शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सहा महिन्यांत २२२ रस्ता अपघातात ४६ बळी; उपाययोजनांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 19:10 IST

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत.

- वैभव बाबरेकर

अमरावती : वाढती वाहने ही एक समस्या निर्माण झाली असून, रस्ता अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. सहा महिन्यांत अमरावती शहरात तब्बल २२२ अपघातांमध्ये ४६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नियमबाह्य वाहतुकीवर ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे. मात्र, प्रशासन विकासकामांचे कारण पुढे करून उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहे. 

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत. लाखोंच्या संख्येने दुचाकी, मोटारी, रस्त्यावर आल्याने व अधून-मधून विकासाच्या नावावे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नियम धाब्यावर बसून वाहनधारक मार्गक्रमण करीत आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच सिमेंटचे रस्ते उदयास येत असल्यामुळे वाहतुकीची ऐसीतैशी झालेली आहे. या कामांमध्ये अरुंद रस्त्यावर वाहतुकीचा वेग वाढला आहे.

वाढत्या अपघाताने जखमी, बळींची संख्याही वाढत चालली आहे. जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यांत शहरात तब्बल २२२ रस्ते अपघात घडले. त्यात ४६ जणांचा मृत्यू झाला. वर्षभरात ४५३ अपघातांमध्ये ९० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ११८ नागरिक गंभीर, तर २५८ किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा अपघाताच्या संख्येसोबत मृत्यू होण्याचीही संख्या वाढलेली आहे. सात वर्षांत ५४० जणांचे मृत्यूअमरावती शहरातील विविध मार्गांवर २०११ ते २०१७ दरम्यान सात वर्षांत तब्बल ३ हजार ६८७ अपघात झाले. यात ५४० जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ५२२ प्राणांतिक अपघात, ६०७ गंभीर अपघात, २ हजार ५५८ किरकोळ अपघात घडले आहेत. 

नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवावेवाहनांच्या अपघातातील मृत्युमुखी पडणारे बहुंताश १५ ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. अनेक अपघातांत कुटुंबप्रमुखांचाच मृत्यू झाला.  कमावता व्यक्ती गेल्यामुळे ते कुटुंबत उघड्यावर आले. रस्त्यावरचे बहुतांश अपघात रात्रीच्या वेळीच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालविताना आपली जबाबदारी व वाहतूक नियमांचे भान ठेवणे आवश्यक आहे. 

उपचाराअभावी मृत्यू अपघातानंतर जखमींवर वेळीच उपचारही होत नसल्याने मृत्यूची संख्या वाढत आहे. अनेकदा नागरिक जखमी अवस्थेत तासंतास पडून असतात, त्यांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यातच गंभीर जखमींना नागपूरला हलविताना वेळेत पोहचणे अशक्य झाल्यामुळेसुद्धा मृत्यू ओढवत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

अपघाताची कारणेअतिवेगाने आणि मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणे, नियमांचे उल्लंघन करणे, पुरेशी झोप न घेताच गाव गाठण्याची घाई करणे आदी कारणांनी अपघाताचा प्रसंग ओढवतो. याशिवाय खराब रस्ते, सुमार खड्डेही अपघातास कारणीभूत ठरतात. वाहनचालकांची चूक नसताना वाहन खड्ड्यात गेल्याने दरवर्षी हजारो अपघात घडतात आणि वाहनचालकांचे नाहक बळीही जातात. 

वाहतूक सुरक्षित व्हावी, यादृष्टीने विविध उपाययोजना सुरू असतात. त्या दृष्टीने नो-पार्किंग झोन तयार केले आहेत. नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. - रणजित देसाई, सहायक पोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती