शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शून्य ऊर्जा प्रकल्पातून शेतीला मिळते २४ तास पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:40 IST

५१ शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक सहभागामुळे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे

- संतोषकुमार गवईशिर्ला: मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी परिसरात ३०० एकर शेतीवर विजेशिवाय सिंचन करणे शक्य झाले आहे. गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. हिंमतराव टप्पे आणि अभियंता हरिदास ताठे तथा ५१ शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक सहभागामुळे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.अभियंता हरिदास ताठे आणि हिंमतराव टप्पे यांच्या ३६५ दिवसांच्या अथक परिश्रमातून मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी गावाच्या शेतीपर्यंत धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे पारंपरिक पद्धतीने न आणता थेट शेतकºयांच्या शेतापर्यंत पाइपलाइनद्वारे पोहोचविण्यात आले आहे. त्यामुळे ७० टक्के पाण्याची तथा शंभर टक्के विजेची बचत करून शून्याधारित ऊर्जेवर सदर प्रकल्प सुरू आहे. ५१ शेतकºयांच्या वैयक्तिक आर्थिक सहभागातून तथा शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीशिवाय सदर प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पाला आतापर्यंत १ कोटी २० लाख रुपये खर्च आला आहे. सध्या या प्रकल्पाचे पाणी मोर्णा धरणापासून थेट कोठारी गावापर्यंत यशस्वीपणे पोहोचले आहे. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक शेतकºयाच्या बांधापर्यंत तुषार संच ठिबक सिंचन अथवा प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी पोहोचले जाणार आहे. कोठारी येथे १२० हेक्टरवर संत्रा, मोसंबीच्या बागा आहेत. धरणाच्या पायथ्याशी असूनही गत दोन वर्षांपूर्वी या भागांना योग्य वेळी पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या होत्या. शेतीनिष्ठ शेतकरी हिंमतराव टप्पे यांनी सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्था स्थापन करून पाटबंधारे विभागाशी करार केला. त्याला कार्यकारी अभियंता वाकोडे, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, शाखा अभियंता गजानन अत्तरकार यांनी मोलाची साथ दिली. शून्य ऊर्जेवर आधारित प्रकल्प उभारण्यासाठी अभियंता हरिदास ताठे यांची भेट घेतली आणि मोर्णा धरणातून थेट कोठारी गावापर्यंत सुमारे साडेपाच किलोमीटर पाणी आणण्याचे ठरविले; मात्र यासाठी लागणारा १ कोटीहून अधिक निधी कसा उभा करावा, असा प्रश्न या दोघांसमोर उभा राहिला. बँकांनी नकार दिल्यानंतर ५१ शेतकºयांची बैठक घेतली आणि बहुतांश निधी वैयक्तिक स्तरावर उभा करण्यात आला; मात्र बुलडाणा अर्बन या बँकेने मदत दिल्याने प्रकल्प यशस्वी झाला.

पाण्यासह पैशांची बचतकॅनॉलचे पाणी हे हंगामी पद्धतीने मिळते. यामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. दुसरीकडे पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने अपव्यय कमी होतो. तसेच जेव्हा हवे असेल तेव्हा पाणी पुरवठा करू शकतो. पाणी वाटपासाठी कर्मचाºयांची गरज नाही, कॅनॉलप्रमाणे दुरुस्ती देखभाल करावी लागत नाही, पाण्याची मागणी करावी लागत नाही, प्रत्येक शेतकºयाची वेगवेगळी गरज लक्षात घेता सोयीनुसार पाणी पुरवठा शक्य झाला आहे. प्रत्येक शेतकºयासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था असल्यामुळे सिंचनात कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती