शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

८६९ कोरोनाचे नवे संक्रमित, १५ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST

अमरावती : एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाने कहर केला आहे. यात निरंतरपणे संक्रमित रुग्ण आणि मृत्युसंख्या वाढतच आहे. सोमवारी ...

अमरावती : एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाने कहर केला आहे. यात निरंतरपणे संक्रमित रुग्ण आणि मृत्युसंख्या वाढतच आहे. सोमवारी कोरोनाचे नवे ८६९ रुग्ण आढळून आले असून, १० अमरावती, तर पाच अन्य जिल्ह्यांतील असे एकूण १५ रुग्ण उपचार करताना दगावले. आतापर्यंत कोराेनाने ८८८ जणांना प्राण गमवावा लागला.

धानोडी (ता. वरूड) येथील ६५ वर्षीय पुरुष, सामरानगर (अमरावती) येथील ८० वर्षीय महिला, अंबिकानगर (अमरावती) येथील ३१ वर्षीय महिला, कळमगाव (ता. चांदूर रेल्वे) येथील ५९ वर्षीय पुरुष, बाभूळगाव कोळी येथील ६० वर्षीय पुरुष, दिघोरी (नागपूर) येथील ४५ वर्षीय पुरुष, धारणी येथील ४० वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे येथील ५६ वर्षीय महिला, नांदगाव खंडेश्वर येथील ४० वर्षीय महिला, राजना (ता. चांदूर रेल्वे) येथील ६० वर्षीय पुरुष, नागपूर येथील ५२ वर्षीय महिला, श्रीकृष्णनगर (अमरावती) येथील ६८ वर्षीय पुरुष, हिलटॉप कॉलनी (अमरावती) येथील ५४ वर्षीय पुरुष, यवतमाळ येथील ७७ वर्षीय महिला अशा एकूण १५ रुग्णांना जीव गमवावा लागला.

सोमवारी ६८० रुग्णांनी काेरोनावर मात केली. आतापर्यंत ५४ हजार ५३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ६२ हजार ३४ आहे. गृहविलगीकरणात महापालिका क्षेत्रात १३३१, तर ग्रामीणमध्ये ३४९६ रुग्ण उपचार घेत आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ६६०८ आहेत. कोरोनामुक्तीचा रिकव्हरी रेट ८७.९२ टक्के एवढा आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर आला आहे. मृत्युदर १.४३ टक्के असा आरोग्य यंत्रणेने नोंदविला आहे. आतापर्यंत ४ लाख ४ हजार ६५३ नमुने चाचणी करण्यात आली आहे.