शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

९० दिवसांत ३४ टक्केच पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:09 IST

यंदाच्या खरिपाला तीन महिने झाले असताना अद्याप १,०७१ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. शेतकरी अडचणीत असताना बँका त्यांना कर्जपुरवठा करीत नसल्यानेच कर्जवाटपाचा टक्का माघारला. यंदा जिल्ह्यास १६३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ५७,८८६ शेतकऱ्यांना ५५८ कोटी ३७ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. याची टक्केवारी ३४ एवढी आहे.

ठळक मुद्देनियंत्रण कुणाचे? : सोयाबीन, मूग, उडदाचा हंगाम झाल्यागत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपाला तीन महिने झाले असताना अद्याप १,०७१ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. शेतकरी अडचणीत असताना बँका त्यांना कर्जपुरवठा करीत नसल्यानेच कर्जवाटपाचा टक्का माघारला. यंदा जिल्ह्यास १६३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ५७,८८६ शेतकऱ्यांना ५५८ कोटी ३७ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. याची टक्केवारी ३४ एवढी आहे.सलग पाच वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. शासनाने आतापर्यंत १.३१ लाख शेतकºयांची कर्जमाफी केली. या सर्व शेतकºयांचा सात-बारा कोरा केल्याचा शासनाचा दावा आहे. त्यामुळे या १.३१ लाख शेतकºयांसह ५० हजार नियमित कर्जदार व १० हजार नवे खातेदार, अशा एकूण दोन लाख शेतकºयांना बँकांनी कर्ज देण्यास कोणतीही अडचण नसताना कर्ज नाकारल्याचे वास्तव आहे. बँका शासन, प्रशासनाच जुमानत नाहीत, तर न्याय मागावा तरी कुणाला, असा शेतकºयांचा सवाल आहे.यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यातील बँकांना १,६३० कोटींचे लक्ष्यांक आहे. यातुलनेत आॅगस्ट अखेरपर्यंत ५७८८६ खातेदारांना ५५८.३७ कोटींचे वाटप केले. ही ३४ टक्केवारी आहे. यामध्ये व्यापारी बँकांना १,०९६ कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ३६,२३६ शेतकºयांना ४००.२५ कोटींचे वाटप झाले आहे. वाटपाची ही ३७ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना १४ कोटींचे लक्ष्यांक असताना ४१६ शेतकºयांना ३.७२ कोटींचे वाटप करण्यात आले, याची ३६ ही टक्केवारी आहे. शेतकºयांची बँक म्हणवणाºया जिल्हा बँकेला ५२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २१,२३४ शेतकºयांना १५४.४० कोटींचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे याची ही ३० टक्केवारी आहे.कर्जवाटपात जिल्हा बँक माघारलीजिल्हा बँकेचे सर्वाधिक खातेदार असताना जिल्हा बँक सध्या कर्जवाटपात माघारली आहे. जून महिन्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा बँकेचे होते. नंतर मात्र, या बँकेने हात आखूडता घेतला. जुलैनंतर कर्जवाटपच थांबविले होते. वास्तविकता ७०,१४० खातेदारांच्या २९४ कोटींच्या कर्जमाफीनंतर जिल्हा बँकेचा एनपीए खूप कमी झाला असताना कर्जवाटपात कमी होत असल्याचे वास्तव आहे.दहाव्या ग्रीन लिस्टची प्रतीक्षाकर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत १,३०,९११ खातेदारांची ८०६ कोटी ७३ लाख २६ हजारांची कर्जमाफी करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात कर्जमाफीच्या नऊ ग्रीन लिस्ट जाहीर झाल्यात. जिल्ह्यात १,९७,७९१ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. अद्यापही किमान ५० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. या शेतकºयांना दहाव्या ग्रीन यादीची प्रतीक्षा आहे.