शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

शेतकऱ्याला मारहाण करून विष्ठा खाण्यास भाग पाडले; अमरावती जिल्ह्यातील संतापजनक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 16:42 IST

तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली.

ठळक मुद्देपहिल्यांदा २६९, २७० कलमान्वये गुन्हा

अमरावती : पूर्व वैमनस्यातून एका ४५ वर्षीय व्यक्तीला चक्क मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडण्यात आले. वरूड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे २६ मे रोजी दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी बबन आत्माराम बुरंगे (६०), सुरेश आत्मारामजी बुरंगे (५०), भूषण बबन बुरंगे (३२) व राजेंद्र उर्फ राजा श्रीराम ठाकरे (५०, सर्व रा. नांदगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, नंदकुमार बुरंगे (४५) व आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात शेताच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून जुना वाद होता. दरम्यान, २६ मे रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास नंदकुमार बुरंगे हे शेतातून गावात येत असताना आरोपींची आणि त्यांची नजरानजर झाली. तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. याशिवाय भूषण बुरंगे व राजेंद्र ठाकरे यांनीदेखील आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे नंदकुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर भूषण बुरंगे याने राजेंद्र ठाकरे याला विष्ठा आणण्यास सांगितले. ती विष्ठा आरोपींनी माझ्या तोंडात कोंबली, ती खाण्यास भाग पाडले, अशी तक्रार नंदकुमार बुरंगे यांनी २ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नोंदविली. विशेष म्हणजे, यात कोरोना कलम म्हणून प्रसिद्ध भादंविचे कलम २६९, २७० त्यापश्चात पहिल्यांदाच यात वापरली आहे.

काय आहे कलम २६९, २७० ?

कलम २६९ म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी होणारी निष्काळजीपणाची कामे जी दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात आणू शकते आणि कलम २७० म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी केलेली प्राणघातक किंवा हानिकारक कृती ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात येते. हे दोन्ही कलमे भारतीय दंड संहितेच्या १४ व्या अध्यायांतर्गत आहेत, ज्यात सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा, आनंद, शिष्टाचार आणि नैतिकतेवर परिणाम करणारे गुन्हे समाविष्ट आहेत, तर आयपीसीच्या कलम २६९ अन्वये गुन्हेगारास सहा महिने किंवा दंड किंवा दोन्ही आणि कलम २७० अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

मानवी विष्ठा आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे या प्रकरणात कलम २६९, २७० नुसार गुन्हा दाखल करून चारही आरोपींना ताब्यात घेतले.

मिलिंद सरकटे, ठाणेदार, बेनोडा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीAmravatiअमरावती