घेतली आहे. अशातच १५ गावांमधील प्रकल्पग्रस्त शेतकरी जमीन गेल्यामुळे भूमिहीन झाले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू केलेल्या रतन इंडिया या कंपनीत प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. आतापर्यंत रोजगार देण्याचे आश्वासन वेळोवेळी प्रशासनामार्फत कंपनीने दिले आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे न्याय मिळत नसेल तर किमान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी तरी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना करण्यात आली आहे.
निवेदन देतेवळी प्रवीण मनोहर, प्रभाकर तायडे, ज्ञानेश्वर इंगोले, हाफिजा बी मो नजीर, उषा चांदूरे, श्यामराव पाचघरे, रामदास दिवटे, ओंकार नाईक, रमेश गायकवाड व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.