शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’चा खोडा; ४६ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 20:21 IST

सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार प्रत्येकी तीन हप्त्यांत देण्याची घोषणा केली.

अमरावती : ‘पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार २०८ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. यापैकी यंदा वर्षात २३ हजार १८७ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांची मदत मिळाली आहे. आतापर्यंत ९५ हजार ४०६ शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न केले असले तरी अद्यापही ४६ हजार ३०७ खाते विनाआधार आहेत. या खातेदारांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार प्रत्येकी तीन हप्त्यांत देण्याची घोषणा केली. त्यानुसार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात २ लाख ८८ हजार ४६८  शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी १ लाख ७८ हजार ३१५ शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला.त्यानंतर या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्याची अट घालण्यात आली. त्यानंतर १,३५,७३९ शेतकºयांच्या बँक खात्यात दुसरा हप्ता जमा करण्यात आला. ९६,०७४ शेतकऱ्यांना तिसरा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी खातेदार शेतकºयांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार पी.एम. किसान योजनेचा लाभ मिळालेल्या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये २.५ टक्के नावे केंद्र व २.५ टक्के लाभार्थी निवड जिल्हास्तरावर करण्यात आली. त्यानुसार या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आधार कार्ड संलग्न करण्यासाठी गावागावांत शिबिर घेण्यात येत आहेत.

तालुकानिहाय शेतकरी सहभागयोजनेमध्ये अचलपूर तालुक्यात २३ हजार ४२२ शेतकरी, अमरावती १७ हजार ५५४, अंजनगाव सुर्जी २१ हजार १७१, भातकुली १७ हजार ५०७, चांदूर रेल्वे १५ हजार ०७१,  चांदूर बाजार २५ हजार ५२५, चिखलदरा १२ हजार ५९५, दर्यापूर २३ हजार ६३८, धामणगाव रेल्वे २० हजार ८८३, धारणी १७ हजार ८१९, मोर्शी २४ हजार ७२५, नांदगाव खंडेश्वर २४ हजार ६६९, तिवसा १८ हजार ६३, तर वरूड तालुक्यात २५ हजार ८८१ शेतकºयांनी सहभाग नोंदविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  योजनेची जिल्हा स्थिती* अपलोड डेटा - २,८८,४६८* पहिला हप्ता - १,७८,३१५* दुसरा हप्ता - १,३५,७३९* तिसरा हप्ता - ९६,३७४* यंदा पहिला हप्ता- २३,१८७* आधार बाकी - ९५,४०६* आधार दुरुस्ती -४६३०७

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डFarmerशेतकरीAmravatiअमरावती