शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

शून्य ऊर्जा प्रकल्पातून शेतीला मिळते २४ तास पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:40 IST

५१ शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक सहभागामुळे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे

- संतोषकुमार गवईशिर्ला: मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी परिसरात ३०० एकर शेतीवर विजेशिवाय सिंचन करणे शक्य झाले आहे. गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. हिंमतराव टप्पे आणि अभियंता हरिदास ताठे तथा ५१ शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक सहभागामुळे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.अभियंता हरिदास ताठे आणि हिंमतराव टप्पे यांच्या ३६५ दिवसांच्या अथक परिश्रमातून मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी गावाच्या शेतीपर्यंत धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे पारंपरिक पद्धतीने न आणता थेट शेतकºयांच्या शेतापर्यंत पाइपलाइनद्वारे पोहोचविण्यात आले आहे. त्यामुळे ७० टक्के पाण्याची तथा शंभर टक्के विजेची बचत करून शून्याधारित ऊर्जेवर सदर प्रकल्प सुरू आहे. ५१ शेतकºयांच्या वैयक्तिक आर्थिक सहभागातून तथा शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीशिवाय सदर प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पाला आतापर्यंत १ कोटी २० लाख रुपये खर्च आला आहे. सध्या या प्रकल्पाचे पाणी मोर्णा धरणापासून थेट कोठारी गावापर्यंत यशस्वीपणे पोहोचले आहे. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक शेतकºयाच्या बांधापर्यंत तुषार संच ठिबक सिंचन अथवा प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी पोहोचले जाणार आहे. कोठारी येथे १२० हेक्टरवर संत्रा, मोसंबीच्या बागा आहेत. धरणाच्या पायथ्याशी असूनही गत दोन वर्षांपूर्वी या भागांना योग्य वेळी पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या होत्या. शेतीनिष्ठ शेतकरी हिंमतराव टप्पे यांनी सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्था स्थापन करून पाटबंधारे विभागाशी करार केला. त्याला कार्यकारी अभियंता वाकोडे, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, शाखा अभियंता गजानन अत्तरकार यांनी मोलाची साथ दिली. शून्य ऊर्जेवर आधारित प्रकल्प उभारण्यासाठी अभियंता हरिदास ताठे यांची भेट घेतली आणि मोर्णा धरणातून थेट कोठारी गावापर्यंत सुमारे साडेपाच किलोमीटर पाणी आणण्याचे ठरविले; मात्र यासाठी लागणारा १ कोटीहून अधिक निधी कसा उभा करावा, असा प्रश्न या दोघांसमोर उभा राहिला. बँकांनी नकार दिल्यानंतर ५१ शेतकºयांची बैठक घेतली आणि बहुतांश निधी वैयक्तिक स्तरावर उभा करण्यात आला; मात्र बुलडाणा अर्बन या बँकेने मदत दिल्याने प्रकल्प यशस्वी झाला.

पाण्यासह पैशांची बचतकॅनॉलचे पाणी हे हंगामी पद्धतीने मिळते. यामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. दुसरीकडे पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने अपव्यय कमी होतो. तसेच जेव्हा हवे असेल तेव्हा पाणी पुरवठा करू शकतो. पाणी वाटपासाठी कर्मचाºयांची गरज नाही, कॅनॉलप्रमाणे दुरुस्ती देखभाल करावी लागत नाही, पाण्याची मागणी करावी लागत नाही, प्रत्येक शेतकºयाची वेगवेगळी गरज लक्षात घेता सोयीनुसार पाणी पुरवठा शक्य झाला आहे. प्रत्येक शेतकºयासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था असल्यामुळे सिंचनात कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती