शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

२१ कोटींचे रेतीघाट तस्करांच्या घशात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 5:00 AM

धामणगाव रेल्वे तालुका रेतीघाटाच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा तालुका म्हणून ओळखले जाते. वर्धा नदीच्या पात्रात तालुक्यात आष्टा, गोकुळसरा, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, नायगाव, इसापूर, रायपूर कासारखेडा, चिंचोली, विटाळा, निंबापूर हे रेतीघाट येतात. या घाटांचा सन २०१५-१६ या वर्षात लिलाव होऊन तब्बल २१ कोटी ५४ लाख रुपयांचा महसूल या तालुक्याला मिळाला होता.

ठळक मुद्देधामणगावात दरवर्षी खड्डा : चार वर्षांपासून लिलावात हुलकावणी

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील वर्धा नदीपात्रात असलेल्या सात रेतीघाटांना चार वर्षांपासून ई-लिलावात हुलकावणी मिळत आहे. त्यामुळे मागे पडलेल्या या घाटांतील रेतीचा २१ कोटींचा महसूल तस्करांच्या घशात जात आहे. या सातही रेतीघाटांवर दरवर्षी खड्डे दिसून येतात.धामणगाव रेल्वे तालुका रेतीघाटाच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा तालुका म्हणून ओळखले जाते. वर्धा नदीच्या पात्रात तालुक्यात आष्टा, गोकुळसरा, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, नायगाव, इसापूर, रायपूर कासारखेडा, चिंचोली, विटाळा, निंबापूर हे रेतीघाट येतात. या घाटांचा सन २०१५-१६ या वर्षात लिलाव होऊन तब्बल २१ कोटी ५४ लाख रुपयांचा महसूल या तालुक्याला मिळाला होता. त्यानंतर चार वर्षांमध्ये या रेतीघाटाचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे रेती उत्खनन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.रेतीघाटांचा लिलाव करण्यापूर्वी जनसुनावणी व उत्खनन करावयाच्या नदीपात्राच्या खोलीसंदर्भात पर्यावरण विभागाकडून मंजुरी घ्यावी लागते. जिल्ह्यातील पर्यावरण विभागाचे अधिकारी रेतीघाट पाहणी व मोजणीसाठी येतात. या नदीच्या पात्रात काही ठिकाणी रेती असते, तर काही ठिकाणी पात्र खोल गेल्याचे दिसते. विशेष म्हणजे, पर्यावरण विभागाचे अधिकारी मोजणीसाठी आले असताना, काही रेती तस्कर स्वत: हजर राहून पर्यावरण विभागाची दिशाभूल करतात.लिलाव झाला नसला तरी मागील वर्षी रेतीघाटात खोल खड्डे कसे झाले, यासंदर्भात पर्यावरण विभाग महसूल प्रशासनाची परीक्षा घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. काहीअंशी पर्यावरण विभाग आणि जिल्हास्तरीय यंत्रणेकडून परवानगी मिळाली, तर राज्याच्या पर्यावरण विभागाची अनुमती दर्शविण्यास उशीर होतो. त्यानंतर ई-प्रकिया लिलावात हे रेतीघाट अडकतात व अवैध उत्खननाचा फायदा रेती तस्कर घेत असल्याच दरवर्षीचे चित्र आहे.भरारी पथक नावापुरतेचतालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने तहसीलदारांच्या नेतृत्वात या घाटांचे संरक्षण करण्यासाठी दरवेळी भरारी पथके नेमली जातात. या पथकाने इमाने-इतबारे काम करणे गरजेचे आहे. सोन्यासारखा भाव रेतीला असताना, भरारी पथकाचे नेमके या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होते. भरारी पथक गौण खनिज उत्खनन करणाऱ्या पथकावर कारवाईसाठी घटनास्थळावर दाखल होण्यापूर्वीच त्यांना फोन जातात. त्यामुळे या पथकाच्या हाती काहीच मिळत नाही. दरवर्षी रेतीने भरलेले नदीचे पात्र कसे सपाट होते, याविषयी मोबाईल सीडीआर तपासावे अथवा घाटाचा लिलाव होण्यापूर्वीच्या कालावधीत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. गौण खनिजातील गौडबंगाल पुढे येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :sandवाळू