शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

चिमुकले आसना, अलमास आई, वडील, आजीविना पोरके! बाभळीच्या टाटानगरवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 11:04 IST

यमरूपी ट्रकने घेतले पाच बळी

अनंतर बोबडे/ सचिन मानकर

अमरावती : अंजनगाव दर्यापूर म्हणजे दोन्ही शहरवासीयांचे घरअंगणच. अवघ्या ३० किलोमीटरवर असलेल्या अंजनगावातून शेख अझहर हे आई, पत्नी, बहीण, मुलांसह घराच्या ओढीने निघाले. रात्री १०च्या सुमारास त्यांना प्रवासी वाहन न मिळाल्याने व रात्र अधिक होऊ लागल्याने ते अन्य १२ जणांसह मालवाहू वाहनाने दर्यापूरकडे निघाले. इटकीपर्यंतचा प्रवासदेखील झाला. अवघ्या सात ते आठ किलोमीटरवर दर्यापूर राहिले. मात्र हाय रे दैवा, यमरूपात आलेल्या ट्रकने त्यांच्या मालवाहू वाहनास मागून जोरदार धडक दिली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. शेख अझहरसह त्यांची आई, पत्नी, मुलगी व पुतण्या अपघातात ठार झाले. शेख अझहर यांची आसना (७) व अलमास (२) ही दोन्ही चिमुकले आई, वडील, बहीण व आजींविना पोरके झाले.

टाटानगर बाभळी येथील शेख एजाज शेख अब्बास (७५) हे कुटुंबीयांसमवेत मुलीच्या दिराच्या लग्नाचा वलिमा आटोपून दर्यापूरकडे परत येत असताना दर्यापूरकडेच जाणारा ट्रक त्यांच्यासाठी ठरला. शेख एजाजदेखील या अपघातात जखमी झाले. शेख एजाज हे मुलगी नफिसा परवीन शेख अनवर (५४) यांच्याकडे राहत होते. ते मुलगी नफिसा, नातू शेख अझहर, नातसून व अन्य कौटुंबिक सदस्यांसोबत सोमवारी पहाटे दर्यापूरहून अंजनगाव सुर्जीला पोहोचले होते. दरम्यान, मंगळवारी आई, वडील, बहीण व आजीचा मृतदेह पाहून सात वर्षांची आसना दिङमूढ झाली. तिला अब्बा, अम्मी, नानी बोलत नाहीत, एवढेच कळत होते; तर दोनवर्षीय शेख अलमास शेख अझहर हा त्याच्या जवळच्या आप्तांना बिलगला होता.

सामाजिक कार्यकर्ते धावले

घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट, हेमंत उमाळे, निखिल अरबट, अतुल सगणे, नंदू अरबट, सचिन शेलारे, आकाश नारोळकर, शरद गावंडे, राहुल भुंबर, वाहतूक शाखा निरीक्षक गोपाल उंबरकर व खल्लारचे ठाणेदार किरण औटे हे घटनास्थळी पोहोचले. रुग्णालयात एकच गर्दी झाल्याने रुग्णांवर उपचार करण्याकरिता डॉक्टरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रुग्णालयात पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता.

धान्य मार्केट बंद

शेख अजहर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करीत असल्याने त्यांना श्रद्धांजलीपर दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य मार्केटसुद्धा मंगळवारी बंद ठेवण्यात आले होते.

घराजवळ महिलांचा आक्रोश

दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाच मृतदेहांची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे पार्थिव दुपारनंतर टाटानगरमध्ये पोहोचले. ते पाहताच महिला तथा नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. त्या हृदयभेदी आक्रोशाने उपस्थितांचे डोळेदेखील पाणावले. संपूर्ण कुटुंब अपघातबळी ठरल्याची मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली.

पाचही जणांची अंत्ययात्रा सोबतच

पती, पत्नी, मुलगी, आई व चिमुकला पुतण्या अशा पाचही जणांची अंत्ययात्रा टाटानगर बाभळी येथून मंगळवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास निघाली. अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दुपारी चारच्या सुमारास दफनविधी पार पडला.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती