शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

वरुड येथील मंडीत ५०० ट्रक संत्री पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 5:00 AM

कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन २१ मार्चला सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत केले होते. परंतु, भीषण परिस्थिती पाहता, सरकारने कलम १४४ लागू करून जमावबंदी आदेश काढले आहेत. विदर्भाच्या कॅलिफोर्नियात मृग बहराची संत्री मोठ्या प्रमाणावर असून, दिवसागणिक ४०० ते ५०० ट्रक संत्री परप्रांतात जातात.

ठळक मुद्दे१७ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान : बागेतील संत्र्याची पडझड

संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : देशासह जगात कोरोनाने कहर केला असून, त्याचा फटका संत्र्याच्या बाजारपेठेला बसला आहे. मोठी बाजारपेठ असलेल्या वरूडच्या मार्केट यार्डमध्ये ५०० ट्रक संत्री पडून असल्याने १७ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतातदेखील संत्री मोठ्या प्रमाणावर असल्याने गळून पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. एकूण नुकसान हे कोट्यवधीच्या घरात जाणार असल्याची माहिती संत्रा व्यापाऱ्यांनी दिली.कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन २१ मार्चला सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत केले होते. परंतु, भीषण परिस्थिती पाहता, सरकारने कलम १४४ लागू करून जमावबंदी आदेश काढले आहेत. विदर्भाच्या कॅलिफोर्नियात मृग बहराची संत्री मोठ्या प्रमाणावर असून, दिवसागणिक ४०० ते ५०० ट्रक संत्री परप्रांतात जातात. परंतु, कोरानाविरुद्ध देशपातळीवर युद्ध सुरू असल्याने बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड, केरळ, बांग्लादेश, मुंबईला जाणारे ट्रक थांबले आहेत. तोडाईचे शेवटचे दिवस असल्याने व्यापाºयांनी खरेदी केलेली संत्री तोडणे आवश्यक आहे. तोडाई बंद केली, तर शेतात संत्र्याची गळती वाढली आहे. वरूड येथे ५२ संत्रा मंड्या आहेत. यामधील मजुरांनी रात्री ९ वाजता संचारबंदी संपताच घाईघाईत संत्र्याचे पॅकिंग सुरू केले. मात्र, राज्यात १४४ कलम लागू करून जमावबंदी आदेश निघाल्याने ५०० ट्रक अडकले. संत्र्याला १७ ते २५ रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. एका टनाला १७ ते २५ हजार रुपये भाव मिळत असला तरी कोरोनामुळे मालमोटारीची चाके थांबली आहे. परप्रांतातसुद्धा संत्री विकली जात नसल्याने व्यापाºयांचे अंदाजे १७ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यापेक्षाही अधिक संत्री शेतातील झाडांवरच असल्याने तोडाई आणि भराईचा प्रश्न कायम आहे. त्याला गळती लागत आहे. शेतकऱ्यांच्या बागेचा सौदादेखील प्रलंबित आहे. कोरानामुळे अशाप्रकारे पून्हा शेतकऱ्यांवर कर्ज वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शासनाने संत्री खरेदी करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे. कोट्यवधीच्या नुकसानाला संत्रा उत्पादकांसह व्यापाºयांनाही बळी पडावे लागण्याची शक्यता आहे.१०० कोटींचे नुकसानकोरोनामुळे आंतरराज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. यामुळे ट्रक राज्याबाहेर निघू शकत नाहीत. बाजारपेठेत मध्ये ५०० ट्रक संत्री पडून आहेत, तर १० ते १५ टक्के संत्री झाडावरच असल्याने व्यापाऱ्यांपुढे पेच पडला आहे. शेतकºयांना रक्कम देणे बाकी आहे, तर काहींना दिली तरी संत्री शेतातून बाहेर काढता आलेली नाहीत. या अवस्थेत भाव चांगले असताना, गाड्या परप्रांतीय बाजारात पोहोचत नसल्याने वरूड तालुक्याला १०० कोटी रुपयांचा फटका संत्रा व्यापाºयांसह शेतकºयांना पडणार असल्याने आम्ही चिंताग्रस्त आहोत; आर्थिक ताण वाढला असल्याचे वरूड येथील संत्रा व्यापारी उत्तम आलोडे यांनी सांगितले.संत्री पोहोचणार तरी कशी ?संत्र्याला मागणी वाढल्याने सुगीचे दिवस आले होते. २२ ते २५ हजार रुपये टनाप्रमाणे विकला जात होता. परंतु, अचानक कोरोनामुळे सर्व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने वाहतूक थांबली, तर झारखंड, दिल्ली, बांग्लादेश सीमा सील झाली. आता मुख्य बाजारपेठेत संत्रा पोहोचू शकत नाही. २२ मार्चला संत्री घेऊन निघालेली ५०० वाहने मध्येच अडकून पडल्याने काय करावे, हा प्रश्न आहे. शेतातही मोठ्या प्रमाणात संत्री तोडून पडली, तर मंडीतही हजारो टन संत्री पडून आहेत. यामध्ये शेतकºयांसह संत्रा व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. अपरिमीत नुकसान सहन करण्याची वेळ आली असल्याचे ताज फ्रुट कंपनीचे संचालक ताजूभाई यांनी सागितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या