शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

पाण्याची पातळी घसरली; अकोला जिल्ह्यातील १५ हजारावर हेक्टरवरील फळबागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 17:19 IST

अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात पाणी आटण्याच्या मार्गावर असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत.

ठळक मुद्देजमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नसल्याने विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे.

अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात पाणी आटण्याच्या मार्गावर असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत. दरम्यान, पाणीटंचाईने नागरिकांची होरपळ सुुरू आहे.मागील वर्षी चांगला पाऊस पूरक न झाल्याने धरणे, धरणात पूरक जजसाठा संचयित झाला नाही. त्यामुळे जमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नसल्याने विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. या सर्व परिस्थितीची झळ यावर्षी भाजीपाला व फळ बागायतदार शेतकºयांना सोसावी लागत आहे.जिल्ह्यात सर्वाधिक साडे तीन हजार हेक्टरवर संत्रा आहे. दुसºया क्रमांकावर २३०० हेक्टरच्यावर लिंबू असून, केळी २२५० हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५०, चिकू ७५, सीताफळ ७५,आवळा ९० तर आंबा ६२५ हेक्टर आहे. मागील दोन वर्षात शेतकºयांनी फळ पिकाचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु उद्भवणाºया पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील लिंबाची देशभरात ओळख आहे. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे. 

भीषण दुष्काळाचा सामनाएकीकडे गावागावांतील शेतकरी भीषण दुष्काळाने हवालदिल झाला आहे. उपलब्ध पाणी ठिबक सिंचनाद्वारे फळबागांना देऊन बागा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. असे असताना अन्न आणि पाण्याच्या शोधात निघालेली रानडुकरे आणि नीलगायी धुमाकूळ घालत फळबागा,भाजीपाल्याचे नुकसान करीत आहे. बाग जगवणे हे सर्वात मोठे आव्हान आमच्या समोर असते. बाग जळाली की, आम्ही काय करावे, संसाराचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न आम्हाला सतावतो अशा प्रतीक्रीया शेतकºयांमधून उमटत आहेत. 

 पाण्याच्या टाक्यांना कुलपेजिल्हयात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मैलोगंती पायपीट सुरू आहे. जे काही पाणी उपलब्ध होते ते पाणी प्लॅस्टीकच्या टाकीमध्ये साठवून त्याला कुलपे लावली जात आहेत. खारपाण पट्टयातील चित्र विदारक आहे. माणसं पाणी मिळवतात पण मुक्या जनावरांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे. गुरांना पाणी मिळत नसल्याने शेतकºयांनी गुरे विक्रीचा सपाटा लावला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीagricultureशेती