शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यात वृक्ष लागवडीसाठी १० कोटी खड्डे तयार; सव्वा आठ कोटी खड्ड्यांचे छायाचित्र 'अपलोड' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 16:23 IST

राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १० कोटी खड्डे तयार झाले असून, ८ कोटी ३० लाख ७ हजार ३५१ खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत १३ कोटी खड्डे तयार करून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश शासनाचे आहेत.

- गणेश वासनिक

अमरावती : राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १० कोटी खड्डे तयार झाले असून, ८ कोटी ३० लाख ७ हजार ३५१ खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत १३ कोटी खड्डे तयार करून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश शासनाचे आहेत.राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या धर्तीवर ‘वनयुक्त शिवार’ योजना हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यात ३३ टक्के जमीन ही वृक्षाच्छादनाखाली आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरकस प्रयत्न चालविले आहे. मागील महिन्यात वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने विभागीय स्तरावर दौरे करून वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. शासकीय, निमशासकीय व अन्य यंत्रणांना वृक्षलागवडीसाठी दिलेल्या बाबीकडे शासनाने बारकाईने लक्ष वेधले आहे. १ जुलैपासून होणारी वृक्ष लागवड ही ‘फोटोसेशन’ पुरती असू नये, यासाठी नियम, निकषाचा आधार घेतला जात आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरणाकडे वृक्षलागवड कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून कामकाज हाताळतील, असे शासनादेश आहे. त्यामुळे येत्या जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवडीत वृक्षारोपणाचा दिखाऊपणा असणार नाही, त्याकरिता सर्वच यंत्रणांची ‘क्रॉस’ चेकींग सुरू झाली आहे. खड्डा खोदल्यानंतर त्याचे छायाचित्र ‘माय प्लँट अ‍ॅप’वर अपलोड केले जात आहे. त्यामुळे वृक्षारोपण आता कागदोपत्री राहणार नसून, रिझल्ट द्यावा लागत आहे. 

२० कोटी रोपांची निर्मिती१ ते ३१ जुलै या कालावधीत वृक्षलागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यात सामाजिक वनीकरणांच्या २,१४२ नर्सरीत २० कोटी रोपांची निर्मिती झाल्याची माहिती पुणे येथील सामाजिक वनीकरणाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिनेश त्यागी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सामाजिक वनीकरणाच्या नियंत्रणात स्वतंत्रपणे ८५ हजार ८०६ स्थळे वृक्ष लागवडीसाठी तयार करण्यात आली आहे. २० कोटी रोपांपैकी १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास लवकरच ७ कोटी रोपांचे नियोजन केले जाईल, असे दिनेश त्यागी यांनी सांगितले.

१३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने कोणत्याही उणिवा असू नये, यासाठी शासनस्तरावरून दक्षता घेतली जात आहे. शासकीय, निमशासकीय व अन्य सामाजिक संघटनांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार वजा आवाहन केले आहे. - सुधीर मुनगंटीवार,अर्थ व वनमंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र