शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
3
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
4
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
5
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
6
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
7
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
8
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
9
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
10
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
11
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
12
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
13
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
14
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
15
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
16
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
17
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
18
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
19
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
20
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार

453 गावांत जलयुक्तची 1525 कामे अपूर्ण; पश्चिम विदर्भाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:28 IST

४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा यंत्रणेचा दावा

- गजानन मोहोड

अमरावती : ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र अन् टँकरमुक्त जिल्हा’ असा गाजावाजा करीत यापूर्वीच्या सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही योजना सन २०१५-१६ पासून राबविली. सद्यस्थितीत राज्य शासनाद्वारा ही योजना गुंडाळणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान या चार वर्षांत चार हजार ३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा  अंमलबजावणी यंत्रणांनी केला आहे. पश्चिम विदर्भात अद्यापही ४५३ गावांमधील १५२५ कामे अपूर्ण असल्याचे वास्तव आहे.

सलगचा दुष्काळ, नापिकी अन् पाणीटंचाई पाचवीलाच पुजली असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार हा ड्रिम प्रोजेक्ट दुष्काळबहुल जिल्ह्यांमध्ये राबविला. याअंतर्गत पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत सन २०१५-१६ मध्ये १३९६, सन २०१६-१७ मध्ये ९९७, सन २०१७-१८ मध्ये १०३५ व सन २०१८-१९ या वर्षात १३६३ असे एकूण ४७९६ गावांमध्ये ही योजना राबविली. या कालावधीत सन २०१५-१६ मध्ये ५० हजार ३८, सन २०१६-१७ मध्ये १८ हजार ७०७, सन २०१७-२०१९ मध्ये २७ हजार ८९२ व सन २०१७-१८ मध्ये १९ हजार ९०३ असे एकूण एक लाख १६ हजार ५४० जलसंधारणाची कामे करण्यात आलीत. अद्यापही ४५३ गावांमधील १५२५ कामे अपूर्ण आहेत.

या योजनेची मुदत डिसेंबर २०१९ ला संपुष्टात आलेली आहे. नव्याने गावांची निवड नाही, निविदा नाही किंवा यावर निधी आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाआघाडी सरकारला ही योजना चालविण्यात स्वारस्य नाही. नव्याने कामांना कार्यारंभ आदेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिलेले आहे. अद्याप १३६७ गावांमधील कामे सुरूच आहेत. १५२५ कामे अपूर्ण आहेत. यापैकी काही कामांना कार्यारंभ आदेश दिलेले नाही. त्यामुळे ही कामे होणे जवळजवळ अशक्य मानले जात आहे.

शिवाराला कोरड ४३४३ गावे जलपरिपूर्ण कशी?

मागील पाच वर्षांत यंदाचा अपवाद वगळता चारही वर्षे पश्चिम विदर्भ दुष्काळात होरपळला आहे. अपुºया पावसाळ्यामुळे दरवर्षी दोन हजारांवर गावांना कोरड आहे. गतवर्षी ७०० टँकर सुरू होते. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भातील ४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा जलयुक्त शिवार राबविणाºया १४ यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे या सर्व कामांचे ‘सोशल आॅडिट’ होणे महत्त्वाचे आहे. यात ‘दुधका दुध पानी का पानी’ सिद्ध होईल.

 चार वर्षांत योजनेवर २४२५.६१ कोटींचा खर्च

अमरावती विभागातील ४७९६ गावांमधील १,१६,५४० कामांवर आतापर्यंत २४२५ कोटी ६१ लाखांचा निधी खर्च झालेला आहे. किमान एका सिंचनासाठी ३,७६,३५६ हेक्टरमध्ये पाळी देता येईल, ऐवढा जलसाठा तयार झाल्याचा शासनाचा अहवाल आहे. प्रत्यक्षात यंदाचा अपवाद वगळता शेतशिवार अन् कामे कोरडेच आहे. जलयुक्तमुळे कुठे सिंचन झालेच नाही. योजनेची अंमलबजावणी करणाºया १४ यंत्रणाचे शिवार मात्र, या योजनेमुळे हिरवे झाल्याचा आरोप आज होत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWaterपाणीAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भ