शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत २४ टक्के पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 17:28 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक कमी ७ टक्केच पाणीसाठा आहे.

संदीप मानकर

अमरावती - पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. यामध्ये बुलडाणाअमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. परिणामी पुढील पावसाळ्यापर्यंत तीन महिने पाण्याचे नियोजन योग्यरीत्या जलसंपदा विभागासह संबंधित यंत्रणेला करावे लागणार आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक कमी ७ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सिंचनाला देण्यात येणारे पाणी यापूर्वीच थांबविण्यात आले आहे. यंदा पाणीटंचाईची झळ नागरिकांना आतापासूनच जाणवू लागली आहे. विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत फक्त २५.४५ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांत ३३.४२ टक्के, ४६९ लघु प्रकल्पांत फक्त १८.८९ टक्के अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२९६.१६ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ८२०.६३ दलघमी आहे. 

अमरावती जिल्ह्यातील एकूण ८५ प्रकल्पांत २६.३८ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत सर्वाधिक ३४.२३ टक्के पाणीसाठा, अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत २६.३८ टक्के पाणीसाठा, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत २०.२६ टक्के पाणीसाठा, बुलडाणा जिल्ह्यातील १०५ प्रकल्पांत सर्वात कमी ७.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

उर्ध्व वर्धा प्रकल्पात २२.९९ टक्के पाणीसाठा

विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत २५.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे उर्ध्व वर्धा धरणात २२.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक  आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ४६.६३ टक्के पाणीसाठा अरुणावती प्रकल्पात २९.३८ टक्के, बेंबळा प्रकल्पात २७.५४ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ३१.१६ टक्के, वान प्रकल्पात ५३.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ११.३१ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात सर्वात कमी  २.९५  टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात  चिंता वाढली आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावतीbuldhanaबुलडाणा