शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

मानव- वन्यजीव संघर्षात विदर्भ ‘हॉट’; वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात २५ जण लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 12:38 IST

संचार क्षेत्र आणि भक्ष्य कमी पडत असल्याने वन्यजीव दुसरीकडे धाव घेत आहे. वाघ, बिबट्याच्या भ्रमंतीमुळेच मानव- वन्यजीव संघर्ष वाढला आहे.

ठळक मुद्देगडचिरोली, ताडोबा, गाेंदिया संवेदनशील

गणेश वासनिक

अमरावती : मनुष्य जंगलाकडे तर वन्यजीव नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहे. परिणामी मानव- वन्यजीव संघर्षाचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: विदर्भात मानव- वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात २५ जणांना लक्ष्य करण्यात आले आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने वन विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

विदर्भातीलवाघांच्या भ्रमंती मार्गाचे कॉरिडॉर बदलत आहे. ताडोबा- अंधारी, मध्य चांदा येथील वाघ यवतमाळ जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे. तर यवतमाळच्या टिपेश्वर येथील वाघ किनवटच्या जंगलाकडे धाव घेत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट हे सातपुडा पर्वत रांगेतून काटेपूर्णा, अकाेला, वाशिमपर्यंत स्थिरावत आहेत. पांढरकवडा, अमरावती वन विभागातील वाघांनी नवे संचार मार्ग शोधले आहे. गडचिरोली भंडारा, गोंदियातील वाघ हे नागपूर, काटोल, कळमेश्वरच्या जंगलात येत आहे. संचार क्षेत्र आणि भक्ष्य कमी पडत असल्याने वन्यजीव दुसरीकडे धाव घेत आहे. वाघ, बिबट्याच्या भ्रमंतीमुळेच मानव- वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे वन खात्याने यवतमाळ, नागपूर येथे नव्याने रेस्क्यू पथक स्थापन केले आहे.

येथेही मानवाला मृत्यू ओढवले

- ताडोबा येथील टी-१ नामक वाघाने २०२० मध्ये अमरावतीच्या मंगरुळ दस्तगीर येथील एका शेतकऱ्याला ठार केले होते.

- यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्यात येथे २०१९ मध्ये अवनी नामक वाघिणीने १३ जणांना ठार केले होते.

- बुलडाणा जिल्ह्यात वाघ, अस्वलीच्या हल्ल्यात तीन जणांना मृत्यू ओढवला.

- भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही मनुष्यावर वन्यजीवांचे हल्ले निरंतर सुरू आहे

चंद्रपूर जिल्ह्यात पोस्टींग नको?

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वनसंपदा आहे. चंद्रपूर ही वन विभागाची काशी मानली जाते. येथे नव्या आयएफएस अधिकाऱ्याना बरेच काही शिकता येते. मात्र, मानव- वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने येथे वन अधिकारी नियुक्ती होऊ नये, यासाठी लॉबिंग करतात. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांनी चंद्रपूर, गङचिरोली जागत आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा आणि जंगलालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये सुरक्षितता प्रदान करण्याच्या अनुषंगाने अमरावतीत १० मे रोजी राज्यातील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यात मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला. रेस्क्यू पथकही गठित केले आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र

टॅग्स :forest departmentवनविभागTigerवाघDeathमृत्यूSocialसामाजिकVidarbhaविदर्भ