शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

मेळघाटात तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४१ कोटींचा प्रस्ताव; आतापर्यंत व्याघ्र प्रकल्पातील १६ गावांचे पुनर्वसन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 5:11 PM

वाघांचे नियोजन, संरक्षण व्यवस्थेबाबत राज्यात अव्वल ठरणा-या मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत तलई, डोलार व पस्तलाई या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४१ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठविला आहे.

अमरावती : वाघांचे नियोजन, संरक्षण व्यवस्थेबाबत राज्यात अव्वल ठरणा-या मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत तलई, डोलार व पस्तलाई या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४१ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. त्यामुळे येत्या काळात या तीन गावांचे पुनर्वसन होणार असून, अतापर्यंत १६ गावांचे पुनर्वसन झाले आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ११३ गावे बफर झोनमध्ये असून, २२ गावे अतिसंरक्षित (कोअर) क्षेत्रात आहे. आतापर्यंत १६ गावांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र, प्राधान्याने १७ गावांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. मात्र, राज्य शासनाने गावांच्या पुनर्वसनासाठी नवा आदेश जारी केल्यामुळे प्रस्तावित १७ गावांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे. १७ गावात ३२०० च्यावर कुटुंबातील सदस्य संख्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. वाघांचे संगोपन आणि जंगलाच्या सुरक्षिततेसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येणाºया गावांचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे. गत १० वर्षांपूर्वी २२ गावांच्या पुनर्वसनासाठी ४०० कोटींची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला  होता. मात्र, आता १० वर्षांनंतर जमिनीचे दर, कुटुंबात १८ वर्षांवरील सदस्यांची वाढलेली संख्या बघता १७ गावांच्या पुनर्वसनासाठी किमान ५५० कोटींपेक्षा जास्त निधी लागणार अशी माहिती आहे. घरे, शेती, कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार चारपट खर्च जास्त सामाविष्ट करून १७ गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव नव्याने पाठविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात प्राधान्याने गुगामल वन्यजीव परिक्षेत्रातील डोलार, पस्तलाई, तर अकोट वन्यजीव विभागातंर्गत तलई या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४१ कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून लवकरच एनटीसीएकडून अनुदान प्राप्त होईल, असे संकेत आहेत. नव्या शासननिर्णयानुसार १८ वर्षांवरील मुले, मुलींना प्रति १० लाख रुपये मोबदला, तर शेती ताब्यात घेताना रेडीरेकनरनुसार चारपट रक्कम देण्याची नियमावली आहे. तलई येथे १७८, पस्तलाई १८८ व डोलार या गावची ११५ कुंटुबसंख्या आहे. तिन्ही गावांचे पुनर्वसन करताना सुमारे ४८१  लोकसंख्या तर शेकडो गुरांची संख्या बाधित होणार आहे. या तिन्ही गावांमध्ये सर्वाधिक आदिवासी बांधव असून, रोजगार, शिक्षण, आरोग्य, मूलभूत प्रश्न आणि समस्या लक्षात घेऊन गावांचे पुनर्वसन करावे लागणार असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भूमापक विलास देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ही १७ गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतमेळघाट व्याघ्र प्रकल्पातील १६ गावांचे पुनर्वसन यापूर्वीच झाले आहे. मात्र, अद्यापही १७ गावांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. यात सिपना वन्यजीव अंतर्गत सेमाडोह, पिली, माखला, माडीझरप, रायपूर, रेट्याखेडा, बोराट्याखेडा, चोपन, तर गुगामल अंतर्गत डोलार, मेमनाल पस्तलाई, अढाव, ढाकणा, मांगिया, रोरा, मालूर आणि अकोट वन्यजीव अंतर्गत तलई अशा १७ गावांचा समावेश आहे.गावांचे पुनर्वसन ऐच्छिक आहे. तलई, डोलार व पस्तलाई या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे. त्याअनुषंगाने ४१ कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मान्य होताच पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होईल.                                      - एम.एस. रेड्डीक्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :AmravatiअमरावतीTigerवाघ