शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत २२२ रस्ता अपघातात ४६ बळी; उपाययोजनांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 19:10 IST

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत.

- वैभव बाबरेकर

अमरावती : वाढती वाहने ही एक समस्या निर्माण झाली असून, रस्ता अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. सहा महिन्यांत अमरावती शहरात तब्बल २२२ अपघातांमध्ये ४६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नियमबाह्य वाहतुकीवर ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे. मात्र, प्रशासन विकासकामांचे कारण पुढे करून उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहे. 

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत. लाखोंच्या संख्येने दुचाकी, मोटारी, रस्त्यावर आल्याने व अधून-मधून विकासाच्या नावावे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नियम धाब्यावर बसून वाहनधारक मार्गक्रमण करीत आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच सिमेंटचे रस्ते उदयास येत असल्यामुळे वाहतुकीची ऐसीतैशी झालेली आहे. या कामांमध्ये अरुंद रस्त्यावर वाहतुकीचा वेग वाढला आहे.

वाढत्या अपघाताने जखमी, बळींची संख्याही वाढत चालली आहे. जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यांत शहरात तब्बल २२२ रस्ते अपघात घडले. त्यात ४६ जणांचा मृत्यू झाला. वर्षभरात ४५३ अपघातांमध्ये ९० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ११८ नागरिक गंभीर, तर २५८ किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा अपघाताच्या संख्येसोबत मृत्यू होण्याचीही संख्या वाढलेली आहे. सात वर्षांत ५४० जणांचे मृत्यूअमरावती शहरातील विविध मार्गांवर २०११ ते २०१७ दरम्यान सात वर्षांत तब्बल ३ हजार ६८७ अपघात झाले. यात ५४० जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ५२२ प्राणांतिक अपघात, ६०७ गंभीर अपघात, २ हजार ५५८ किरकोळ अपघात घडले आहेत. 

नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवावेवाहनांच्या अपघातातील मृत्युमुखी पडणारे बहुंताश १५ ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. अनेक अपघातांत कुटुंबप्रमुखांचाच मृत्यू झाला.  कमावता व्यक्ती गेल्यामुळे ते कुटुंबत उघड्यावर आले. रस्त्यावरचे बहुतांश अपघात रात्रीच्या वेळीच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालविताना आपली जबाबदारी व वाहतूक नियमांचे भान ठेवणे आवश्यक आहे. 

उपचाराअभावी मृत्यू अपघातानंतर जखमींवर वेळीच उपचारही होत नसल्याने मृत्यूची संख्या वाढत आहे. अनेकदा नागरिक जखमी अवस्थेत तासंतास पडून असतात, त्यांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यातच गंभीर जखमींना नागपूरला हलविताना वेळेत पोहचणे अशक्य झाल्यामुळेसुद्धा मृत्यू ओढवत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

अपघाताची कारणेअतिवेगाने आणि मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणे, नियमांचे उल्लंघन करणे, पुरेशी झोप न घेताच गाव गाठण्याची घाई करणे आदी कारणांनी अपघाताचा प्रसंग ओढवतो. याशिवाय खराब रस्ते, सुमार खड्डेही अपघातास कारणीभूत ठरतात. वाहनचालकांची चूक नसताना वाहन खड्ड्यात गेल्याने दरवर्षी हजारो अपघात घडतात आणि वाहनचालकांचे नाहक बळीही जातात. 

वाहतूक सुरक्षित व्हावी, यादृष्टीने विविध उपाययोजना सुरू असतात. त्या दृष्टीने नो-पार्किंग झोन तयार केले आहेत. नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. - रणजित देसाई, सहायक पोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती