शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत २४ टक्के पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 17:28 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक कमी ७ टक्केच पाणीसाठा आहे.

संदीप मानकर

अमरावती - पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. यामध्ये बुलडाणाअमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. परिणामी पुढील पावसाळ्यापर्यंत तीन महिने पाण्याचे नियोजन योग्यरीत्या जलसंपदा विभागासह संबंधित यंत्रणेला करावे लागणार आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक कमी ७ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सिंचनाला देण्यात येणारे पाणी यापूर्वीच थांबविण्यात आले आहे. यंदा पाणीटंचाईची झळ नागरिकांना आतापासूनच जाणवू लागली आहे. विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत फक्त २५.४५ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांत ३३.४२ टक्के, ४६९ लघु प्रकल्पांत फक्त १८.८९ टक्के अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२९६.१६ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ८२०.६३ दलघमी आहे. 

अमरावती जिल्ह्यातील एकूण ८५ प्रकल्पांत २६.३८ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत सर्वाधिक ३४.२३ टक्के पाणीसाठा, अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत २६.३८ टक्के पाणीसाठा, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत २०.२६ टक्के पाणीसाठा, बुलडाणा जिल्ह्यातील १०५ प्रकल्पांत सर्वात कमी ७.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

उर्ध्व वर्धा प्रकल्पात २२.९९ टक्के पाणीसाठा

विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत २५.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे उर्ध्व वर्धा धरणात २२.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक  आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ४६.६३ टक्के पाणीसाठा अरुणावती प्रकल्पात २९.३८ टक्के, बेंबळा प्रकल्पात २७.५४ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ३१.१६ टक्के, वान प्रकल्पात ५३.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ११.३१ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात सर्वात कमी  २.९५  टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात  चिंता वाढली आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावतीbuldhanaबुलडाणा