शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शून्य ऊर्जा प्रकल्पातून शेतीला मिळते २४ तास पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:40 IST

५१ शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक सहभागामुळे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे

- संतोषकुमार गवईशिर्ला: मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी परिसरात ३०० एकर शेतीवर विजेशिवाय सिंचन करणे शक्य झाले आहे. गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. हिंमतराव टप्पे आणि अभियंता हरिदास ताठे तथा ५१ शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक सहभागामुळे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.अभियंता हरिदास ताठे आणि हिंमतराव टप्पे यांच्या ३६५ दिवसांच्या अथक परिश्रमातून मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी गावाच्या शेतीपर्यंत धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे पारंपरिक पद्धतीने न आणता थेट शेतकºयांच्या शेतापर्यंत पाइपलाइनद्वारे पोहोचविण्यात आले आहे. त्यामुळे ७० टक्के पाण्याची तथा शंभर टक्के विजेची बचत करून शून्याधारित ऊर्जेवर सदर प्रकल्प सुरू आहे. ५१ शेतकºयांच्या वैयक्तिक आर्थिक सहभागातून तथा शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीशिवाय सदर प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पाला आतापर्यंत १ कोटी २० लाख रुपये खर्च आला आहे. सध्या या प्रकल्पाचे पाणी मोर्णा धरणापासून थेट कोठारी गावापर्यंत यशस्वीपणे पोहोचले आहे. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक शेतकºयाच्या बांधापर्यंत तुषार संच ठिबक सिंचन अथवा प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी पोहोचले जाणार आहे. कोठारी येथे १२० हेक्टरवर संत्रा, मोसंबीच्या बागा आहेत. धरणाच्या पायथ्याशी असूनही गत दोन वर्षांपूर्वी या भागांना योग्य वेळी पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या होत्या. शेतीनिष्ठ शेतकरी हिंमतराव टप्पे यांनी सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्था स्थापन करून पाटबंधारे विभागाशी करार केला. त्याला कार्यकारी अभियंता वाकोडे, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, शाखा अभियंता गजानन अत्तरकार यांनी मोलाची साथ दिली. शून्य ऊर्जेवर आधारित प्रकल्प उभारण्यासाठी अभियंता हरिदास ताठे यांची भेट घेतली आणि मोर्णा धरणातून थेट कोठारी गावापर्यंत सुमारे साडेपाच किलोमीटर पाणी आणण्याचे ठरविले; मात्र यासाठी लागणारा १ कोटीहून अधिक निधी कसा उभा करावा, असा प्रश्न या दोघांसमोर उभा राहिला. बँकांनी नकार दिल्यानंतर ५१ शेतकºयांची बैठक घेतली आणि बहुतांश निधी वैयक्तिक स्तरावर उभा करण्यात आला; मात्र बुलडाणा अर्बन या बँकेने मदत दिल्याने प्रकल्प यशस्वी झाला.

पाण्यासह पैशांची बचतकॅनॉलचे पाणी हे हंगामी पद्धतीने मिळते. यामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. दुसरीकडे पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने अपव्यय कमी होतो. तसेच जेव्हा हवे असेल तेव्हा पाणी पुरवठा करू शकतो. पाणी वाटपासाठी कर्मचाºयांची गरज नाही, कॅनॉलप्रमाणे दुरुस्ती देखभाल करावी लागत नाही, पाण्याची मागणी करावी लागत नाही, प्रत्येक शेतकºयाची वेगवेगळी गरज लक्षात घेता सोयीनुसार पाणी पुरवठा शक्य झाला आहे. प्रत्येक शेतकºयासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था असल्यामुळे सिंचनात कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती