शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १०३ नद्यांचा होणार कायापालट; पुर्नउत्थानासाठी कृती आराखडा तयार

By गणेश वासनिक | Updated: December 13, 2022 17:25 IST

नद्यांची घेणार काळजी, गावागावांत नदी संवर्धनासाठी संवाद यात्रा

अमरावती : निसर्गाने दिलेले वरदान नद्या आता मृत्युशयावर आहेत. कधी काळी अथांग वाहतं ममत्वाचा भाव निर्माण करुन गावा-गावांना समृद्ध बनविणाऱ्या महाराष्ट्रातील १०३ नद्यांना मुक्त श्वास घेण्याकरीता राज्य शासनाने नद्यांच्या पुर्नउत्थानासाठी पुढाकार घेतला आहे. चांद्यापासून तर बांध्यापर्यंत असलेल्या या नद्या राज्याला पुन्हा समृद्ध व पाणीदार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

गत अनेक वर्षांपासून निसर्गाच्या चक्राव्युहामुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी वाढत आहे. औद्योगिकरण त्यातून निर्माण होणारे प्रदुषणाने राज्यात दिवसें-दिवस पाण्याचे दुर्भिष्य निर्माण झाले आहे.  धो-धो पाऊस बरसला तरी तो नदीमध्ये थांबत नाही. भुपृष्ठजलाची उपयुक्तता घटत असल्याने त्याचा परिणाम नद्यांवर झालेला दिसून येतो. मोठमोठ्या नद्यांचे रुपांतर आता नाल्यामध्ये झाल्याचे दिसून येते. नद्यांच्या पाणी साठवण क्षमतेवर याचा परिणाम झालेला आहे.

नद्या पूर्वीसारख्याच अथांग आणि निर्मळ करण्यासाठी राज्य शासनाने आता पुढाकार घेतला आहे. ‘चला जाणुया नदीला’ या मोहिमेतून महाराष्ट्रातील प्रमुख १०३ नद्यांना वाहते करण्यासाठी शासन याचा अभ्यास करणार असून त्यासाठी राज्याचे मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव आढावा घेऊन सर्वकष अहवाल तयार करुन शासनास सादर करणार आहेत. १ ते २० जानेवारी २०२३ या काळात समितीला शासनाकडे अंतिम अहवाल सादर करावा लागणार आहे, असे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी निर्गमित शासनादेशातून स्पष्ट केले आहे. 

अभियानाचे महत्व

या उपक्रमातून नदी संवाद घेणे, नागरिकांना समावेश करुन नद्यांचा सर्वकष अभ्यास करणे, नद्यांना अमृत वाहिनी बनविताना मसुदा तयार करणे. नदीचे स्वास्थ जाणून घेताना त्यातील जैवविविधतेचा अभ्यास करणे, पाणलोट क्षेत्र जाणून घेत मागील पाच वर्षांत आलेले पुरपरिस्थिती आणि नद्यांमध्ये असलेले प्रदुषणाची कारणे जाणून घेत अशा नद्यांना समृद्ध करण्यासाठी शासन अनुदान देणार आहे. पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हास्तरावर हे असतील सदस्य

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली मुख्यकार्यकारी अधिकारी सहअध्यक्ष, महापालिका मनपा आयुक्त, प्रकल्प संचालक, कृषी अधीक्षक, आरोग्य उपसंचालक, शिक्षणाधिकारी, माहिती अधिकारी, जलसाक्षरता संचालक, अधीक्षक अभियंता (सिंचन व्यवस्थापन) आणि उपवनसंरक्षक वनविभाग हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. हे सर्व अधिकारी जिल्ह्यातील नमुद नद्यांचा आराखडा विभाग निहाय करतील

टॅग्स :riverनदीSocialसामाजिकState Governmentराज्य सरकार