शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

मंगल कार्यालय, लॉन्सला क्षमतेनुसार ५० टक्क्यांची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:13 IST

कलावंताची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. ...

कलावंताची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्हाभरातील मंगल कार्यालय, लॉन्स, हाॅल येथे कार्यक्रमालाही मनाई करण्यात आला. परिणामी यावर आधारित घटकांचा विचार करता त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालये, हॉल, लाॅन्स आदींना क्षमतेनुसार ५० टक्के लोकांच्या उपस्थितीची परवागी द्यावी, अशी मागणी गुरुवारी आर्टिक्ट वेलफेअर सोसायटी अंतर्गत संगीत कलावंत, मंगल कार्यालय संचालक, साऊंड सिस्टीम, कॅटरर्स चालकांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

गत मार्च वर्षापासून कोरोना संकट सर्वत्र ओढवले आहे. याची जाणही सर्वांना आहेच. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्हाभरातील कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे मंगलकार्यालय, हॉल, लॉन्स आदी ठिकाणी लग्न समारंभ कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे. परिणामी यावर आधारित असलेले संगीत कलावंत व अन्य घटकांचा रोजगार बंद असल्यामुळे या घटकातील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हॉटेल्स, मॉल, एसटी बसेस यांना ज्याप्रमाणे मुभा देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर लग्न समारंभाच्या कार्यक्रमासही आसन क्षमतेनुसार ५० टक्के लोकांच्या उपस्थितीची परवागी द्यावी, अशी मागणी कलावंत शैलेश शिरभाते, मनीष आत्राम, वीरेंद्र गावंडे, सुधीर वानखडे, शुभम मानकर, मनीष उमेकर, सोमेश्र्वर हरले, आकाश सारवान, विक्रम धिमान, प्रशांत ठाकरे, रामकुमार धामंदे, रामेश्र्वर काळे, सविता पडोळे, शीतल तायडे, अंजली ठाकरे, पिंटू बोके, कमलेश बिजोर, विशाल पांडे, राजकुमार निभोंकर, योगेश चौधरी, संदीप चावरे आदींनी केली आहे.