शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पंढरी प्रकल्पात ११ जणांनी घेतल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:45 IST

तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम मार्गी लागावे आणि प्रकल्पाग्रस्तांवरील अन्याय दूर व्हावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय अन्न-जलत्याग आंदोलन जलसमाधीच्या वळणावर पोहोचले. शनिवारी प्रकल्पात ११ जणांनी उड्या घेतल्या.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून बैठकीचे आमंत्रण : पोलिसांच्या सतर्कतेने फसला जलसमाधीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/पुसला : तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम मार्गी लागावे आणि प्रकल्पाग्रस्तांवरील अन्याय दूर व्हावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय अन्न-जलत्याग आंदोलन जलसमाधीच्या वळणावर पोहोचले. शनिवारी प्रकल्पात ११ जणांनी उड्या घेतल्या. मात्र, पोलिसांनी तातडीने हालचाली करीत त्यांना वाचविले आणि स्थानबद्ध केले. उशिरा सायंकाळी सोडण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला आमंत्रित केले.पंढरी मध्यम प्रकल्पावर उपोषण करीत असलेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकाही सक्षम अधिकाºयानेच नव्हे, तर आ. अनिल बोंडे यांनीही भेट घेतली नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी दुपारी १ वाजता ११ आंदोलकांनी पंढरी मध्यम प्रकल्पात उड्या घेतल्या. प्रकल्पस्थळी तैनात पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढून त्यांना ताब्यात घेऊन शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्यात आणले. विजय श्रीराव यांच्यासह शेतकरी नेते दिलीप भोयर, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काळे, गजानन डाहाके, चंद्रशेखर ढोरे, संजय कुरवाळे, राजू ठाकरे, नाना अजमिरे, अनिल कुयटे, सूर्यभान कुयटे, नरेंद्र कुरवाळे यांचा आंदोलनात समावेश होता. ठाणेदार शेषराव नितनवरे यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि मुंबई पोलीस कायदा ६८ नुसार कारवाई करून कलम ६९ नुसार सुटका केली. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विक्रम ठाकरे, पंचायत समिती उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे,भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अंजली तुमराम, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, शहराध्यक्ष नरेंद्र फसाटे, छाया घ्यार, प्रकाश देशमुख, जगदीश बेलसरे, नंदू आजनकर, राष्ट्रवादीचे राजाभाऊ कुकडे आदींनी आंदोलनाला समर्थन दिले होते.मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे आमंत्रणआंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी विजय श्रीराव यांच्याशी दूरध्वनीहून संपर्क साधला आणि सर्व मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अमरावती भेटीदरम्यान चर्चेचे आमंत्रण दिले.मुख्यमंत्र्यांसोबत अमरावती येथे रविवारी १५ जणांचे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत. पालकमंत्र्यांना तसे कळविले आहे. योग्य मोबदला आणि प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, हीच आमची मागणी राहणार आहे.- विजय श्रीराव, माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजप