शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत २४ टक्के पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 17:28 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक कमी ७ टक्केच पाणीसाठा आहे.

संदीप मानकर

अमरावती - पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. यामध्ये बुलडाणाअमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. परिणामी पुढील पावसाळ्यापर्यंत तीन महिने पाण्याचे नियोजन योग्यरीत्या जलसंपदा विभागासह संबंधित यंत्रणेला करावे लागणार आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक कमी ७ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सिंचनाला देण्यात येणारे पाणी यापूर्वीच थांबविण्यात आले आहे. यंदा पाणीटंचाईची झळ नागरिकांना आतापासूनच जाणवू लागली आहे. विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत फक्त २५.४५ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांत ३३.४२ टक्के, ४६९ लघु प्रकल्पांत फक्त १८.८९ टक्के अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२९६.१६ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ८२०.६३ दलघमी आहे. 

अमरावती जिल्ह्यातील एकूण ८५ प्रकल्पांत २६.३८ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत सर्वाधिक ३४.२३ टक्के पाणीसाठा, अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत २६.३८ टक्के पाणीसाठा, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत २०.२६ टक्के पाणीसाठा, बुलडाणा जिल्ह्यातील १०५ प्रकल्पांत सर्वात कमी ७.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

उर्ध्व वर्धा प्रकल्पात २२.९९ टक्के पाणीसाठा

विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत २५.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे उर्ध्व वर्धा धरणात २२.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक  आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ४६.६३ टक्के पाणीसाठा अरुणावती प्रकल्पात २९.३८ टक्के, बेंबळा प्रकल्पात २७.५४ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ३१.१६ टक्के, वान प्रकल्पात ५३.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ११.३१ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात सर्वात कमी  २.९५  टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात  चिंता वाढली आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावतीbuldhanaबुलडाणा