शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

पंढरी प्रकल्पात ११ जणांनी घेतल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:45 IST

तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम मार्गी लागावे आणि प्रकल्पाग्रस्तांवरील अन्याय दूर व्हावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय अन्न-जलत्याग आंदोलन जलसमाधीच्या वळणावर पोहोचले. शनिवारी प्रकल्पात ११ जणांनी उड्या घेतल्या.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून बैठकीचे आमंत्रण : पोलिसांच्या सतर्कतेने फसला जलसमाधीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/पुसला : तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम मार्गी लागावे आणि प्रकल्पाग्रस्तांवरील अन्याय दूर व्हावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय अन्न-जलत्याग आंदोलन जलसमाधीच्या वळणावर पोहोचले. शनिवारी प्रकल्पात ११ जणांनी उड्या घेतल्या. मात्र, पोलिसांनी तातडीने हालचाली करीत त्यांना वाचविले आणि स्थानबद्ध केले. उशिरा सायंकाळी सोडण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला आमंत्रित केले.पंढरी मध्यम प्रकल्पावर उपोषण करीत असलेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकाही सक्षम अधिकाºयानेच नव्हे, तर आ. अनिल बोंडे यांनीही भेट घेतली नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी दुपारी १ वाजता ११ आंदोलकांनी पंढरी मध्यम प्रकल्पात उड्या घेतल्या. प्रकल्पस्थळी तैनात पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढून त्यांना ताब्यात घेऊन शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्यात आणले. विजय श्रीराव यांच्यासह शेतकरी नेते दिलीप भोयर, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काळे, गजानन डाहाके, चंद्रशेखर ढोरे, संजय कुरवाळे, राजू ठाकरे, नाना अजमिरे, अनिल कुयटे, सूर्यभान कुयटे, नरेंद्र कुरवाळे यांचा आंदोलनात समावेश होता. ठाणेदार शेषराव नितनवरे यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि मुंबई पोलीस कायदा ६८ नुसार कारवाई करून कलम ६९ नुसार सुटका केली. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विक्रम ठाकरे, पंचायत समिती उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे,भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अंजली तुमराम, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, शहराध्यक्ष नरेंद्र फसाटे, छाया घ्यार, प्रकाश देशमुख, जगदीश बेलसरे, नंदू आजनकर, राष्ट्रवादीचे राजाभाऊ कुकडे आदींनी आंदोलनाला समर्थन दिले होते.मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे आमंत्रणआंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी विजय श्रीराव यांच्याशी दूरध्वनीहून संपर्क साधला आणि सर्व मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अमरावती भेटीदरम्यान चर्चेचे आमंत्रण दिले.मुख्यमंत्र्यांसोबत अमरावती येथे रविवारी १५ जणांचे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत. पालकमंत्र्यांना तसे कळविले आहे. योग्य मोबदला आणि प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, हीच आमची मागणी राहणार आहे.- विजय श्रीराव, माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजप