शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण

By गणेश वासनिक | Updated: March 28, 2024 23:20 IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी झाल्या ताज्या; शिवसेनेचा मुंबईनंतर अमरावतीत विस्तारावर भर, गाव-खेड्यात शाखांचे जाळे

अमरावती: अमरावती जिल्हा आणि शिवसेना हे फार जुनी नाते आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आजोळ हे अचलपूर होते. त्यांनी अचलपुरात बालपणदेखील घालविले आहे. त्यामुळे शिवसेनेची मुंबईत स्थापना झाल्यानंतर अमरावतीत मोठ्या प्रमाणात शाखा स्थापन करून विस्तार त्यांनी केला होता. १९९१ ते २०१९ या दरम्यान अमरावती लोकसभेत शिवसेनेचा उमेदवार रिंगणात होता. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून शिवसेनेचा उमेदवार नाही, हे वास्तव आहे.

राज्यात १९९५ मध्ये भाजप-सेना युती झाल्यानंतर अमरावती लाेकसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. १९९९ पर्यंत सलग सेनेचा उमेदवार अमरावतीच्या रिंगणात कायम होता. मात्र खासदार नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा १९९९ मध्ये पराभव केला. त्यानंतर राज्यात शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने उद्वव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून शिवसेना फोडली. भाजपच्या मदतीने शिंदे मुख्यमंत्री झालेत. आमदार-खासदारांना उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे केले आणि आता धनुष्यबाण,शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक आयोगाने सोपविला आहे. राजकीय परिस्थिती बदलताच भाजपने अमरावती लोकसभा मतदार संघ आपल्या तंबूत खेचला असून, अपक्ष खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी घोषित केली आहे. तूर्तास काँग्रेस आणि भाजप यांच्यात काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. भाजप-सेना युतीमध्ये अमरावती लोकसभा मतदार संघ हा परंपरागत शिवसेनेच्या वाट्याला यायचा. मात्र यंदा पहिल्यांदाच अमरावती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून शिवसेना हे नाव बाद झाल्याबाबतचे शल्य जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्यांना बनवले आमदार, खासदार

मुंबईत शिवसेनेची पायेमुळे रोवली जात असताना बाळासाहेब ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यात शिवसेनेच्या विस्ताराला प्राधान्य दिले.कोणताही राजकीय लवलेश नसलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना खासदार, आमदार बनविले. ही जादू केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवसेनेत अनुभवता आली. १९९५ मध्ये ज्ञानेश्वर धाने पाटील (बडनेरा), प्रकाश भारसाकडे (दर्यापूर), संजय बंड (वलगाव)विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते. तर १९९१ ते २००९ या कालावधीत अनंत गुढे तर २००९ते २०१४ या दरम्यान आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे खासदार होते.

ठाकरे कुटुंबीयांचे अमरावतीशी जवळीक

शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांची अमरावतीशी फार जवळीक आहे. लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बाळासाहेब ठाकरे हे अमरावतीत प्रचारसभेसाठी याचचे. येथील सायन्सस्कोर मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांचे वेगळ्या शैलीतील भाषण जणू शिवसैनिकांसाठी प्रबोधन ठरत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अमरावतीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा गाजवल्या आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे