शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याला मारहाण करून विष्ठा खाण्यास भाग पाडले; अमरावती जिल्ह्यातील संतापजनक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 16:42 IST

तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली.

ठळक मुद्देपहिल्यांदा २६९, २७० कलमान्वये गुन्हा

अमरावती : पूर्व वैमनस्यातून एका ४५ वर्षीय व्यक्तीला चक्क मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडण्यात आले. वरूड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे २६ मे रोजी दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी बबन आत्माराम बुरंगे (६०), सुरेश आत्मारामजी बुरंगे (५०), भूषण बबन बुरंगे (३२) व राजेंद्र उर्फ राजा श्रीराम ठाकरे (५०, सर्व रा. नांदगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, नंदकुमार बुरंगे (४५) व आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात शेताच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून जुना वाद होता. दरम्यान, २६ मे रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास नंदकुमार बुरंगे हे शेतातून गावात येत असताना आरोपींची आणि त्यांची नजरानजर झाली. तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. याशिवाय भूषण बुरंगे व राजेंद्र ठाकरे यांनीदेखील आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे नंदकुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर भूषण बुरंगे याने राजेंद्र ठाकरे याला विष्ठा आणण्यास सांगितले. ती विष्ठा आरोपींनी माझ्या तोंडात कोंबली, ती खाण्यास भाग पाडले, अशी तक्रार नंदकुमार बुरंगे यांनी २ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नोंदविली. विशेष म्हणजे, यात कोरोना कलम म्हणून प्रसिद्ध भादंविचे कलम २६९, २७० त्यापश्चात पहिल्यांदाच यात वापरली आहे.

काय आहे कलम २६९, २७० ?

कलम २६९ म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी होणारी निष्काळजीपणाची कामे जी दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात आणू शकते आणि कलम २७० म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी केलेली प्राणघातक किंवा हानिकारक कृती ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात येते. हे दोन्ही कलमे भारतीय दंड संहितेच्या १४ व्या अध्यायांतर्गत आहेत, ज्यात सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा, आनंद, शिष्टाचार आणि नैतिकतेवर परिणाम करणारे गुन्हे समाविष्ट आहेत, तर आयपीसीच्या कलम २६९ अन्वये गुन्हेगारास सहा महिने किंवा दंड किंवा दोन्ही आणि कलम २७० अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

मानवी विष्ठा आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे या प्रकरणात कलम २६९, २७० नुसार गुन्हा दाखल करून चारही आरोपींना ताब्यात घेतले.

मिलिंद सरकटे, ठाणेदार, बेनोडा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीAmravatiअमरावती