शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

रब्बी हंगामात सिंचनासाठी १४० दलघमी पाणी सोडणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:41 IST

अकोला : जिल्ह्यातील धरणात २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात काटेपूर्णा, वान हे दोन मोठे, मोर्णा, निर्गुणा, उमा तीन मध्यम तर २९ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पामध्ये सध्या २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यातील १४० दशलक्ष घनमीटर पाणी यावर्षी संपूर्ण रब्बी हंगामात सहा पाळीत सोडण्यात येणार आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : जिल्ह्यातील धरणात २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात २३ हजार हेक्टरवरील पिके फुलणार आहेत.जिल्ह्यात काटेपूर्णा, वान हे दोन मोठे, मोर्णा, निर्गुणा, उमा तीन मध्यम तर २९ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पामध्ये सध्या २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यातील १४० दशलक्ष घनमीटर पाणी यावर्षी संपूर्ण रब्बी हंगामात सहा पाळीत सोडण्यात येणार आहे. वान धरणाचे पाणी १२ नोव्हेंबरपासून सोडण्यात येत आहे. या धरणातून पाणी सोडण्याची पहिली पाळी संपली असून, दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचत नसल्याची शेतकºयांची तक्रार आहे. वान धरणात आजमितीस ७२.६५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यावर्षी यातील ४३ दलघमी जलसाठा पिकांना पाणी देण्यासाठी सोडण्यात येणार आहे. यापैकी आतापर्यंत १.५ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणात ६३.८६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. या धरणातूनही १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येत आहे. सहा पाळीत हे पाणी सोडण्यात येणार असून, आतापर्यंत ११ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात १०.६० दलघमी साठा आहे. या धरणातून यावर्षी सहा पाळीत पाणी सोडले जात आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात २६.९२ दलघमी जलसाठा आहे. या धरणातूनही सहा पाळीत पाणी सोडण्यात येत आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणात २०.२४ दलघमी जलसाठा असल्याने या धरणाच्या क्षेत्रातील शेतीला तीन टप्प्यातच पाणी सोडण्यात येणार आहे. मागील काही वर्षांत या धरणातून पाणी सिंचनासाठी मिळाले नसल्याने रब्बी, उन्हाळी हंगामातील पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. यावर्षी वºहाडातील पाच जिल्ह्यांपैकी अकोल्यातील धरणातील पाणीसाठा बºयापैकी आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी पिकांना पाणी सोडण्यात येत आहे.

- जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्प मिळून २१६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. यापैकी १४० दलघमी पाणी सहा टप्प्यात सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.नयन लोणारे,शाखा अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीDamधरणagricultureशेती