एरंडीची ‘होळी’ थांबणार कधी?

By Admin | Updated: March 3, 2015 23:41 IST2015-03-03T23:41:36+5:302015-03-03T23:41:36+5:30

राज्यात ९ हजार हेक्टर क्षेत्र; वनऔषधी नष्ट होण्याच्या मार्गावर.

When will the Holi stop? | एरंडीची ‘होळी’ थांबणार कधी?

एरंडीची ‘होळी’ थांबणार कधी?

नीलेश शहाकार/बुलडाणा : शेताच्या धुर्‍यावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी तसेच राज्य शासनाला वर्षाला २ कोटीचे उत्पन्न मिळवून देणार्‍या एरंडीच्या झाडांवर होळीनिमित्त कुर्‍हाड चालविली जाणार आहे. होळीसाठी एंरडीचा वापर केला जात असल्यामुळे राज्यातील ९हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली बहूमुल्य वनऔषधी एरंडी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एरंडीची अशी ह्यहोळीह्ण थांबणार कधी हाच खरा प्रश्न आहे.
आजही सार्वजनिक आणि घरगुती ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी पेटविली जाते. होळीत जाळण्यासाठी वृक्षतोड होते. होळीवर एरंडीच्या झाडाची फांदी बांधून होळी पेटविण्याची प्रथा आहे, यासाठी दरवर्षी एरंडीचे शेकडो झाडे कापली जातात. शेताच्या धुर्‍यावर लावण्यात आलेल्या एरंडीच्या झाडाच्या फांद्या तोडून होळीत टाकण्यात येत असल्यामुळे नित्य उपयोगात एरंडी ही वनऔषधी दुर्मिळ झाली आहे.
महाराष्ट्रात एरंडीचे क्षेत्र ९000 हेक्टर असून त्यापासून मिळणारे उत्पादन २000 मेट्रीक टन आहे. बुलडाणा जिल्ह्यात एरंडीचे सरासरी क्षेत्र ५४0 हेक्टर असून एरंडी हे पीक जिरायती तसेच बागायती क्षेत्रात घेतले जाते. कोरडवाहू शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, पपई, द्राक्ष, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती किडनाशक म्हणून तसेच पारंपरीक औषधी तयार करण्यासाठी केला जातो.
येत्या गुरुवारी हजारो सार्वजनिक तसेच वैयक्तिक होळ्या जळणार आहेत. यामध्ये लाकडे, गोवर्‍या, पुरणपोळी, तुप यांची आहुती देत असतात. त्यामुळे हवेत मोठय़ा प्रमाणात शुद्धता होण्यास मदतच होते, असा समज आहे. प्रत्येक होळीमध्ये एरंडीच्या झाडाची फांदी जाळण्याची परंपरा आहे. एकीकडे होळी दरम्यान ह्यझाडे लावा झाडे जगवाह्ण आवाहन होत असताना दुसरीकडे शेकडो एरंडीचे झाडे छाटली जाणार आहेत.

*दोन कोटीचे उत्पन्न
मुंबई परिसरात एरंडीची दरवर्षी मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. शिवाय हे पीक धारवाड, बेळगांव व सोलापूर जिल्ह्यात महत्वाचे आहे. राज्याबाहेर कोलकाता, तामिळनाडू, बैतूल, रायपूर व विलासपूर या ठिकाणी एरंडीची जास्त लागवड होते. एरंडेल तेलाचा औषधीत उपयोग होतो. म्हणून एरंडीची निर्यात करुन महाराष्ट्र शासनाला दरवर्षी २ कोटी रुपये उत्पन्न मिळते.
*बहुगुणी एरंड
एरंड ही वनस्पती अशी आहे की बीया, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडी वनऔषधीमुळे शहरातील वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, बस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश होतो. पाने जनावरास भरपूर खाऊ घातल्याने दूध वाढते. शिवाय पपई, द्राक्ष व इतर बागायती क्षेत्रात लावण्यात आलेले एरंडीची झाड कीडनाशक म्हूणन काम करते.

Web Title: When will the Holi stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.