शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पांढरं सोनं काळवंडलं!, कापसाचे ‘अर्थशास्त्र’ कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:38 PM

कापूस हे विदर्भातील मुख्य नगदी पीक असले, तरी राज्यातील मराठवाडा, खान्देशसह जवळपास सर्वच भागात आता घेतले जात आहे.

राजरत्न सिरसाट अकोला : कापूस हे विदर्भातील मुख्य नगदी पीक असले, तरी राज्यातील मराठवाडा, खान्देशसह जवळपास सर्वच भागात आता घेतले जात आहे. म्हणूनच खरिपाच्या १ कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी कापूस ४१.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर टिकून आहे. कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र या पिकावर अवलंबून आहे. वर्षभराची सर्व उधारी, उसणवारीचे व्यवहार याच पिकावर ठरलेले असतात. यामध्ये मुला-मुलींच्या लग्नाचाही समावेश आहे. म्हणूनच या पिकाला ‘पांढरं सोनं’ संबोधले जाते, पण पावसाची अनिश्चितता, उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने पांढरं सोनं काळवंडल्याचे दिसत आहे.राज्यात मुख्यत्वे विदर्भ, मराठवाड्यात पारंपरिक पिकाऐवजी शेतकरी सोयाबीनच्या पिकाकडे वळला, पण पारंपरिक कापसाचे पीक शेतकरी घेतातच, म्हणूनच राज्यात गतवर्षी सोयाबीनचे ३८ तर कापसाचे क्षेत्र ४१.९८ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले होते. कापूस संवेदनशील पीक आहे. पेरणी ते काढणीपर्यंत या पिकाची काळजी घ्यावी लागते. खते, कीटकनाशके, कोळपणी, इतर आवश्यक या पिकांच्या गरजा पूर्णच कराव्या लागतात, पण उत्पादन खर्चावर दर मिळत नाही. या पिकाच्या उत्पादनावर वर्षाचे आर्थिक व्यवहार केलेले असल्याने शेतकरी ही परतफेड करू शकत नाहीत. परिणामी, कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकरी आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घेत आहेत.या वर्षीचा उत्पादन खर्च!२०१७-१८ वर्षीचा उत्पादन खर्च हा हेक्टरी ४१ हजार ०६५ रुपये एवढा आला आहे. हेक्टरी सरासरी उत्पन्न हे २५ क्विंटल अपेक्षित होते. एवढे उत्पन्न जर झाले असते, तर आधारभूत किमतीनुसार ९७ हजार ५०० रुपये मिळाले असते. म्हणजेच यातून ४१ हजार ६५ रुपये वजा केले, तर शेतकºयांना ५६ हजार ४३५ रुपये नफा झाला असता, पण प्रत्येक वर्षी शेतकºयांसाठी हे मृगजळच ठरत आहे.विदर्भाचे उत्पादन घटले!मागील वर्षी विदर्भाला ३८ लाख गाठी कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात३२ लाख गाठी उत्पादन झाले.म्हणजेच विदर्भात २५ टक्के कापसाचे उत्पादन घटले.>राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्टÑ, तसेच पश्चिम महाराष्टÑातील काही भागात कापसाचे पीक घेतले जाते. मागील वर्षी या क्षेत्रात १० टक्के वाढ झाली. म्हणजेच ४१.९८ लाख हेक्टरवर कापूस पीक घेण्यात आले. त्यामुळे उत्पादनाचे उद्दिष्ट हे १०० लाख गाठी होते. प्रत्यक्षात ८५ लाख गाठी उत्पादन झाले. २०१६-१७ मध्ये राज्यातील कापसाचे क्षेत्र ३८ लाख हेक्टर होते, पण उत्पादन ८८.५० लाख गाठी झाले होते. म्हणजेच २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या वर्षी हे उत्पादन ३ लाख ५० हजार गाठी कमी आहे. कमी पाऊस आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर हा परिणाम झाल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला.>वर्षे क्षेत्र उत्पादन उत्पन्न(लाख/हे.) (लाख गाठी) (रू ई किलो/हे.)२००८-०९ ३१.४३ ६२.०० ३५५२००९-१० ३५.०३ ६५.७५ ३१९२०१०-११ ३९.४२ ८७.७५ ३७८२०११-१२ ४१.२५ ७६.०० ३१३२०१२-१३ ४१.४६ ८१.०० ३३२२०१३-१४ ४१.९२ ८४.०० ३४१२०१४-१५ ४१.९० ८०.०० ३२४२०१५-१६ ४२.०७ ७६.०० ३०७२०१६-१७ ३८.०० ८८.५० ३९६२०१७-१८ ४१.९८ ८५.०० ३४४>आधारभूत किंमतवर्ष मध्यम धागा लांब धागा(प्रतिक्ंिवटल/रुपये)२००९-१० २,५०० ३,०००२०१०-११ २,५०० ३,०००२०११-१२ २,८०० ३,३००२०१२-१३ ३,६०० ३,९००२०१३-१४ ३,७०० ४,०००२०१४-१५ ३,७५० ४,०५०२०१५-१६ ३,८०० ४,१००२०१६-१७ ३,८६० ४,१६०२०१७-१८ ४,०२० ४,३२०मागील वर्षी कापसाला हमी दर ४,३२० रुपये प्रतिक्विंटल होता. सरासरी हेक्टरी उत्पादन बघितल्यास ४ क्व्ािंटल एवढेच होते. काही भागांत हे उत्पादन एक ते दोन क्ंिवटल एवढेच होते. हेक्टरी उत्पादन खर्च बघितल्यास तो ४१ हजार ०६५ एवढा आला. म्हणजेच मागील वर्षी शेतकºयांचे या पिकात प्रचंड नुकसान झाले.