शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

वऱ्हाडातील धरणात २८.१ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 4:46 PM

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्के साठा आहे.

अकोला : पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात बुधवारपासून बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने ५०२ प्रकल्पांतील जलसाठ्यात २८.०१ टक्के वाढ झाली आहे. अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा २७ टक्क्यांवर पोहोचला असून, अकोला जिल्ह्यातील वान धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. या ५०२ प्रकल्पांत गुरुवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत २८.०१ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. मोठ्या ९ धरणांतील बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचा साठा शून्य टक्केच तर अकोला शहराची तहान भागविणाºया काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्केच जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणात २७.४२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात ३४.८१, अरुणावतीमध्ये ११.४०, अरुणावती धरणात ५७.३० टक्के जलसाठा संचयित झाला आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्के साठा आहे. याच जिल्ह्यातील वान धरणात मुबलक जलसाठा संचयित झाल्याने या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणात ४१.२० टक्के, नळगंगा धरणात १४.६७ टक्के साठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ४५.१२ टक्के साठा उपलब्ध झाला. यामध्ये अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील चार मध्यम प्रकल्प शून्य टक्क्यावरच आहेत. ४६९ लघू प्रकल्पांत १७.१३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण