शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
3
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
4
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
5
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
6
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
7
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
8
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
9
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
10
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
11
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
12
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
13
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
14
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
15
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
16
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
17
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
18
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
19
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
20
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती शहरात सहा महिन्यांत २० खून, हल्ल्यात २३ जण मरता-मरता वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:55 IST

Amravati : अलीकडे शहराचा खूपच विस्तार झाला आहे. त्यामुळे तपोवन व एमआयडीसी या भागात नव्या पोलिस ठाण्याची गरज आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर आयुक्तालयात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण २० खून नोंदविले गेले, तर खुनाचा प्रयत्न या शीर्षकाखाली एकूण २३ एफआयआर नोंदविले गेले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहा महिन्यात खुनाच्या गुन्ह्यात सहाने वाढ नोंदविली गेली. मात्र, त्याचवेळी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सातने घट नोंदविली गेली.

कोल्ड पत्नीचा ब्लडेड मर्डर करून तिचा मृतदेह घरात दडवून पती पसार झाला होता. २ जानेवारी रोजी भीमटेकडी रोडवरील भोवते ले आऊटमध्ये ती घटना उजेडात आली होती, तर १ फेब्रुवारी रोजी तपोवन परिसरातील संस्कृती नामक तरूणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २३ फेब्रुवारी रोजी रहाटगाव येथील फार्म हाऊसमध्ये पती पत्नीचा मृतदेह आढळून आला होता. त्यात तीन दिवसांनी मृत पतीविरुद्ध पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २ मार्च रोजी स्थानिक मसानगंज भागात आदर्श गुप्ता याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्येच हार्डकोअर क्रिमिनल गोंडीचा खून झाला होता.

वसंत चौकात फायर४ एप्रिल रोजी वसंत चौकातील एका पानमटेरियल दुकानावर देशी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता. गुटख्याची तस्करी व वर्चस्ववादातून घडलेल्या त्या घटनेमुळे शहर हादरले.

रागाने बघितले तरीही चाकूवाहनाचा कट जरी लागला तरी तरूण गुन्हेगारांकडून चायना चाकू उगारला जातो. रागाने बघितले तरीही चाकू काढल्याचे उदाहरणे आहेत.

शहरात नशेखोरीला उतशहरात गेल्या काही वर्षांपासून नशेखोरीला उत आला आहे. शहरात अलीकडे एमडी ड्रग्सदेखील पकडण्यात आले. तर काही ठिकाणांहून गांजादेखील जप्त करण्यात आला.

सहा महिन्यात किती खून ?शहराचा तार झाला के तपोवन पडीसी या या पोलिस गरज आहे. शहरातील दहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते जून या कालावधीत २० जणांचे खून करण्यात आले. तर २३ जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

क्राईमची दमदार कारवाईबहुतांश खुनाच्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात शहर गुन्हे शाखेची दोन्ही युनिट फ्रंटफूटवर राहिली. क्राईम युनिटनेच खुनाच्या अनेक आरोपींचा त्वरेने शोध लावला.

२३ जण मरता मरता वाचलेशहर आयुक्तालयात गेल्या सहा महिन्यात बीएनएसच्या कलम १०९ अन्वये २३ एफआयआर नोंदविले गेले. त्या २३ जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ते मरता मरता वाचले.

सर्वात जास्त खून घडले खुन्नसमधून, वैमनस्यातूनयंदाच्या पहिल्या सहा महिन्यात २० जणांचे खून करण्यात आले. त्यात खुनाच्या सर्वाधिक घटना या आपसी वैर, वर्चस्ववाद व खुन्नस दिल्याच्या कारणावरून झाल्याचे निरीक्षण आहे.

"शहराची व्याप्ती अलीकडे अधिकच वाढली आहे. त्यामुळे पोलिसांवरदेखील अधिक ताण येतो. यंदाच्या सहा महिन्यात खुनाचे गुन्हे वाढले असले, तरी खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोठी घट झाली आहे."- शिवाजीराव बचाटे, एसीपी, क्राईम 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती