शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

‘१९७१’च्या भारत-पाक युद्धाचा साक्षीदार अकोल्यातील अंदुरा गावात!

By atul.jaiswal | Updated: December 16, 2017 13:21 IST

अकोला : भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला.

ठळक मुद्देभारत-पाकिस्तान युद्धाला १६ डिसेंबर रोजी झाली ४६ वर्षे पूर्ण. मराठा बटालियनचे माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी जागविल्या आठवणी.सहकारी डोळ्यादेखत धारातिर्थी पडल्याचे आठवताच आजही पाणवतात डोळे.

- अतुल जयस्वालअकोला : तत्कालीन हिंदुस्थानातून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानातील एक भाग असलेल्या पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर लष्कराकडून होत असलेला अत्याचार थांबविण्यासाठी सन १९७१ मध्ये भारताला हस्तक्षेप करावा लागला. बांगलादेश मुक्ती संग्रामाला पूर्णविराम देणाºया भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला. युद्धाचे स्मरण झाले, की डोळ्यादेखत धारातीर्थी पडलेल्या सहकाºयांच्या आठवणीने आजही डोळे पाणवतात, अशा शब्दांत साबळे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून काढता पाय घेताना या देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे केले. भारताचा वायव्येकडील भूभाग आणि पूर्वेकडील भूभाग मिळून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. सत्तेचे केंद्र पश्चिम पाकिस्तानात असल्याने पूर्व पाकिस्तानकडे दुर्लक्ष होऊ लागले तसेच लष्करी सरकारकडून पूर्व पाकिस्तानाती नागरिकांवर अत्याचार होऊ लागले. पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी पूर्व पाकिस्तानात बांगलादेश मुक्ती संग्रामास सुरुवात झाली. भारताच्या त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या स्वतंत्र संग्रामास पाठिंबा दिला. पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार वाढल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले आणि ३ डिसेंबर रोजी युद्धाला तोंड फुटले. या युद्धात मराठा बटालियनचे सैनिक अंदुरा येथील नारायणराव साबळे सहभागी होते. या युद्धात पहिल्याच दिवसापासून भारतीय सैनिक पाकिस्तानी लष्करावर वरचढ ठरले. पाकिस्तानी सैन्याने १५ डिसेंबरपर्यंत प्रतिकार केला; परंतु त्यांचा निभाव न लागल्यामुळे १६ डिसेंबर रोजी भारत-पाकमध्ये सिमला करार होऊन युद्ध संपुष्टात आले. करारानुसार भारताच्या ताब्यातील ९० हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक व नागरिकांना मुक्त करण्यात आले. युद्धात भारताचे ३ हजार ८४३ सैनिक शहीद झाले होते. यामध्ये नारायणराव साबळे यांचे सहकारी नारायण फाळके, यशवंत पवार, लक्ष्मण राणे, प्रभाकर काटकर, गजानन चव्हाण, तयप्पा नरवाडे, पी. एस. पाटील, दत्ता दळवी, मारोती जाधव आणि अशोक यादव यांना वीरमरण आले. डोळ्यादेखत सहकाºयांचा झालेला मृत्यू आणि मृतदेहांचा पडलेला खच पाहून आजही डोळे पाणवतात. त्यावेळी युद्धामुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळून बांगलादेशची निर्मिती झाली असली, तरी युद्धातून झालेली हानी अपरिमित होती, असे नारायणराव साबळे सांगतात.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानwarयुद्धSoldierसैनिकAkola Ruralअकोला ग्रामीण