शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

453 गावांत जलयुक्तची 1525 कामे अपूर्ण; पश्चिम विदर्भाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:28 IST

४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा यंत्रणेचा दावा

- गजानन मोहोड

अमरावती : ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र अन् टँकरमुक्त जिल्हा’ असा गाजावाजा करीत यापूर्वीच्या सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही योजना सन २०१५-१६ पासून राबविली. सद्यस्थितीत राज्य शासनाद्वारा ही योजना गुंडाळणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान या चार वर्षांत चार हजार ३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा  अंमलबजावणी यंत्रणांनी केला आहे. पश्चिम विदर्भात अद्यापही ४५३ गावांमधील १५२५ कामे अपूर्ण असल्याचे वास्तव आहे.

सलगचा दुष्काळ, नापिकी अन् पाणीटंचाई पाचवीलाच पुजली असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार हा ड्रिम प्रोजेक्ट दुष्काळबहुल जिल्ह्यांमध्ये राबविला. याअंतर्गत पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत सन २०१५-१६ मध्ये १३९६, सन २०१६-१७ मध्ये ९९७, सन २०१७-१८ मध्ये १०३५ व सन २०१८-१९ या वर्षात १३६३ असे एकूण ४७९६ गावांमध्ये ही योजना राबविली. या कालावधीत सन २०१५-१६ मध्ये ५० हजार ३८, सन २०१६-१७ मध्ये १८ हजार ७०७, सन २०१७-२०१९ मध्ये २७ हजार ८९२ व सन २०१७-१८ मध्ये १९ हजार ९०३ असे एकूण एक लाख १६ हजार ५४० जलसंधारणाची कामे करण्यात आलीत. अद्यापही ४५३ गावांमधील १५२५ कामे अपूर्ण आहेत.

या योजनेची मुदत डिसेंबर २०१९ ला संपुष्टात आलेली आहे. नव्याने गावांची निवड नाही, निविदा नाही किंवा यावर निधी आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाआघाडी सरकारला ही योजना चालविण्यात स्वारस्य नाही. नव्याने कामांना कार्यारंभ आदेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिलेले आहे. अद्याप १३६७ गावांमधील कामे सुरूच आहेत. १५२५ कामे अपूर्ण आहेत. यापैकी काही कामांना कार्यारंभ आदेश दिलेले नाही. त्यामुळे ही कामे होणे जवळजवळ अशक्य मानले जात आहे.

शिवाराला कोरड ४३४३ गावे जलपरिपूर्ण कशी?

मागील पाच वर्षांत यंदाचा अपवाद वगळता चारही वर्षे पश्चिम विदर्भ दुष्काळात होरपळला आहे. अपुºया पावसाळ्यामुळे दरवर्षी दोन हजारांवर गावांना कोरड आहे. गतवर्षी ७०० टँकर सुरू होते. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भातील ४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा जलयुक्त शिवार राबविणाºया १४ यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे या सर्व कामांचे ‘सोशल आॅडिट’ होणे महत्त्वाचे आहे. यात ‘दुधका दुध पानी का पानी’ सिद्ध होईल.

 चार वर्षांत योजनेवर २४२५.६१ कोटींचा खर्च

अमरावती विभागातील ४७९६ गावांमधील १,१६,५४० कामांवर आतापर्यंत २४२५ कोटी ६१ लाखांचा निधी खर्च झालेला आहे. किमान एका सिंचनासाठी ३,७६,३५६ हेक्टरमध्ये पाळी देता येईल, ऐवढा जलसाठा तयार झाल्याचा शासनाचा अहवाल आहे. प्रत्यक्षात यंदाचा अपवाद वगळता शेतशिवार अन् कामे कोरडेच आहे. जलयुक्तमुळे कुठे सिंचन झालेच नाही. योजनेची अंमलबजावणी करणाºया १४ यंत्रणाचे शिवार मात्र, या योजनेमुळे हिरवे झाल्याचा आरोप आज होत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWaterपाणीAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भ