शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

453 गावांत जलयुक्तची 1525 कामे अपूर्ण; पश्चिम विदर्भाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:28 IST

४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा यंत्रणेचा दावा

- गजानन मोहोड

अमरावती : ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र अन् टँकरमुक्त जिल्हा’ असा गाजावाजा करीत यापूर्वीच्या सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही योजना सन २०१५-१६ पासून राबविली. सद्यस्थितीत राज्य शासनाद्वारा ही योजना गुंडाळणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान या चार वर्षांत चार हजार ३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा  अंमलबजावणी यंत्रणांनी केला आहे. पश्चिम विदर्भात अद्यापही ४५३ गावांमधील १५२५ कामे अपूर्ण असल्याचे वास्तव आहे.

सलगचा दुष्काळ, नापिकी अन् पाणीटंचाई पाचवीलाच पुजली असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार हा ड्रिम प्रोजेक्ट दुष्काळबहुल जिल्ह्यांमध्ये राबविला. याअंतर्गत पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत सन २०१५-१६ मध्ये १३९६, सन २०१६-१७ मध्ये ९९७, सन २०१७-१८ मध्ये १०३५ व सन २०१८-१९ या वर्षात १३६३ असे एकूण ४७९६ गावांमध्ये ही योजना राबविली. या कालावधीत सन २०१५-१६ मध्ये ५० हजार ३८, सन २०१६-१७ मध्ये १८ हजार ७०७, सन २०१७-२०१९ मध्ये २७ हजार ८९२ व सन २०१७-१८ मध्ये १९ हजार ९०३ असे एकूण एक लाख १६ हजार ५४० जलसंधारणाची कामे करण्यात आलीत. अद्यापही ४५३ गावांमधील १५२५ कामे अपूर्ण आहेत.

या योजनेची मुदत डिसेंबर २०१९ ला संपुष्टात आलेली आहे. नव्याने गावांची निवड नाही, निविदा नाही किंवा यावर निधी आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाआघाडी सरकारला ही योजना चालविण्यात स्वारस्य नाही. नव्याने कामांना कार्यारंभ आदेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिलेले आहे. अद्याप १३६७ गावांमधील कामे सुरूच आहेत. १५२५ कामे अपूर्ण आहेत. यापैकी काही कामांना कार्यारंभ आदेश दिलेले नाही. त्यामुळे ही कामे होणे जवळजवळ अशक्य मानले जात आहे.

शिवाराला कोरड ४३४३ गावे जलपरिपूर्ण कशी?

मागील पाच वर्षांत यंदाचा अपवाद वगळता चारही वर्षे पश्चिम विदर्भ दुष्काळात होरपळला आहे. अपुºया पावसाळ्यामुळे दरवर्षी दोन हजारांवर गावांना कोरड आहे. गतवर्षी ७०० टँकर सुरू होते. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भातील ४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा जलयुक्त शिवार राबविणाºया १४ यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे या सर्व कामांचे ‘सोशल आॅडिट’ होणे महत्त्वाचे आहे. यात ‘दुधका दुध पानी का पानी’ सिद्ध होईल.

 चार वर्षांत योजनेवर २४२५.६१ कोटींचा खर्च

अमरावती विभागातील ४७९६ गावांमधील १,१६,५४० कामांवर आतापर्यंत २४२५ कोटी ६१ लाखांचा निधी खर्च झालेला आहे. किमान एका सिंचनासाठी ३,७६,३५६ हेक्टरमध्ये पाळी देता येईल, ऐवढा जलसाठा तयार झाल्याचा शासनाचा अहवाल आहे. प्रत्यक्षात यंदाचा अपवाद वगळता शेतशिवार अन् कामे कोरडेच आहे. जलयुक्तमुळे कुठे सिंचन झालेच नाही. योजनेची अंमलबजावणी करणाºया १४ यंत्रणाचे शिवार मात्र, या योजनेमुळे हिरवे झाल्याचा आरोप आज होत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWaterपाणीAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भ