शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

चिमुकले आसना, अलमास आई, वडील, आजीविना पोरके! बाभळीच्या टाटानगरवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 11:04 IST

यमरूपी ट्रकने घेतले पाच बळी

अनंतर बोबडे/ सचिन मानकर

अमरावती : अंजनगाव दर्यापूर म्हणजे दोन्ही शहरवासीयांचे घरअंगणच. अवघ्या ३० किलोमीटरवर असलेल्या अंजनगावातून शेख अझहर हे आई, पत्नी, बहीण, मुलांसह घराच्या ओढीने निघाले. रात्री १०च्या सुमारास त्यांना प्रवासी वाहन न मिळाल्याने व रात्र अधिक होऊ लागल्याने ते अन्य १२ जणांसह मालवाहू वाहनाने दर्यापूरकडे निघाले. इटकीपर्यंतचा प्रवासदेखील झाला. अवघ्या सात ते आठ किलोमीटरवर दर्यापूर राहिले. मात्र हाय रे दैवा, यमरूपात आलेल्या ट्रकने त्यांच्या मालवाहू वाहनास मागून जोरदार धडक दिली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. शेख अझहरसह त्यांची आई, पत्नी, मुलगी व पुतण्या अपघातात ठार झाले. शेख अझहर यांची आसना (७) व अलमास (२) ही दोन्ही चिमुकले आई, वडील, बहीण व आजींविना पोरके झाले.

टाटानगर बाभळी येथील शेख एजाज शेख अब्बास (७५) हे कुटुंबीयांसमवेत मुलीच्या दिराच्या लग्नाचा वलिमा आटोपून दर्यापूरकडे परत येत असताना दर्यापूरकडेच जाणारा ट्रक त्यांच्यासाठी ठरला. शेख एजाजदेखील या अपघातात जखमी झाले. शेख एजाज हे मुलगी नफिसा परवीन शेख अनवर (५४) यांच्याकडे राहत होते. ते मुलगी नफिसा, नातू शेख अझहर, नातसून व अन्य कौटुंबिक सदस्यांसोबत सोमवारी पहाटे दर्यापूरहून अंजनगाव सुर्जीला पोहोचले होते. दरम्यान, मंगळवारी आई, वडील, बहीण व आजीचा मृतदेह पाहून सात वर्षांची आसना दिङमूढ झाली. तिला अब्बा, अम्मी, नानी बोलत नाहीत, एवढेच कळत होते; तर दोनवर्षीय शेख अलमास शेख अझहर हा त्याच्या जवळच्या आप्तांना बिलगला होता.

सामाजिक कार्यकर्ते धावले

घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट, हेमंत उमाळे, निखिल अरबट, अतुल सगणे, नंदू अरबट, सचिन शेलारे, आकाश नारोळकर, शरद गावंडे, राहुल भुंबर, वाहतूक शाखा निरीक्षक गोपाल उंबरकर व खल्लारचे ठाणेदार किरण औटे हे घटनास्थळी पोहोचले. रुग्णालयात एकच गर्दी झाल्याने रुग्णांवर उपचार करण्याकरिता डॉक्टरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रुग्णालयात पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता.

धान्य मार्केट बंद

शेख अजहर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करीत असल्याने त्यांना श्रद्धांजलीपर दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य मार्केटसुद्धा मंगळवारी बंद ठेवण्यात आले होते.

घराजवळ महिलांचा आक्रोश

दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाच मृतदेहांची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे पार्थिव दुपारनंतर टाटानगरमध्ये पोहोचले. ते पाहताच महिला तथा नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. त्या हृदयभेदी आक्रोशाने उपस्थितांचे डोळेदेखील पाणावले. संपूर्ण कुटुंब अपघातबळी ठरल्याची मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली.

पाचही जणांची अंत्ययात्रा सोबतच

पती, पत्नी, मुलगी, आई व चिमुकला पुतण्या अशा पाचही जणांची अंत्ययात्रा टाटानगर बाभळी येथून मंगळवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास निघाली. अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दुपारी चारच्या सुमारास दफनविधी पार पडला.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती