शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

होलसेल औषध व्यावसायिकांचा हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:28 IST

औषध देण्यासाठी केवळ दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ दिल्याने शेकडो रुग्णांना आवश्यक तसेच महत्त्वाची औषधी मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

- सचिन राऊतअकोला: कोरोनाच्या भीषण संकटामुळे राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी औषध दुकाने २४ तास उघडे ठेवण्याचा आदेश असतानाही जिल्ह्यातील होलसेल औषध व्यावसायिकांनी किरकोळ औषध व्यावसायिकांना औषध देण्यासाठी केवळ दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ दिल्याने शेकडो रुग्णांना आवश्यक तसेच महत्त्वाची औषधी मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. होलसेल औषध व्यावसायिकांनी आॅर्डर घेण्यासाठी दुपारपर्यंतच वेळ दिल्याने अन्न व औषध प्रशासनाचे त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे यावरून दिसून येत आहे.कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे गंभीर संकट रोखण्यासाठी आरोग्य आणि औषध विभागावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे औषध दुकाने आणि हॉस्पिटल २४ तास उघडे ठेवण्याचा आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यासोबतच औषधांची गरज हजारो रुग्णांना असतानाही अशा गंभीर आरोग्याच्या संकटावेळी औषध दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; मात्र अकोल्यातील दवा बाजार तसेच होलसेल औषध विक्रेते, किरकोळ औषध विक्रेत्यांची आॅर्डर घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेकडो रुग्णांना औषधीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. अशातच गत दोन दिवसांपासून होलसेल औषध व्यावसायिकांनी किरकोळ व्यावसायिकांच्या आॅर्डर घेण्यासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ दिली आहे. या वेळेनंतर किरकोळ औषध व्यावसायिकांना औषधी लागल्यास होलसेल औषध विक्रेते औषध देण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांकडे येत असलेल्या अनेक रुग्णांना औषधीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण असलेल्या औषध व्यावसायिकांनी अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतरही औषध प्रशासन विभाग मात्र झोपेत असल्याचे दिसून येत आहे.मुंबईत परवाना निलंबनाची कारवाईमुंबईत जे औषध व्यावसायिक वेळ ठरवून औषधांची दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत; मात्र अकोल्यातील होलसेल औषध विक्रेते शासनाचा आदेश तुडवित केवळ दुपारी २ वाजतापर्यंत वेळ ठरवून औषध देत असल्याने अत्यावश्यक सेवेत खंड करीत असल्याचे दिसून येत आहे. यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालावे!किरकोळ औषध व्यावसायिकांना होलसेल औषध व्यावसायिक दुपारी २ वाजतानंतर औषध देत नसल्याने हजारो रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे किरकोळ औषध दुकानांमध्ये आता औषध नसल्याने तसेच सकाळी ११ ते दुपारी २ याच वेळेत होलसेलर्सकडून औषध मिळत असल्याने अनेक औषध दुकानांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे.रात्रीच्या रुग्णांचे हालखेड्यापाड्यांतून तसेच शहरातील रात्री-बेरात्री इमरजन्सीमध्ये रुग्णालयात दाखल होत असलेल्या रुग्णांना काही औषधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. किरकोळ औषध व्यावसायिकांकडे हा पुरवठाच आता योग्य होत नसल्याने रुग्णांचे हाल-बेहाल होत आहेत. औषध प्रशासन विभागाचे अधिकारीही यावर नियंत्रण मिळवित नसल्याने नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmedicineऔषधं