शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बंद पडलेल्या ४२२ योजनांचा पाणी पुरवठा सुरु !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 14:31 IST

थकीत वीज देयकापोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

- संतोष येलकर

अकोला : दुष्काळी परिस्थितीत थकीत वीज देयकांच्या मुद्दल रकमेपैकी पाच टक्के रकमेचा भरणा मार्च अखेरपर्यंत जिल्हा परिषदमार्फत महावितरण कंपनीकडे करण्यात आला. त्यानंतर थकीत वीज देयकापोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ग्रामीण आणि नागरी भागातील ज्या पाणी पुरवठा योजना थकीत विद्युत देयकांची रक्कम भरली नसल्याने बंद आहेत, तसेच या पाणी पुरवठा योजना सुरू केल्यानंतर लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, अशा पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या मुद्दलपैकी पाच टक्के रक्कम शासनामार्फत टंचाई निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या भागातील पाणी पुरवठा योजनांच्या नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीतील वीज देयकांचा खर्च भागविण्यासाठी टंचाई निधीतून निधी वितरित करण्यास १७ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार शासनामार्फत प्राप्त निधीतून ३० मार्चपर्यंत जिल्ह्यातील ४२२ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांतील पाच टक्के, २६ लाख ११ हजार २६६ रुपये रकमेचा भरणा जिल्हा परिषदमार्फत महावितरण कंपनीकडे करण्यात आला. थकीत वीज देयकांतील मुद्दल रकमेपैकी पाच टक्के रकमेचा भरणा करण्यात आल्याने, महावितरणमार्फत संबंधित पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे थकीत वीज देयकांपोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.थकीत वीज देयकांचा भरणा केलेल्या पाणी पुरवठा योजना!तालुका                     योजनाबार्शीटाकळी                ५६अकोट                         ०५तेल्हारा                       १२६बाळापूर                      १०६पातूर                           २३मूर्तिजापूर                  १०६....................................एकूण                       ४२२टंचाईत २.७७ लाख ग्रामस्थांना दिलासा !थकीत वीज देयकांच्या मुद्दल रकमेपैकी पाच टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर जिल्ह्यातील ४२२ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाई परिस्थितीत या योजनांतर्गत गावांतील २ लाख ७७ हजार ४० ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूकmahavitaranमहावितरणAkola ZPअकोला जिल्हा परिषद