शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

५० गद्दारांनी राज्यातील चांगले सरकार पाडले; आमदार देवेंद भुयार यांची बोचरी टीका

By गणेश वासनिक | Updated: October 21, 2022 18:37 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघातील निधी रोखला

अमरावती : राज्याचे ५० गद्दार गुजरातमार्गे गुवाहाटीला गेले आणि चांगले सरकार पाडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘अलिबाबा और चालीस चाेर’ असा उल्लेख करून आमचा कोट्यवधीचा निधी रोखला, अशी टीका वरूड-मोर्शीचेआमदार देवेंद्र भुयार यांनी येथे केली.

वरूड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार भुयार यांनी निधी रोखल्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

मी भाजपमध्ये जाणार, अशी जाणीवपूर्वक काही लोक माझी बदनामी करीत आहेत. मला भाजपमध्ये जायचे होते, तेव्हाच गेलो असतो. गुवाहाटीमध्ये मौजमजा केली असती आणि ५० खोके घेऊन आलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला. मी विराचाराने पक्का आहे, किंबहुना मी गुवाहटीला गेलो असतो तर या लोकांनी शेण घातलं असतं, असेही आमदार भुयार म्हणाले.

त्यावेळी मला जळगावमधून फोन येत होते, गुवाहाटीला ये नाही तर नागपूरला ये, असा निरोप देत होते. परंतु, मी हर्षवर्धन देशमुख यांचा कार्यकर्ता आहे. गद्दारी माझ्या रक्तात नाही. माझ्या लग्नात फडणवीस आले. त्यांची माझी रास एक आहे. ते लग्नाला आले म्हणजे मी भाजपमध्ये गेलो, असे होत नाही. पण, विरोधकांनी त्याचेही भांडवल केले. विरोधक बदनाम करायची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, मी घाबरत नाही. राजकारण हा माझा पिंड नाही. वडिलोपार्जित शेती असून, ती कसणार, अशी कबुली त्यांनी दिली.मुंबईत ठाकरेंची दहशत आहेच

मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे आणि उद्याही राहील, हे कोणीही नाकारू शकत नाही, असेही आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात चांगले काम केले. म्हणून जागतिक पातळीवर त्यांची दखल घेण्यात आली. परंतु, सत्तेसाठी काही गद्दारांनी ठाकरेंना धोका दिला. आता येत्या काळात मतदार त्यांना जागा दाखवून देतील. अंधेरी पूर्व मतदार संघातून ही सुरुवात झाली असून, ती राज्यभर पसरणार, असा विश्वास आमदार भुयार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PoliticsराजकारणMLAआमदारmorshi-acमोर्शीEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे