शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या पाणीपुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरची वाढ

By admin | Updated: May 13, 2015 00:33 IST

शहरात साधारणत: ९५ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, उन्हाळ्याच्या दृष्टीने आता दररोज १२० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीअमरावती : शहरात साधारणत: ९५ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, उन्हाळ्याच्या दृष्टीने आता दररोज १२० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची मागणी वाढल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरने वाढ करण्यात आली आहे. मोर्शीजवळील सिंभोरा धरणावरून अमरावतीच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईन लाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. त्याकरिता सिभोंरा धरणावर २४ तास पाच पाण्याचे पंप सुरुच असतात. साधारणत: हिवाळा व पावसाळ्यात नागरिक पाण्याचा वापर कमी करतात. मात्र, उन्हाळ्यात नागरिकांना अधिक पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात उन्हाच्या दाहकतेने पाणी पिण्याचे प्रमाणही वाढते. तसेच थंड हवेसाठी घराघरात कुलरसुध्दा लागतात. त्यामुळे सर्वाधिक पाण्याचा वापर उन्हाळ्यात होत आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी पुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरने वाढ केली आहे. जलशुध्दीकरण केंद्राची मर्यादा ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावयाचे असतानाही मर्यादेपेक्षा अधिक १२० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा शहराला केला जात आहे. उन्हाळ्यात नागरिक पाण्याचा अपव्यय अधिक प्रमाणात करतात. त्यातच पाणी गळतीचे प्रमाणही ३० टक्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठ्यात वाढ केली आहे. मजीप्राकडे ८० हजार ग्राहकशहरात ८० हजार ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. त्यामध्ये घरगुती नळ, सावर्जनिक नळ व कमर्शियल जोडणीधारक आहेत. हिवाळा व पावसाळ्यात नागरिकांना ८० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्यात पाणी मागणी वाढत असल्यामुळे ८० हजार ग्राहकांनाच १२० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत आहे. ११ हजार ग्राहकांना अधिकृत पाणीपुरवठामजीप्राच्या सुवर्ण जंयती महोत्सवी वर्षा अतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी खासगी नळजोडणी योजना कार्यान्वित करणार आहे. त्याकरिता ११ हजार ग्राहकांना हक्काचे पाणी मिळणार आहे. पाणीपुरवठ्यात ३० टक्के गळती असून सर्वाधिक गळती मागासवस्तीत आहे. त्यातच सावर्जनिक नळावर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा निधी महापालिकेकडे जमा झाला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात निधी वळती करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. या योजनेत प्रत्येक नळ जोडणीधारकांसाठी शासन ४ हजार रुपये खर्चसुध्दा करणार आहेत.