शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना आता 20 लाखांची आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 14:15 IST

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना किंवा जखमी झालेल्या व्यक्तींना वनविभागाकडून शासनाची अल्प प्रमाणात मदत मिळत होती.

अमरावती - वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या दुर्घटना घडत आहेत. त्यातच बिबट्याचा वावर मानवी वस्तीत सातत्याने होत असून बिबट्याच्या हल्ल्यांचं प्रमाणही वाढलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ केली आहे. यापूर्वी, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना किंवा जखमी झालेल्या व्यक्तींना वनविभागाकडून शासनाची अल्प प्रमाणात मदत मिळत होती.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आधी 15 लाख रुपये एवढी मदत मिळत असताना ती मदत कमी असून ती 15 लाखाहून 20 लाख रुपये करण्यात यावी,अशी मागणी अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आ. प्रविण पोटे पाटील यांनी राज्य शासनाकडे केली होती. राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी दखल घेऊन वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास त्याचे परिवारास आता १५ लाखा ऐवजी २० लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. याबाबतचे आदेश वनमंत्रालयाकडून जारीही करण्यात आले आहेत. 

याबाबत स्वत: ना. सुधिर मुनगंटीवार यांनी माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील यांना पत्राद्वारे माहिती कळविली आहे. या पत्रात असेही दर्शविले आहे की, जर कोणत्याही व्यक्तीचा वन्य प्राण्याने हल्ला केल्यास मृत्यू झाला तर त्याच्या परिवारास त्वरीत १० लाख रुपयाची मदत करण्यात येईल. तसेच उर्वरित १० लाख रुपयाची रक्कम त्याच्या संयुक्त बँक खात्यात फिक्स डिपॉजिटमध्ये जमा करण्यात येईल. जेणेकरुन मृतकाच्या परिवारास दरमहा व्याजाची रक्कम मदत मिळेल. तसेच, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये व गंभीर जखमी झाल्यास १.२५ लाख रुपयाची मदत देण्यात येईल, अशी माहिती माजी मंत्री आमदार प्रवीण पोटे यांनी दिली. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारwildlifeवन्यजीवMLAआमदारforestजंगल