शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

रब्बी हंगामात सिंचनासाठी १४० दलघमी पाणी सोडणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:41 IST

अकोला : जिल्ह्यातील धरणात २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात काटेपूर्णा, वान हे दोन मोठे, मोर्णा, निर्गुणा, उमा तीन मध्यम तर २९ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पामध्ये सध्या २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यातील १४० दशलक्ष घनमीटर पाणी यावर्षी संपूर्ण रब्बी हंगामात सहा पाळीत सोडण्यात येणार आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : जिल्ह्यातील धरणात २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात २३ हजार हेक्टरवरील पिके फुलणार आहेत.जिल्ह्यात काटेपूर्णा, वान हे दोन मोठे, मोर्णा, निर्गुणा, उमा तीन मध्यम तर २९ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पामध्ये सध्या २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यातील १४० दशलक्ष घनमीटर पाणी यावर्षी संपूर्ण रब्बी हंगामात सहा पाळीत सोडण्यात येणार आहे. वान धरणाचे पाणी १२ नोव्हेंबरपासून सोडण्यात येत आहे. या धरणातून पाणी सोडण्याची पहिली पाळी संपली असून, दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचत नसल्याची शेतकºयांची तक्रार आहे. वान धरणात आजमितीस ७२.६५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यावर्षी यातील ४३ दलघमी जलसाठा पिकांना पाणी देण्यासाठी सोडण्यात येणार आहे. यापैकी आतापर्यंत १.५ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणात ६३.८६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. या धरणातूनही १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येत आहे. सहा पाळीत हे पाणी सोडण्यात येणार असून, आतापर्यंत ११ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात १०.६० दलघमी साठा आहे. या धरणातून यावर्षी सहा पाळीत पाणी सोडले जात आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात २६.९२ दलघमी जलसाठा आहे. या धरणातूनही सहा पाळीत पाणी सोडण्यात येत आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणात २०.२४ दलघमी जलसाठा असल्याने या धरणाच्या क्षेत्रातील शेतीला तीन टप्प्यातच पाणी सोडण्यात येणार आहे. मागील काही वर्षांत या धरणातून पाणी सिंचनासाठी मिळाले नसल्याने रब्बी, उन्हाळी हंगामातील पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. यावर्षी वºहाडातील पाच जिल्ह्यांपैकी अकोल्यातील धरणातील पाणीसाठा बºयापैकी आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी पिकांना पाणी सोडण्यात येत आहे.

- जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्प मिळून २१६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. यापैकी १४० दलघमी पाणी सहा टप्प्यात सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.नयन लोणारे,शाखा अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीDamधरणagricultureशेती