शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

९० दिवसांत ३४ टक्केच पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:09 IST

यंदाच्या खरिपाला तीन महिने झाले असताना अद्याप १,०७१ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. शेतकरी अडचणीत असताना बँका त्यांना कर्जपुरवठा करीत नसल्यानेच कर्जवाटपाचा टक्का माघारला. यंदा जिल्ह्यास १६३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ५७,८८६ शेतकऱ्यांना ५५८ कोटी ३७ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. याची टक्केवारी ३४ एवढी आहे.

ठळक मुद्देनियंत्रण कुणाचे? : सोयाबीन, मूग, उडदाचा हंगाम झाल्यागत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपाला तीन महिने झाले असताना अद्याप १,०७१ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. शेतकरी अडचणीत असताना बँका त्यांना कर्जपुरवठा करीत नसल्यानेच कर्जवाटपाचा टक्का माघारला. यंदा जिल्ह्यास १६३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ५७,८८६ शेतकऱ्यांना ५५८ कोटी ३७ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. याची टक्केवारी ३४ एवढी आहे.सलग पाच वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. शासनाने आतापर्यंत १.३१ लाख शेतकºयांची कर्जमाफी केली. या सर्व शेतकºयांचा सात-बारा कोरा केल्याचा शासनाचा दावा आहे. त्यामुळे या १.३१ लाख शेतकºयांसह ५० हजार नियमित कर्जदार व १० हजार नवे खातेदार, अशा एकूण दोन लाख शेतकºयांना बँकांनी कर्ज देण्यास कोणतीही अडचण नसताना कर्ज नाकारल्याचे वास्तव आहे. बँका शासन, प्रशासनाच जुमानत नाहीत, तर न्याय मागावा तरी कुणाला, असा शेतकºयांचा सवाल आहे.यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यातील बँकांना १,६३० कोटींचे लक्ष्यांक आहे. यातुलनेत आॅगस्ट अखेरपर्यंत ५७८८६ खातेदारांना ५५८.३७ कोटींचे वाटप केले. ही ३४ टक्केवारी आहे. यामध्ये व्यापारी बँकांना १,०९६ कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ३६,२३६ शेतकºयांना ४००.२५ कोटींचे वाटप झाले आहे. वाटपाची ही ३७ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना १४ कोटींचे लक्ष्यांक असताना ४१६ शेतकºयांना ३.७२ कोटींचे वाटप करण्यात आले, याची ३६ ही टक्केवारी आहे. शेतकºयांची बँक म्हणवणाºया जिल्हा बँकेला ५२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २१,२३४ शेतकºयांना १५४.४० कोटींचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे याची ही ३० टक्केवारी आहे.कर्जवाटपात जिल्हा बँक माघारलीजिल्हा बँकेचे सर्वाधिक खातेदार असताना जिल्हा बँक सध्या कर्जवाटपात माघारली आहे. जून महिन्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा बँकेचे होते. नंतर मात्र, या बँकेने हात आखूडता घेतला. जुलैनंतर कर्जवाटपच थांबविले होते. वास्तविकता ७०,१४० खातेदारांच्या २९४ कोटींच्या कर्जमाफीनंतर जिल्हा बँकेचा एनपीए खूप कमी झाला असताना कर्जवाटपात कमी होत असल्याचे वास्तव आहे.दहाव्या ग्रीन लिस्टची प्रतीक्षाकर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत १,३०,९११ खातेदारांची ८०६ कोटी ७३ लाख २६ हजारांची कर्जमाफी करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात कर्जमाफीच्या नऊ ग्रीन लिस्ट जाहीर झाल्यात. जिल्ह्यात १,९७,७९१ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. अद्यापही किमान ५० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. या शेतकºयांना दहाव्या ग्रीन यादीची प्रतीक्षा आहे.