शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

अमरावती जिल्ह्यात ५६ जणांचा अपघाती मृत्यू; वर्षभरात ३२१ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 17:10 IST

जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाला, २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते

अमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाला, २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते. देशभरात वाढती अपघाताची आकडेवारी पाहता शासनाने ठोस उपाययोजना आवश्यक होती. मात्र, त्या तुलनेत उपाययोजना झाल्या नाहीत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय सुचविण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती स्थापित करण्यात आली आहे.चारचाकी वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींची वाहतूक करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, नशेत वाहन चालवणे, सीटबेल्ट न वापरणे, वेगमर्यादा न पाळण्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यासाठीवाहनांची कसून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अनेकदा शेतमाल किंवा कुठलीही वस्तू वाहून नेणाºया बैलगाड्या, मिनीट्रक अथवा ट्रेलर नादुरुस्त झाल्यास रस्त्यावरच सोडून दिले जातात. त्यावर कोणताही दिवा नसल्याने अपघात होतात. याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे व आवश्यक तेव्हा कारवाईचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने स्थानिक आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा व ट्रामाकेअर सेंटरचा आढावा घेऊन शासकीय व खासगी रुग्णवाहिकेचा माहितीकोष करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. 

अनियंत्रित, बेशिस्त वाहतुकीचेही बळीजिल्ह्याभरात बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले असून, नियमबाह्य वाहतुकीमुळे बहुतांश बळी जात असल्याचे आढळून आलेत. ही अनियंत्रित व नियमबाह्य वाहतूक सुरळीत करण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

३४ ब्लॅकस्पॉटवर गतिरोधकजिल्ह्यातील ३४ ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक, रंबलिंग स्ट्रीप, धोक्याचा इशारा देणारे बोर्ड उभारण्यात येत आहेत. दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी प्रवास करणे, हेल्मेट न वापरणे, नियमभंग करणे आदी आढळल्यास पोलीस व महामार्ग पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

सर्वोच्च न्यायालय आणि रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देेशानुसार रस्ता सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे. त्यासाठी विविध विभागांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.- विजय काठोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती