शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

‘१९७१’च्या भारत-पाक युद्धाचा साक्षीदार अकोल्यातील अंदुरा गावात!

By atul.jaiswal | Updated: December 16, 2017 13:21 IST

अकोला : भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला.

ठळक मुद्देभारत-पाकिस्तान युद्धाला १६ डिसेंबर रोजी झाली ४६ वर्षे पूर्ण. मराठा बटालियनचे माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी जागविल्या आठवणी.सहकारी डोळ्यादेखत धारातिर्थी पडल्याचे आठवताच आजही पाणवतात डोळे.

- अतुल जयस्वालअकोला : तत्कालीन हिंदुस्थानातून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानातील एक भाग असलेल्या पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर लष्कराकडून होत असलेला अत्याचार थांबविण्यासाठी सन १९७१ मध्ये भारताला हस्तक्षेप करावा लागला. बांगलादेश मुक्ती संग्रामाला पूर्णविराम देणाºया भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला. युद्धाचे स्मरण झाले, की डोळ्यादेखत धारातीर्थी पडलेल्या सहकाºयांच्या आठवणीने आजही डोळे पाणवतात, अशा शब्दांत साबळे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून काढता पाय घेताना या देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे केले. भारताचा वायव्येकडील भूभाग आणि पूर्वेकडील भूभाग मिळून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. सत्तेचे केंद्र पश्चिम पाकिस्तानात असल्याने पूर्व पाकिस्तानकडे दुर्लक्ष होऊ लागले तसेच लष्करी सरकारकडून पूर्व पाकिस्तानाती नागरिकांवर अत्याचार होऊ लागले. पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी पूर्व पाकिस्तानात बांगलादेश मुक्ती संग्रामास सुरुवात झाली. भारताच्या त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या स्वतंत्र संग्रामास पाठिंबा दिला. पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार वाढल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले आणि ३ डिसेंबर रोजी युद्धाला तोंड फुटले. या युद्धात मराठा बटालियनचे सैनिक अंदुरा येथील नारायणराव साबळे सहभागी होते. या युद्धात पहिल्याच दिवसापासून भारतीय सैनिक पाकिस्तानी लष्करावर वरचढ ठरले. पाकिस्तानी सैन्याने १५ डिसेंबरपर्यंत प्रतिकार केला; परंतु त्यांचा निभाव न लागल्यामुळे १६ डिसेंबर रोजी भारत-पाकमध्ये सिमला करार होऊन युद्ध संपुष्टात आले. करारानुसार भारताच्या ताब्यातील ९० हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक व नागरिकांना मुक्त करण्यात आले. युद्धात भारताचे ३ हजार ८४३ सैनिक शहीद झाले होते. यामध्ये नारायणराव साबळे यांचे सहकारी नारायण फाळके, यशवंत पवार, लक्ष्मण राणे, प्रभाकर काटकर, गजानन चव्हाण, तयप्पा नरवाडे, पी. एस. पाटील, दत्ता दळवी, मारोती जाधव आणि अशोक यादव यांना वीरमरण आले. डोळ्यादेखत सहकाºयांचा झालेला मृत्यू आणि मृतदेहांचा पडलेला खच पाहून आजही डोळे पाणवतात. त्यावेळी युद्धामुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळून बांगलादेशची निर्मिती झाली असली, तरी युद्धातून झालेली हानी अपरिमित होती, असे नारायणराव साबळे सांगतात.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानwarयुद्धSoldierसैनिकAkola Ruralअकोला ग्रामीण