शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

बस-तवेराची जबर धडक, भीषण अपघातात ११ ठार; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

By गणेश वासनिक | Updated: November 4, 2022 18:19 IST

परतवाडा-बैतूल मार्गावरील घटना; अमरावती जिल्ह्यात आले होते पीक कापणीला, मेळघाटातून गावी परतताना झाला अपघात

परतवाडा (अमरावती) : गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता झालेल्या तवेरा व प्रवासी बस यांच्या अपघातात चारचाकी वाहनातील तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. घटनेतील सर्व मृतक मध्यप्रदेश येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परतवाडा- बैतूल या आंतरराष्ट्रीय महामार्गावरील जल्लार बुधगाव दरम्यान खासगी प्रवासी बस आणि तवेरा चारचाकी वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण ११ जण ठार झाले असून एकाच परिवारातील पाच लोकांचा समावेश आहे. त्यात दोनच चिमुकले आहे. मेळघाट व त्याच्या सीमा रेषेवरील मध्यप्रदेशच्या आदिवासी पाड्यांमधून मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंबे विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतातील पीक कापणीसाठी मागील दीड महिन्यापासून वास्तव्याला होते. पीक कापणीचे कामे आटोपत असल्याने दिवाळीपूर्वी अनेक कुटुंब आपले गावी गेले तर काही आता जात आहे. अशातच एका चारचाकी वाहनात रात्रीचा प्रवास ११ जणांच्या जीवावर बेतला आहे.

राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

परतवाडा- बैतूल मार्गावर झालेल्या या भीषण अपघातात मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी दोन लक्ष रुपये देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली असून या घटने संदर्भात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहेमृतात मध्य प्रदेशचे गरीब मजूर

गुरुवारी मध्यरात्री २ वाजता अपघात झाल्यानंतर पहाटे अपघातातील मृतके परतवाडा, मेळघाटच्या धारणी, चिखलदरा व इतर परिसरातील असल्याची चर्चा होती. मात्र, मध्य प्रदेश प्रशासनाने सर्व मृतक बैतूल व परिसरातील असल्याचे जाहीर केले आहे. मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीस व प्रशासनाला मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागलेविरुद्ध दिशेने येताना झाला बस-चारचाकी भिडले

अमरावती जिल्ह्यातून शेतीचे कामे आटोपून जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. त्यात झल्लार येथील एक, चिखलार व महाडगाव येथील प्रत्येकी पाच अशा एकूण ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात अमर दुर्वे, मंगल सिंह विके, नंदकिशोर धुर्वे, श्यामराव धुर्वे, कली शामराव धुर्वे, किसन लीलाजी, कुसुम किसन धुर्वे, अनारकली केसा, संध्या केसा, विकास मधू आदी मृतकांची नाव आहेत

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAmravatiअमरावतीbetul-pcबेटुल