शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलसाठी १९६.९२ कोटी, राज्यात १,००३ पाणीपुरवठा योजना राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 17:15 IST

 अमरावती  - राज्यात भूजलस्तरात घट झाली आहे. भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, मराठवाडा, विदर्भातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही दाहकता लक्षात घेत शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण  पेयजल कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ पाणीपुरवठा योजनेकरिता १९६ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले आहे.     पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा क्षेत्रात ...

 अमरावती  - राज्यात भूजलस्तरात घट झाली आहे. भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, मराठवाडा, विदर्भातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही दाहकता लक्षात घेत शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण  पेयजल कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ पाणीपुरवठा योजनेकरिता १९६ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले आहे.

     पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व ग्रामीण जनतेस स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविला जात आहे. यात एकूण १,००३ नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, १७ जानेवारी २०१८ रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून २६२ कोटी ६३ लाख ४४ हजार रूपये किमतीच्या ११९ पाणीपुरवठा योजना वगळण्यात आल्या आहेत. या ११९ पाणीपुरवठा योजना अन्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. नव्याने २५ ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय झाला असला तरी कायम पाण्याचे स्त्रोत न तपासता पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरवर्षी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर हजारो कोेटी रूपये खर्च होत असताना पाण्याची समस्या दूर होत नाही, हे वास्तव आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्यापूर्वी कायम पाण्याचे स्त्रोत निवडले जात नाही. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समितीमार्फत ही योजना राबविली जात असल्यामुळे त्यावर खर्च होणारा निधी व्यर्थ ठरत असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखा परीक्षणातून यापूर्वी स्पष्ट झाले आहे. 

 येथे राबविणार नवीन पाणीपुरवठा योजनाजालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, खेडगाव व जालना तालुक्यातील ९२ गावांचा ग्रीड पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील पालम व गंगाखेड तालुक्यातील ६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेत आहेत. बीड जिल्ह्यातील दिंद्रुड, औरंगाबादच्या सावरखेड, लातूरचे तळणी तर सांगली जिल्ह्यातील येलूर, नायगाव, शिरगाव, पडवळवाडी, शेखरवाडी, कोळे ही गावे समाविष्ट केली  आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद, उमळवाड, घालवाल, बुबनाळ, राक्षी, धबधबेवाडी, निकमवाडी, पिंपळे, सातवे, जाफळे, कणेरी, शेंबवणे, मानोली, सावर्डे खु., परखंदळे, जाधववाडी, येलूर या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :WaterपाणीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार