शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘१९७१’च्या भारत-पाक युद्धाचा साक्षीदार अकोल्यातील अंदुरा गावात!

By atul.jaiswal | Updated: December 16, 2017 13:21 IST

अकोला : भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला.

ठळक मुद्देभारत-पाकिस्तान युद्धाला १६ डिसेंबर रोजी झाली ४६ वर्षे पूर्ण. मराठा बटालियनचे माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी जागविल्या आठवणी.सहकारी डोळ्यादेखत धारातिर्थी पडल्याचे आठवताच आजही पाणवतात डोळे.

- अतुल जयस्वालअकोला : तत्कालीन हिंदुस्थानातून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानातील एक भाग असलेल्या पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर लष्कराकडून होत असलेला अत्याचार थांबविण्यासाठी सन १९७१ मध्ये भारताला हस्तक्षेप करावा लागला. बांगलादेश मुक्ती संग्रामाला पूर्णविराम देणाºया भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला. युद्धाचे स्मरण झाले, की डोळ्यादेखत धारातीर्थी पडलेल्या सहकाºयांच्या आठवणीने आजही डोळे पाणवतात, अशा शब्दांत साबळे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून काढता पाय घेताना या देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे केले. भारताचा वायव्येकडील भूभाग आणि पूर्वेकडील भूभाग मिळून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. सत्तेचे केंद्र पश्चिम पाकिस्तानात असल्याने पूर्व पाकिस्तानकडे दुर्लक्ष होऊ लागले तसेच लष्करी सरकारकडून पूर्व पाकिस्तानाती नागरिकांवर अत्याचार होऊ लागले. पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी पूर्व पाकिस्तानात बांगलादेश मुक्ती संग्रामास सुरुवात झाली. भारताच्या त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या स्वतंत्र संग्रामास पाठिंबा दिला. पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार वाढल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले आणि ३ डिसेंबर रोजी युद्धाला तोंड फुटले. या युद्धात मराठा बटालियनचे सैनिक अंदुरा येथील नारायणराव साबळे सहभागी होते. या युद्धात पहिल्याच दिवसापासून भारतीय सैनिक पाकिस्तानी लष्करावर वरचढ ठरले. पाकिस्तानी सैन्याने १५ डिसेंबरपर्यंत प्रतिकार केला; परंतु त्यांचा निभाव न लागल्यामुळे १६ डिसेंबर रोजी भारत-पाकमध्ये सिमला करार होऊन युद्ध संपुष्टात आले. करारानुसार भारताच्या ताब्यातील ९० हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक व नागरिकांना मुक्त करण्यात आले. युद्धात भारताचे ३ हजार ८४३ सैनिक शहीद झाले होते. यामध्ये नारायणराव साबळे यांचे सहकारी नारायण फाळके, यशवंत पवार, लक्ष्मण राणे, प्रभाकर काटकर, गजानन चव्हाण, तयप्पा नरवाडे, पी. एस. पाटील, दत्ता दळवी, मारोती जाधव आणि अशोक यादव यांना वीरमरण आले. डोळ्यादेखत सहकाºयांचा झालेला मृत्यू आणि मृतदेहांचा पडलेला खच पाहून आजही डोळे पाणवतात. त्यावेळी युद्धामुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळून बांगलादेशची निर्मिती झाली असली, तरी युद्धातून झालेली हानी अपरिमित होती, असे नारायणराव साबळे सांगतात.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानwarयुद्धSoldierसैनिकAkola Ruralअकोला ग्रामीण