शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५० गद्दारांनी राज्यातील चांगले सरकार पाडले; आमदार देवेंद भुयार यांची बोचरी टीका

By गणेश वासनिक | Updated: October 21, 2022 18:37 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघातील निधी रोखला

अमरावती : राज्याचे ५० गद्दार गुजरातमार्गे गुवाहाटीला गेले आणि चांगले सरकार पाडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘अलिबाबा और चालीस चाेर’ असा उल्लेख करून आमचा कोट्यवधीचा निधी रोखला, अशी टीका वरूड-मोर्शीचेआमदार देवेंद्र भुयार यांनी येथे केली.

वरूड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार भुयार यांनी निधी रोखल्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

मी भाजपमध्ये जाणार, अशी जाणीवपूर्वक काही लोक माझी बदनामी करीत आहेत. मला भाजपमध्ये जायचे होते, तेव्हाच गेलो असतो. गुवाहाटीमध्ये मौजमजा केली असती आणि ५० खोके घेऊन आलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला. मी विराचाराने पक्का आहे, किंबहुना मी गुवाहटीला गेलो असतो तर या लोकांनी शेण घातलं असतं, असेही आमदार भुयार म्हणाले.

त्यावेळी मला जळगावमधून फोन येत होते, गुवाहाटीला ये नाही तर नागपूरला ये, असा निरोप देत होते. परंतु, मी हर्षवर्धन देशमुख यांचा कार्यकर्ता आहे. गद्दारी माझ्या रक्तात नाही. माझ्या लग्नात फडणवीस आले. त्यांची माझी रास एक आहे. ते लग्नाला आले म्हणजे मी भाजपमध्ये गेलो, असे होत नाही. पण, विरोधकांनी त्याचेही भांडवल केले. विरोधक बदनाम करायची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, मी घाबरत नाही. राजकारण हा माझा पिंड नाही. वडिलोपार्जित शेती असून, ती कसणार, अशी कबुली त्यांनी दिली.मुंबईत ठाकरेंची दहशत आहेच

मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे आणि उद्याही राहील, हे कोणीही नाकारू शकत नाही, असेही आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात चांगले काम केले. म्हणून जागतिक पातळीवर त्यांची दखल घेण्यात आली. परंतु, सत्तेसाठी काही गद्दारांनी ठाकरेंना धोका दिला. आता येत्या काळात मतदार त्यांना जागा दाखवून देतील. अंधेरी पूर्व मतदार संघातून ही सुरुवात झाली असून, ती राज्यभर पसरणार, असा विश्वास आमदार भुयार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PoliticsराजकारणMLAआमदारmorshi-acमोर्शीEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे