शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

अमरावती विभागात पाच वर्षात ५,४०८ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

२७१७ शेतकऱ्यांना मदत, २,६२३ प्रकरणे ठरली अपात्र, ६८ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित अमरावती : सततची नापिकी, अस्मानी संकट, आर्थिक प्रश्न, ...

२७१७ शेतकऱ्यांना मदत, २,६२३ प्रकरणे ठरली अपात्र, ६८ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित

अमरावती : सततची नापिकी, अस्मानी संकट, आर्थिक प्रश्न, बँक कर्जाचे ओझे, कुटुंबांची समस्या अशा विविध कारणांनी सन २०१६ ते २०२० या पाच वर्षात अमरावती विभागातील ५,४०८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्य शासनाने ५,४०८ पैकी २,७१७ आत्महत्या करणाऱ्या पात्र शेतकरी कुटुंबातील प्रतिवारसांना एक लाख रुपये प्रमाणे मदत दिली आहे.

विदर्भात सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्यासह पत्नी, मुला-बाळासह सहा जणांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर विविध कारणांनी आजतागायत शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी व्यापक धोरण आखत नसल्याने दरवर्षी बळीराजाला आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे वास्तव आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविधांगी योजना, अनुदान वाटप करण्यात आले. एवढेच नव्हे तर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला व वर्धा अशा सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी स्वंतत्र ‘केम’ प्रकल्प राबविला गेला. आताही हा प्रकल्प सुरूच आहे. केंद्र शासनाचे अनुदान कुठे गेले, कोणी मलिदा चाखला, याचे ऑडिट झाल्यास अनेक बडे मासे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, हे खरे आहे. मात्र, सन २०१६ ते २०२० या दरम्यान पाच वर्षात ५४०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने अधिकृतपणे दिली आहे. त्यामुळे शासन योजना, अनुदान, प्रकल्प शेतकऱ्यांसाठी की प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी? हा संशोधनाचा विषय आहे. काही एनजीओंनी शेतकरी उत्थानाच्या नावे स्वत:ची ‘प्रगती’ केली आहे, शेतकरी मात्र कायम संकटातच आहे. गत पाच वर्षात विभागात शेतकरी आत्महत्येच्या यादीत अमरावती जिल्हा अव्वल

असल्याची नाेंद आहे.

---------------

अशी आहे विभागात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी

अमरावती : १४२४

अकोला : ७४६

यवतमाळ : १३७६

बुलडाणा : १४२१

वाशिम : ४४१

--------------

विदर्भातील सहा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘केम’ प्रकल्प केंद्र शासनाने राबविला. हजारो कोटींचे अनुदान शेतकऱ्यांच्या नावे खर्च केले. मात्र, गत पाच वर्षांत शेतकरी आत्महत्येची आकडेवारी बघितली तर खरेच शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले का? हे लक्षात येते.

- सचिन देशमुख, सामाजिक कार्यकर्ता