शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

७३१ गावे दुष्काळातून डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:50 IST

खरिपाची अंतिम पैसेवारीत धारणी व्यतिरिक्त सर्वच तालुक्यांना न्याय देण्यात आला. मात्र, जाहीर १८०७ गावांपैकी १०७६ गावे ही यापूर्वीच दुष्काळ जाहीर केलेले तालुके व मंडळातील आहेत. याव्यतिरिक्त ७३१ गावांतदेखील खरिपाची दुष्काळस्थिती असल्याचे चित्र या पैसेवारीतून स्पष्ट झाले.

ठळक मुद्देशासनाचा दुजाभाव : नव्या यादीत जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरिपाची अंतिम पैसेवारीत धारणी व्यतिरिक्त सर्वच तालुक्यांना न्याय देण्यात आला. मात्र, जाहीर १८०७ गावांपैकी १०७६ गावे ही यापूर्वीच दुष्काळ जाहीर केलेले तालुके व मंडळातील आहेत. याव्यतिरिक्त ७३१ गावांतदेखील खरिपाची दुष्काळस्थिती असल्याचे चित्र या पैसेवारीतून स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ९३१ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नसल्याने शासनाने दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे.जिल्ह्यातील खरिपाची अंतिम स्थिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केली. यात तालुक्यातील पाच व धारणी तालुक्यातील १५२ गावे वगळता १८०७ गावांमध्ये ४८ पैसेवारी जाहीर केली. अत्यल्प पावसामुळे खरीपे पीक उद्ध्वस्त झाल्याची बाब यातून अधोरेखित झाली. वास्तविकता चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर चांदूर बाजार व मोर्शी तालुक्यांसह अन्य १५ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या निकषानुसार यापूर्वीच दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे या व्यतिरिक्त असलेल्या गावांमध्ये काय पैसेवारी लागते, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने वस्तुनिष्ठ अहवालाद्वारे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.यंदा प्रथमच शासनाने पैसेवारीचा विहित नमुन्यात बदल केला. या सुधारित नमुन्यात दुष्काळ जाहीर झालले तालुके व महसूल मंडळाव्यतिरिक्त ५० पैशांच्या आत पैसेवारी जाहीर झालेल्या गावांची संख्या शासनाने मागितली आहे. आगामी काळात सार्वत्रिक निवडणुका असल्याने शासनाद्वारे या गावांच्या स्थितीवर गंभीरतेने विचार करीत आहे. गुरूवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ९३१ गावांमध्ये कमी पर्जन्यमानाच्या आधारावर दुष्काळ स्थिती जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यात कमी पैसेवारी असलेल्या एकाही गावाचा समावेश करण्यात आलेला नसल्याने दुष्काळातही पक्षपात करत असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.‘एनडीआरएफ’ची मिळणार मदतदुष्काळी तालुक्यांना शासनाचे प्रचलित ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे जिरायती क्षेत्राला हेक्टरी सहा हजार ८०० रूपये, तर बागायती क्षेत्राला हेक्टरी १३ हजार ५०० रूपयांची व फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रूपयांची मदत देय राहणार आहे. मात्र, ही मदत तीव्र स्वरूपाच्या दुष्काळ तालुक्यांना की दुष्काळ जाहीर तालुक्यांना राहील, याची वाच्यता अद्याप सरकारने केलेली नसली तरी या सर्व तालुक्यांना शासनाने जाहीर केलेल्या आठ सवलतींचा लाभ मिळणार आहे. तसेच दुष्काळ निवारणाची कामेदेखील या तालुक्यात सुरू केली जाणार आहे.दुष्काळापासून वंचित तालुकानिहाय गावेशासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरीक्त पैसेवारी कमी आलेल्या गावांमध्ये अमरावती तालुक्यातील १०५, भातकुली ६९, चांदूर रेल्वे ७४, धामणगाव रेल्वे ८३, नांदगाव खंडेश्वर १६१, चांदूरबाजार ८४ व दर्यापूर तालुक्यातील ८६ अशा एकूण ७३१ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये ५० पैशांच्या आत पैसेवारी आल्याची माहिती शासनाने मागविली. वास्तविकता या तालुक्यांमध्ये सरासरीच्या २४ ते ३५ टक्के कमी पाऊस झालेला आहे व अपुऱ्या पावसाने खरिपासह रबी हंगामही गारद झालेला आहे. मात्र, या गावांना यावेळी दुष्काळी यादीतून डावलले आहे.हा तर जिल्ह्यावर अन्याय५० पैस्यांपेक्षा कमी पैसेवारी व कमी पर्जन्यमान झालेल्या ५० महसूल मंडळांतील ९३१ गावांचा समावेश दुष्काळ यादीत गुरूवारी झालेल्या दुष्काळ निवारणासाठी नियुक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. मात्र, यामध्ये जिल्ह्यातील कमी पैसेवारीच्या ७३१ गावांना डावलण्यात आले आहे. यापूर्वी शासनाने ३१ आॅक्टोबरला १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला व २६८ महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील १५ मंडळांचा समावेश आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी