शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

 वऱ्हाडातील जलसाठ्यात झपाट्याने घट;  जलसंकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:33 IST

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग सध्या १८ मि.मी. च्यावर वाढल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.

ठळक मुद्दे पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणे मिळून केवळ १९.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग सध्या १८ मि.मी. च्यावर वाढल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. परिणाम पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, टॅँकरची मागणी वाढली आहे. नागरिक पाण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे काढत आहेत. अकोल्यात आमदारांच्या निवासस्थानासमोर पाण्यासाठी लोटांगण आंदोलन केले.यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणे मिळून केवळ १९.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दीड महिन्यात या जलसाठ्यात २८ टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर ६.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.वऱ्हाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, नोव्हेंबर महिन्यात हा जलसाठा ४९.९७ टक्के होता. आता या सर्व प्रकल्पात आजमितीस १९.९९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. १९ एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात ६.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १०.२३ टक्के, निर्गुणा २.३२, उमा धरणात केवळ शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात सध्या ७०.६७ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.०८ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ०.० टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ११.२७ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ३२.९२, मसमध्ये शून्य टक्के, कोराडी ०.८६, पलढग १३.९८, मन ११.२७, तोरणा ७.३५ टक्के, तर उतावळी धरणात ११.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १५.८५ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, तर एकबुर्जी धरणात १.११ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात १४.७१ टक्के, अरुणावतीमध्ये ७.१४, तर बेंबळा धरणात १३.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ४१.५५ टक्के एवढा बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे.

- वऱ्हाडात नऊ मोठे प्रकल्प१९ एप्रिलपर्यंत वऱ्हाडातील नऊ मोठ्या धरणात १९.९९ टक्के जलसाठा आहे. २३ मध्यम प्रकल्पात २१.९४ टक्के, तर ४५२ लघू प्रकल्पात ११.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या सर्व जलसाठ्यातील पाण्याची सरासरी टक्केवारी ही १९.९९ टक्के आहे. यातील लघू प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. त्यामुळे मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणीच वापरले जाणार आहे. त्यामुळे १९ टक्केपेक्षा कमी जलसाठा आजमितीस शिल्लक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीKatepurna Damकाटेपूर्णा धरणnalganga damनळगंगा धरण