शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

पंढरी प्रकल्पात ११ जणांनी घेतल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:45 IST

तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम मार्गी लागावे आणि प्रकल्पाग्रस्तांवरील अन्याय दूर व्हावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय अन्न-जलत्याग आंदोलन जलसमाधीच्या वळणावर पोहोचले. शनिवारी प्रकल्पात ११ जणांनी उड्या घेतल्या.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून बैठकीचे आमंत्रण : पोलिसांच्या सतर्कतेने फसला जलसमाधीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/पुसला : तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम मार्गी लागावे आणि प्रकल्पाग्रस्तांवरील अन्याय दूर व्हावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय अन्न-जलत्याग आंदोलन जलसमाधीच्या वळणावर पोहोचले. शनिवारी प्रकल्पात ११ जणांनी उड्या घेतल्या. मात्र, पोलिसांनी तातडीने हालचाली करीत त्यांना वाचविले आणि स्थानबद्ध केले. उशिरा सायंकाळी सोडण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला आमंत्रित केले.पंढरी मध्यम प्रकल्पावर उपोषण करीत असलेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकाही सक्षम अधिकाºयानेच नव्हे, तर आ. अनिल बोंडे यांनीही भेट घेतली नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी दुपारी १ वाजता ११ आंदोलकांनी पंढरी मध्यम प्रकल्पात उड्या घेतल्या. प्रकल्पस्थळी तैनात पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढून त्यांना ताब्यात घेऊन शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्यात आणले. विजय श्रीराव यांच्यासह शेतकरी नेते दिलीप भोयर, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काळे, गजानन डाहाके, चंद्रशेखर ढोरे, संजय कुरवाळे, राजू ठाकरे, नाना अजमिरे, अनिल कुयटे, सूर्यभान कुयटे, नरेंद्र कुरवाळे यांचा आंदोलनात समावेश होता. ठाणेदार शेषराव नितनवरे यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि मुंबई पोलीस कायदा ६८ नुसार कारवाई करून कलम ६९ नुसार सुटका केली. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विक्रम ठाकरे, पंचायत समिती उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे,भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अंजली तुमराम, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, शहराध्यक्ष नरेंद्र फसाटे, छाया घ्यार, प्रकाश देशमुख, जगदीश बेलसरे, नंदू आजनकर, राष्ट्रवादीचे राजाभाऊ कुकडे आदींनी आंदोलनाला समर्थन दिले होते.मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे आमंत्रणआंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी विजय श्रीराव यांच्याशी दूरध्वनीहून संपर्क साधला आणि सर्व मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अमरावती भेटीदरम्यान चर्चेचे आमंत्रण दिले.मुख्यमंत्र्यांसोबत अमरावती येथे रविवारी १५ जणांचे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत. पालकमंत्र्यांना तसे कळविले आहे. योग्य मोबदला आणि प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, हीच आमची मागणी राहणार आहे.- विजय श्रीराव, माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजप