शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सहा महिन्यांत २२२ रस्ता अपघातात ४६ बळी; उपाययोजनांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 19:10 IST

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत.

- वैभव बाबरेकर

अमरावती : वाढती वाहने ही एक समस्या निर्माण झाली असून, रस्ता अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. सहा महिन्यांत अमरावती शहरात तब्बल २२२ अपघातांमध्ये ४६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नियमबाह्य वाहतुकीवर ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे. मात्र, प्रशासन विकासकामांचे कारण पुढे करून उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहे. 

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत. लाखोंच्या संख्येने दुचाकी, मोटारी, रस्त्यावर आल्याने व अधून-मधून विकासाच्या नावावे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नियम धाब्यावर बसून वाहनधारक मार्गक्रमण करीत आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच सिमेंटचे रस्ते उदयास येत असल्यामुळे वाहतुकीची ऐसीतैशी झालेली आहे. या कामांमध्ये अरुंद रस्त्यावर वाहतुकीचा वेग वाढला आहे.

वाढत्या अपघाताने जखमी, बळींची संख्याही वाढत चालली आहे. जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यांत शहरात तब्बल २२२ रस्ते अपघात घडले. त्यात ४६ जणांचा मृत्यू झाला. वर्षभरात ४५३ अपघातांमध्ये ९० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ११८ नागरिक गंभीर, तर २५८ किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा अपघाताच्या संख्येसोबत मृत्यू होण्याचीही संख्या वाढलेली आहे. सात वर्षांत ५४० जणांचे मृत्यूअमरावती शहरातील विविध मार्गांवर २०११ ते २०१७ दरम्यान सात वर्षांत तब्बल ३ हजार ६८७ अपघात झाले. यात ५४० जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ५२२ प्राणांतिक अपघात, ६०७ गंभीर अपघात, २ हजार ५५८ किरकोळ अपघात घडले आहेत. 

नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवावेवाहनांच्या अपघातातील मृत्युमुखी पडणारे बहुंताश १५ ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. अनेक अपघातांत कुटुंबप्रमुखांचाच मृत्यू झाला.  कमावता व्यक्ती गेल्यामुळे ते कुटुंबत उघड्यावर आले. रस्त्यावरचे बहुतांश अपघात रात्रीच्या वेळीच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालविताना आपली जबाबदारी व वाहतूक नियमांचे भान ठेवणे आवश्यक आहे. 

उपचाराअभावी मृत्यू अपघातानंतर जखमींवर वेळीच उपचारही होत नसल्याने मृत्यूची संख्या वाढत आहे. अनेकदा नागरिक जखमी अवस्थेत तासंतास पडून असतात, त्यांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यातच गंभीर जखमींना नागपूरला हलविताना वेळेत पोहचणे अशक्य झाल्यामुळेसुद्धा मृत्यू ओढवत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

अपघाताची कारणेअतिवेगाने आणि मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणे, नियमांचे उल्लंघन करणे, पुरेशी झोप न घेताच गाव गाठण्याची घाई करणे आदी कारणांनी अपघाताचा प्रसंग ओढवतो. याशिवाय खराब रस्ते, सुमार खड्डेही अपघातास कारणीभूत ठरतात. वाहनचालकांची चूक नसताना वाहन खड्ड्यात गेल्याने दरवर्षी हजारो अपघात घडतात आणि वाहनचालकांचे नाहक बळीही जातात. 

वाहतूक सुरक्षित व्हावी, यादृष्टीने विविध उपाययोजना सुरू असतात. त्या दृष्टीने नो-पार्किंग झोन तयार केले आहेत. नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. - रणजित देसाई, सहायक पोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती