शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

वऱ्हाडातील जलसाठा स्थिरावला ६३ टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:40 PM

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६३.४८ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. पावसाचा आठवडा शिल्लक असताना अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ५१.७५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील धरणांची स्थिती दयनीय आहे.

ठळक मुद्देअकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६३.४८ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. पावसाचा आठवडा शिल्लक असताना अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ५१.७५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील धरणांची स्थिती दयनीय आहे. खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात १०० टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ५२.४१ टक्के, तर वान धरणात ९५.३० टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ८.९३ टक्के आहे. तोरणा १४.७०, तर उतावळी धरणातील पातळी ३५.८३ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १८.३६ टक्के, पेनटाकळी धरणात १९.३८ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.७२ टक्के, पलढगमध्ये ३१.८२ टक्के, मन धरणात २५.९८ टक्के, तर मसमध्ये केवळ ३.०६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ९४.८१ टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात ५१.७५ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ९५.२८ तर बेंबळा धरणात ६२.०२ टक्केच जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर