शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

पाणी टंचाईच्या झळा वाढल्या !

By admin | Updated: May 5, 2017 14:06 IST

धरणांतील जलसाठय़ाची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे.

शेकडो गावात पाण्यासाठी पायपीट;टॅँकरचा पत्ता नाहीअकोला : एप्रिलअखेरीस जिल्हयातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांतील जलसाठय़ाची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४४ अंशापर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ ३0 टक्के जलसाठा शिल्लक आहे.प्रशासनाने आतापासून नवे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान,महानगरपालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या गुडधी गावात स्वांत्र्य मिळाले तेव्हापासून पिण्याच्या पाण्याची सोय नाही,येथील नागरिकांना खारे पाणी सेवन करावे लागत आहे.मागील वर्षी पाऊस बरा झाला तरी त्यामध्ये या भागात सातत्य नव्हते त्यामुळे यावर्षी मध्यम व मोठय़ा धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या पृष्टभूमीवर टंचाईची तीव्रता वाढल्याने नागरिकांची जिल्हा प्रशासनाकडे टॅँकरची मागणी वाढत आहे.दरम्यान, उन्हाचा कडका ४२ ते ४४ अंशावर गेल्याने बाष्पीभवनाचा वेग दररोज ११ ते १४ मि.मी.ने वाढला आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात एप्रिल महिन्याच्या शेवटी ३२ टक्के जलसाठा उपलब्ध होता, तो आजमितीस ३0 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात २१.५३, निर्गुणा २५.५३, उमा धरणात १४.१६ टक्के तर दगडपारवामध्ये १0.२९ टक्के जलसाठा आहे, तर तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ६0 टक्के जलसाठा होता यासर्व धरणांच्या जलसाठय़ामध्ये पुन्हा घसरण झाली आहे. - गुडधी पाणी टंचाईमहानगर पालिकेत समाविष्ठ झालेल्या गुडधी यागावचे नागरिक सालोसाल खार्‍यापाण्याचे सेवन करत असून, प्रत्येक उन्हाळ्य़ात या पाण्यासाठीदेखील नागरिकांना मैलोगंती पायपीट करावी लागत आहे. यावर्षी येथे भीषण पाणीटंचाई आहे.ग्रामपंचायत असताना येथे पावणे दोन कोटी रू पये खचरून नळ योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली पण पाणी मिळाले नाही. महानगर पालिकेत गाव गेल्यानंतर पाणी मिळले अशी अपेक्षा होता पण ताही अद्याप पुर्ण झालेली नाही. ग्रामपंचायत असताना उन्हाळ्य़ात टॅँकरने पाणी पुरवठा केला जात होता . यावर्षी टॅँकरही नाही. नळयोजनेसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश राऊत यांनी याबाबतीत पुढकार घेत आहेत. -काटेपूर्णा धरणात ३0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. जून, जुलैपर्यंत हा जलसाठा वापरता येईल; परंतु यापुढे या शिल्लक असलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.- विजय लोळे, कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग,अकोला.