शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

७३१ गावे दुष्काळातून डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:50 IST

खरिपाची अंतिम पैसेवारीत धारणी व्यतिरिक्त सर्वच तालुक्यांना न्याय देण्यात आला. मात्र, जाहीर १८०७ गावांपैकी १०७६ गावे ही यापूर्वीच दुष्काळ जाहीर केलेले तालुके व मंडळातील आहेत. याव्यतिरिक्त ७३१ गावांतदेखील खरिपाची दुष्काळस्थिती असल्याचे चित्र या पैसेवारीतून स्पष्ट झाले.

ठळक मुद्देशासनाचा दुजाभाव : नव्या यादीत जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरिपाची अंतिम पैसेवारीत धारणी व्यतिरिक्त सर्वच तालुक्यांना न्याय देण्यात आला. मात्र, जाहीर १८०७ गावांपैकी १०७६ गावे ही यापूर्वीच दुष्काळ जाहीर केलेले तालुके व मंडळातील आहेत. याव्यतिरिक्त ७३१ गावांतदेखील खरिपाची दुष्काळस्थिती असल्याचे चित्र या पैसेवारीतून स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ९३१ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नसल्याने शासनाने दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे.जिल्ह्यातील खरिपाची अंतिम स्थिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केली. यात तालुक्यातील पाच व धारणी तालुक्यातील १५२ गावे वगळता १८०७ गावांमध्ये ४८ पैसेवारी जाहीर केली. अत्यल्प पावसामुळे खरीपे पीक उद्ध्वस्त झाल्याची बाब यातून अधोरेखित झाली. वास्तविकता चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर चांदूर बाजार व मोर्शी तालुक्यांसह अन्य १५ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या निकषानुसार यापूर्वीच दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे या व्यतिरिक्त असलेल्या गावांमध्ये काय पैसेवारी लागते, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने वस्तुनिष्ठ अहवालाद्वारे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.यंदा प्रथमच शासनाने पैसेवारीचा विहित नमुन्यात बदल केला. या सुधारित नमुन्यात दुष्काळ जाहीर झालले तालुके व महसूल मंडळाव्यतिरिक्त ५० पैशांच्या आत पैसेवारी जाहीर झालेल्या गावांची संख्या शासनाने मागितली आहे. आगामी काळात सार्वत्रिक निवडणुका असल्याने शासनाद्वारे या गावांच्या स्थितीवर गंभीरतेने विचार करीत आहे. गुरूवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ९३१ गावांमध्ये कमी पर्जन्यमानाच्या आधारावर दुष्काळ स्थिती जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यात कमी पैसेवारी असलेल्या एकाही गावाचा समावेश करण्यात आलेला नसल्याने दुष्काळातही पक्षपात करत असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.‘एनडीआरएफ’ची मिळणार मदतदुष्काळी तालुक्यांना शासनाचे प्रचलित ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे जिरायती क्षेत्राला हेक्टरी सहा हजार ८०० रूपये, तर बागायती क्षेत्राला हेक्टरी १३ हजार ५०० रूपयांची व फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रूपयांची मदत देय राहणार आहे. मात्र, ही मदत तीव्र स्वरूपाच्या दुष्काळ तालुक्यांना की दुष्काळ जाहीर तालुक्यांना राहील, याची वाच्यता अद्याप सरकारने केलेली नसली तरी या सर्व तालुक्यांना शासनाने जाहीर केलेल्या आठ सवलतींचा लाभ मिळणार आहे. तसेच दुष्काळ निवारणाची कामेदेखील या तालुक्यात सुरू केली जाणार आहे.दुष्काळापासून वंचित तालुकानिहाय गावेशासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरीक्त पैसेवारी कमी आलेल्या गावांमध्ये अमरावती तालुक्यातील १०५, भातकुली ६९, चांदूर रेल्वे ७४, धामणगाव रेल्वे ८३, नांदगाव खंडेश्वर १६१, चांदूरबाजार ८४ व दर्यापूर तालुक्यातील ८६ अशा एकूण ७३१ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये ५० पैशांच्या आत पैसेवारी आल्याची माहिती शासनाने मागविली. वास्तविकता या तालुक्यांमध्ये सरासरीच्या २४ ते ३५ टक्के कमी पाऊस झालेला आहे व अपुऱ्या पावसाने खरिपासह रबी हंगामही गारद झालेला आहे. मात्र, या गावांना यावेळी दुष्काळी यादीतून डावलले आहे.हा तर जिल्ह्यावर अन्याय५० पैस्यांपेक्षा कमी पैसेवारी व कमी पर्जन्यमान झालेल्या ५० महसूल मंडळांतील ९३१ गावांचा समावेश दुष्काळ यादीत गुरूवारी झालेल्या दुष्काळ निवारणासाठी नियुक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. मात्र, यामध्ये जिल्ह्यातील कमी पैसेवारीच्या ७३१ गावांना डावलण्यात आले आहे. यापूर्वी शासनाने ३१ आॅक्टोबरला १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला व २६८ महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील १५ मंडळांचा समावेश आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी