शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याला मारहाण करून विष्ठा खाण्यास भाग पाडले; अमरावती जिल्ह्यातील संतापजनक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 16:42 IST

तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली.

ठळक मुद्देपहिल्यांदा २६९, २७० कलमान्वये गुन्हा

अमरावती : पूर्व वैमनस्यातून एका ४५ वर्षीय व्यक्तीला चक्क मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडण्यात आले. वरूड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे २६ मे रोजी दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी बबन आत्माराम बुरंगे (६०), सुरेश आत्मारामजी बुरंगे (५०), भूषण बबन बुरंगे (३२) व राजेंद्र उर्फ राजा श्रीराम ठाकरे (५०, सर्व रा. नांदगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, नंदकुमार बुरंगे (४५) व आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात शेताच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून जुना वाद होता. दरम्यान, २६ मे रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास नंदकुमार बुरंगे हे शेतातून गावात येत असताना आरोपींची आणि त्यांची नजरानजर झाली. तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. याशिवाय भूषण बुरंगे व राजेंद्र ठाकरे यांनीदेखील आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे नंदकुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर भूषण बुरंगे याने राजेंद्र ठाकरे याला विष्ठा आणण्यास सांगितले. ती विष्ठा आरोपींनी माझ्या तोंडात कोंबली, ती खाण्यास भाग पाडले, अशी तक्रार नंदकुमार बुरंगे यांनी २ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नोंदविली. विशेष म्हणजे, यात कोरोना कलम म्हणून प्रसिद्ध भादंविचे कलम २६९, २७० त्यापश्चात पहिल्यांदाच यात वापरली आहे.

काय आहे कलम २६९, २७० ?

कलम २६९ म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी होणारी निष्काळजीपणाची कामे जी दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात आणू शकते आणि कलम २७० म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी केलेली प्राणघातक किंवा हानिकारक कृती ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात येते. हे दोन्ही कलमे भारतीय दंड संहितेच्या १४ व्या अध्यायांतर्गत आहेत, ज्यात सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा, आनंद, शिष्टाचार आणि नैतिकतेवर परिणाम करणारे गुन्हे समाविष्ट आहेत, तर आयपीसीच्या कलम २६९ अन्वये गुन्हेगारास सहा महिने किंवा दंड किंवा दोन्ही आणि कलम २७० अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

मानवी विष्ठा आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे या प्रकरणात कलम २६९, २७० नुसार गुन्हा दाखल करून चारही आरोपींना ताब्यात घेतले.

मिलिंद सरकटे, ठाणेदार, बेनोडा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीAmravatiअमरावती