शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सहा महिन्यांत २२२ रस्ता अपघातात ४६ बळी; उपाययोजनांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 19:10 IST

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत.

- वैभव बाबरेकर

अमरावती : वाढती वाहने ही एक समस्या निर्माण झाली असून, रस्ता अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. सहा महिन्यांत अमरावती शहरात तब्बल २२२ अपघातांमध्ये ४६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नियमबाह्य वाहतुकीवर ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे. मात्र, प्रशासन विकासकामांचे कारण पुढे करून उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहे. 

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत. लाखोंच्या संख्येने दुचाकी, मोटारी, रस्त्यावर आल्याने व अधून-मधून विकासाच्या नावावे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नियम धाब्यावर बसून वाहनधारक मार्गक्रमण करीत आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच सिमेंटचे रस्ते उदयास येत असल्यामुळे वाहतुकीची ऐसीतैशी झालेली आहे. या कामांमध्ये अरुंद रस्त्यावर वाहतुकीचा वेग वाढला आहे.

वाढत्या अपघाताने जखमी, बळींची संख्याही वाढत चालली आहे. जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यांत शहरात तब्बल २२२ रस्ते अपघात घडले. त्यात ४६ जणांचा मृत्यू झाला. वर्षभरात ४५३ अपघातांमध्ये ९० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ११८ नागरिक गंभीर, तर २५८ किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा अपघाताच्या संख्येसोबत मृत्यू होण्याचीही संख्या वाढलेली आहे. सात वर्षांत ५४० जणांचे मृत्यूअमरावती शहरातील विविध मार्गांवर २०११ ते २०१७ दरम्यान सात वर्षांत तब्बल ३ हजार ६८७ अपघात झाले. यात ५४० जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ५२२ प्राणांतिक अपघात, ६०७ गंभीर अपघात, २ हजार ५५८ किरकोळ अपघात घडले आहेत. 

नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवावेवाहनांच्या अपघातातील मृत्युमुखी पडणारे बहुंताश १५ ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. अनेक अपघातांत कुटुंबप्रमुखांचाच मृत्यू झाला.  कमावता व्यक्ती गेल्यामुळे ते कुटुंबत उघड्यावर आले. रस्त्यावरचे बहुतांश अपघात रात्रीच्या वेळीच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालविताना आपली जबाबदारी व वाहतूक नियमांचे भान ठेवणे आवश्यक आहे. 

उपचाराअभावी मृत्यू अपघातानंतर जखमींवर वेळीच उपचारही होत नसल्याने मृत्यूची संख्या वाढत आहे. अनेकदा नागरिक जखमी अवस्थेत तासंतास पडून असतात, त्यांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यातच गंभीर जखमींना नागपूरला हलविताना वेळेत पोहचणे अशक्य झाल्यामुळेसुद्धा मृत्यू ओढवत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

अपघाताची कारणेअतिवेगाने आणि मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणे, नियमांचे उल्लंघन करणे, पुरेशी झोप न घेताच गाव गाठण्याची घाई करणे आदी कारणांनी अपघाताचा प्रसंग ओढवतो. याशिवाय खराब रस्ते, सुमार खड्डेही अपघातास कारणीभूत ठरतात. वाहनचालकांची चूक नसताना वाहन खड्ड्यात गेल्याने दरवर्षी हजारो अपघात घडतात आणि वाहनचालकांचे नाहक बळीही जातात. 

वाहतूक सुरक्षित व्हावी, यादृष्टीने विविध उपाययोजना सुरू असतात. त्या दृष्टीने नो-पार्किंग झोन तयार केले आहेत. नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. - रणजित देसाई, सहायक पोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती