शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

 वऱ्हाडातील जलसाठ्यात झपाट्याने घट;  जलसंकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:33 IST

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग सध्या १८ मि.मी. च्यावर वाढल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.

ठळक मुद्दे पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणे मिळून केवळ १९.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग सध्या १८ मि.मी. च्यावर वाढल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. परिणाम पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, टॅँकरची मागणी वाढली आहे. नागरिक पाण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे काढत आहेत. अकोल्यात आमदारांच्या निवासस्थानासमोर पाण्यासाठी लोटांगण आंदोलन केले.यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणे मिळून केवळ १९.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दीड महिन्यात या जलसाठ्यात २८ टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर ६.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.वऱ्हाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, नोव्हेंबर महिन्यात हा जलसाठा ४९.९७ टक्के होता. आता या सर्व प्रकल्पात आजमितीस १९.९९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. १९ एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात ६.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १०.२३ टक्के, निर्गुणा २.३२, उमा धरणात केवळ शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात सध्या ७०.६७ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.०८ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ०.० टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ११.२७ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ३२.९२, मसमध्ये शून्य टक्के, कोराडी ०.८६, पलढग १३.९८, मन ११.२७, तोरणा ७.३५ टक्के, तर उतावळी धरणात ११.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १५.८५ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, तर एकबुर्जी धरणात १.११ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात १४.७१ टक्के, अरुणावतीमध्ये ७.१४, तर बेंबळा धरणात १३.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ४१.५५ टक्के एवढा बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे.

- वऱ्हाडात नऊ मोठे प्रकल्प१९ एप्रिलपर्यंत वऱ्हाडातील नऊ मोठ्या धरणात १९.९९ टक्के जलसाठा आहे. २३ मध्यम प्रकल्पात २१.९४ टक्के, तर ४५२ लघू प्रकल्पात ११.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या सर्व जलसाठ्यातील पाण्याची सरासरी टक्केवारी ही १९.९९ टक्के आहे. यातील लघू प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. त्यामुळे मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणीच वापरले जाणार आहे. त्यामुळे १९ टक्केपेक्षा कमी जलसाठा आजमितीस शिल्लक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीKatepurna Damकाटेपूर्णा धरणnalganga damनळगंगा धरण