शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

453 गावांत जलयुक्तची 1525 कामे अपूर्ण; पश्चिम विदर्भाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:28 IST

४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा यंत्रणेचा दावा

- गजानन मोहोड

अमरावती : ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र अन् टँकरमुक्त जिल्हा’ असा गाजावाजा करीत यापूर्वीच्या सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही योजना सन २०१५-१६ पासून राबविली. सद्यस्थितीत राज्य शासनाद्वारा ही योजना गुंडाळणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान या चार वर्षांत चार हजार ३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा  अंमलबजावणी यंत्रणांनी केला आहे. पश्चिम विदर्भात अद्यापही ४५३ गावांमधील १५२५ कामे अपूर्ण असल्याचे वास्तव आहे.

सलगचा दुष्काळ, नापिकी अन् पाणीटंचाई पाचवीलाच पुजली असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार हा ड्रिम प्रोजेक्ट दुष्काळबहुल जिल्ह्यांमध्ये राबविला. याअंतर्गत पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत सन २०१५-१६ मध्ये १३९६, सन २०१६-१७ मध्ये ९९७, सन २०१७-१८ मध्ये १०३५ व सन २०१८-१९ या वर्षात १३६३ असे एकूण ४७९६ गावांमध्ये ही योजना राबविली. या कालावधीत सन २०१५-१६ मध्ये ५० हजार ३८, सन २०१६-१७ मध्ये १८ हजार ७०७, सन २०१७-२०१९ मध्ये २७ हजार ८९२ व सन २०१७-१८ मध्ये १९ हजार ९०३ असे एकूण एक लाख १६ हजार ५४० जलसंधारणाची कामे करण्यात आलीत. अद्यापही ४५३ गावांमधील १५२५ कामे अपूर्ण आहेत.

या योजनेची मुदत डिसेंबर २०१९ ला संपुष्टात आलेली आहे. नव्याने गावांची निवड नाही, निविदा नाही किंवा यावर निधी आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाआघाडी सरकारला ही योजना चालविण्यात स्वारस्य नाही. नव्याने कामांना कार्यारंभ आदेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिलेले आहे. अद्याप १३६७ गावांमधील कामे सुरूच आहेत. १५२५ कामे अपूर्ण आहेत. यापैकी काही कामांना कार्यारंभ आदेश दिलेले नाही. त्यामुळे ही कामे होणे जवळजवळ अशक्य मानले जात आहे.

शिवाराला कोरड ४३४३ गावे जलपरिपूर्ण कशी?

मागील पाच वर्षांत यंदाचा अपवाद वगळता चारही वर्षे पश्चिम विदर्भ दुष्काळात होरपळला आहे. अपुºया पावसाळ्यामुळे दरवर्षी दोन हजारांवर गावांना कोरड आहे. गतवर्षी ७०० टँकर सुरू होते. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भातील ४३४३ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा जलयुक्त शिवार राबविणाºया १४ यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे या सर्व कामांचे ‘सोशल आॅडिट’ होणे महत्त्वाचे आहे. यात ‘दुधका दुध पानी का पानी’ सिद्ध होईल.

 चार वर्षांत योजनेवर २४२५.६१ कोटींचा खर्च

अमरावती विभागातील ४७९६ गावांमधील १,१६,५४० कामांवर आतापर्यंत २४२५ कोटी ६१ लाखांचा निधी खर्च झालेला आहे. किमान एका सिंचनासाठी ३,७६,३५६ हेक्टरमध्ये पाळी देता येईल, ऐवढा जलसाठा तयार झाल्याचा शासनाचा अहवाल आहे. प्रत्यक्षात यंदाचा अपवाद वगळता शेतशिवार अन् कामे कोरडेच आहे. जलयुक्तमुळे कुठे सिंचन झालेच नाही. योजनेची अंमलबजावणी करणाºया १४ यंत्रणाचे शिवार मात्र, या योजनेमुळे हिरवे झाल्याचा आरोप आज होत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWaterपाणीAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भ