शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात पाच वर्षात ५,४०८ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

२७१७ शेतकऱ्यांना मदत, २,६२३ प्रकरणे ठरली अपात्र, ६८ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित अमरावती : सततची नापिकी, अस्मानी संकट, आर्थिक प्रश्न, ...

२७१७ शेतकऱ्यांना मदत, २,६२३ प्रकरणे ठरली अपात्र, ६८ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित

अमरावती : सततची नापिकी, अस्मानी संकट, आर्थिक प्रश्न, बँक कर्जाचे ओझे, कुटुंबांची समस्या अशा विविध कारणांनी सन २०१६ ते २०२० या पाच वर्षात अमरावती विभागातील ५,४०८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्य शासनाने ५,४०८ पैकी २,७१७ आत्महत्या करणाऱ्या पात्र शेतकरी कुटुंबातील प्रतिवारसांना एक लाख रुपये प्रमाणे मदत दिली आहे.

विदर्भात सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्यासह पत्नी, मुला-बाळासह सहा जणांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर विविध कारणांनी आजतागायत शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी व्यापक धोरण आखत नसल्याने दरवर्षी बळीराजाला आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे वास्तव आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविधांगी योजना, अनुदान वाटप करण्यात आले. एवढेच नव्हे तर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला व वर्धा अशा सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी स्वंतत्र ‘केम’ प्रकल्प राबविला गेला. आताही हा प्रकल्प सुरूच आहे. केंद्र शासनाचे अनुदान कुठे गेले, कोणी मलिदा चाखला, याचे ऑडिट झाल्यास अनेक बडे मासे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, हे खरे आहे. मात्र, सन २०१६ ते २०२० या दरम्यान पाच वर्षात ५४०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने अधिकृतपणे दिली आहे. त्यामुळे शासन योजना, अनुदान, प्रकल्प शेतकऱ्यांसाठी की प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी? हा संशोधनाचा विषय आहे. काही एनजीओंनी शेतकरी उत्थानाच्या नावे स्वत:ची ‘प्रगती’ केली आहे, शेतकरी मात्र कायम संकटातच आहे. गत पाच वर्षात विभागात शेतकरी आत्महत्येच्या यादीत अमरावती जिल्हा अव्वल

असल्याची नाेंद आहे.

---------------

अशी आहे विभागात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी

अमरावती : १४२४

अकोला : ७४६

यवतमाळ : १३७६

बुलडाणा : १४२१

वाशिम : ४४१

--------------

विदर्भातील सहा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘केम’ प्रकल्प केंद्र शासनाने राबविला. हजारो कोटींचे अनुदान शेतकऱ्यांच्या नावे खर्च केले. मात्र, गत पाच वर्षांत शेतकरी आत्महत्येची आकडेवारी बघितली तर खरेच शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले का? हे लक्षात येते.

- सचिन देशमुख, सामाजिक कार्यकर्ता