शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

१२ लाखांवर केळी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 1:23 AM

वाढते उन्ह आणि अधिक तापमानामुळे अचलपूर कृषी उपविभागांतर्गत १२ लाखांहून अधिक केळीबागा करपल्या जात आहे. ऐन घड भरलेल्या अवस्थेत हा प्रताप झाल्याने यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २१ जूनच्या वादळातही घडांनी लदबदलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झालीत.

ठळक मुद्दे२१ जूनच्या वादळातही उद्ध्वस्त : शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वाढते उन्ह आणि अधिक तापमानामुळे अचलपूर कृषी उपविभागांतर्गत १२ लाखांहून अधिक केळीबागा करपल्या जात आहे. ऐन घड भरलेल्या अवस्थेत हा प्रताप झाल्याने यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २१ जूनच्या वादळातही घडांनी लदबदलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झालीत. आधी उन्हान आणि आता वादळाने झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.अचलपूर कृषी उपविभागांतर्गत अचलपूर तालुक्यातील ३८० हेक्टर क्षेत्रांपैकी १८७.७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी करपली, तर अंजनगाव तालुक्यातील ४५१ हेक्टरपैकी २१७ हेक्टर क्षेत्रातील केळी वाढते तापमान आणि उन्हामुळे भाजल्या गेली. केळीचे घड बरोबर निसवले नाहीत. केळीच्या घाडांची संख्या कमी असून घडातील वरच्या फण्याही करपल्या आहेत.२१ जूनच्या तुफान वादळामुळे केळीच्या झाडांची पाने फाटली आहेत. दोन्ही तालुक्यातील केळीचे बहुतांश पीक यात खराब झाले आहे. दरम्यान २१ जूनच्या सायंकाळी वादळाने केळीची झाडे घडांसह जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यातील चमक येथील सरला सुखदेव पवार यांच्या ८० आर शेतातील संपूर्ण केळी वादळाने झोपली. चमकसह हरम, खानापूर, नवबाग, शहापूर, दारापूर शिवारात प्रचंड नुकसान झाले. सदर नुकसानाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.असे झाले नुकसानअचलपुरतील वेणी येथील मंगेश बुंदेले यांच्या शेतातील ४ हजार केळीची झाडे, प्रल्हाद बदुकले यांच्या शेतात तीन हजार, वडगाव फत्तेपूर येथील सुंदरलाल चौधरी यांच्या शेतातील तीन हजार, तर अंजनगावमधील पांढरी खानापूर येथील रवींद्र डाबरे यांच्या शेतातील ३ हजार २५ केळीची झाडे उन्हामुळे करपल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विशेष तज्ज्ञांनी आपल्या पाहणी अहवालात म्हटले आहे.विशेषतज्ज्ञांचा अभिप्रायअधिक तापमानामुळे बागेतील तापमान वाढले. आर्द्रता कमी झाली. बाष्पीभवनाचा वेग वाढला. याचा परिणाम झाडांच्या वाढीवर झाला. घड बरोबर निसवले नाहीत. जे घड निसवलेत त्याच्या वरील बाजूच्या फण्यासुद्धा तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपल्याचा अभिप्राय कृषी विद्यापीठासह कृषी विभागातील विशेष तज्ज्ञांनी दिला आहे.शेतकऱ्यांची मागणीमोठ्या प्रमाणावर केळी पिकांचे नुकसान झाल्यामुळे केळी पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे हवालदिल शेतकºयांनी केळी पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याकरिता अचलपूर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व अंजनगाव तहसीलदारांकडे शेतकºयांसह राजकीय, सामाजिक मंडळींनी निवेदने दिली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती