शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

७२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:06 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. प्रथमच थेट सरपंच निवडून येणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्ह्यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले. यादरम्यान तुरळक घटना वगळता कुठेही अप्रिय घटना घडल्याची नोंद नाही.सरपंच व सदस्यपदांसाठी रिंगणात असलेल्या ४२८१ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये बंद झाले. यात सरपंचपदाचे ९८२, ...

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : उशिरापर्यंत केंद्रांमध्ये गर्दी, थेट सरपंचांमुळे चुरस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. प्रथमच थेट सरपंच निवडून येणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्ह्यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले. यादरम्यान तुरळक घटना वगळता कुठेही अप्रिय घटना घडल्याची नोंद नाही.सरपंच व सदस्यपदांसाठी रिंगणात असलेल्या ४२८१ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये बंद झाले. यात सरपंचपदाचे ९८२, तर सदस्य पदांसाठी ३२९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी सकाळी १० वाजतापासून संबधित तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू होणार आहे.जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींच्या ७९२ प्रभागातील १४६१ सदस्य व २४९ सरपंचपदासाठी सोमवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान झाले. काही केंद्रांवर निर्धारित वेळेपर्यंत मतदान पूर्ण न झाल्याने मतदान केंद्रात उशिरापर्यंत मतदारांची गर्दी होती. या निवडणुकीसाठी १ लाख ६६ हजार १६५ पुरुष व १ लाख ५० हजार ८८२ स्त्री व इतर चार असे एकूण ३ लाख १७ हजार ५१ मतदार होते. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या कालावधीत ६२ हजार ८२८ स्त्री, ७० हजार ३२८ पुरुष असे एकूण १ लाख ३३ हजार १५६ मतदारांनी मतदान केले. ही ४२ टक्केवारी होती.मतदारांचा ओघ वाढल्याने दुपारी ३.३० पर्यंत ९२,१६० स्त्री व ९७,४०७ पुरुष असे एकूण १ लाख ८९ हजार ५६७ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ५९.७९ अशी होती. मतदानाची निर्धारित वेळ सायंकाळी ५.३० पर्यंत असताना केंद्रांवर मतदारांची गर्दी असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते.अचलपूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानात सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याचे संबधित अधिकाºयांनी सांगितले. धामणगाव रेल्वे तालुक्यात ८ ग्रामपंचायतीत झालेल्या मतदानाची टक्केवारी ८६.०३ टक्के होती. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७५ टक्के, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १७ पैकी १६ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी ७९.०१ टक्के , दर्यापूर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींसाठी ८६ टक्के मतदान झाले. वरूड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींसाठी ८०.८१ टक्के, मोर्शी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७६ टक्के, तिवसा तालक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के, चांदूर बाजार तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी ८१.१० टक्के, चांदूर रेल्वे तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के, अमरावती तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ७५ टक्के, भातकुली तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ७८ टक्के , धारणी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान झाले. चिखलदरा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या मतदानाची आकडेवारी मिळाली नाही.६.३० पर्यंत मतदान प्रक्रियाचांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा व घाटलाडकी येथे सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. ५.३० वाजता केंद्राचे दरवाजे बंद करुन मतदान झाले.