शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पाण्याची पातळी घसरली; अकोला जिल्ह्यातील १५ हजारावर हेक्टरवरील फळबागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 17:19 IST

अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात पाणी आटण्याच्या मार्गावर असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत.

ठळक मुद्देजमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नसल्याने विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे.

अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात पाणी आटण्याच्या मार्गावर असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत. दरम्यान, पाणीटंचाईने नागरिकांची होरपळ सुुरू आहे.मागील वर्षी चांगला पाऊस पूरक न झाल्याने धरणे, धरणात पूरक जजसाठा संचयित झाला नाही. त्यामुळे जमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नसल्याने विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. या सर्व परिस्थितीची झळ यावर्षी भाजीपाला व फळ बागायतदार शेतकºयांना सोसावी लागत आहे.जिल्ह्यात सर्वाधिक साडे तीन हजार हेक्टरवर संत्रा आहे. दुसºया क्रमांकावर २३०० हेक्टरच्यावर लिंबू असून, केळी २२५० हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५०, चिकू ७५, सीताफळ ७५,आवळा ९० तर आंबा ६२५ हेक्टर आहे. मागील दोन वर्षात शेतकºयांनी फळ पिकाचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु उद्भवणाºया पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील लिंबाची देशभरात ओळख आहे. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे. 

भीषण दुष्काळाचा सामनाएकीकडे गावागावांतील शेतकरी भीषण दुष्काळाने हवालदिल झाला आहे. उपलब्ध पाणी ठिबक सिंचनाद्वारे फळबागांना देऊन बागा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. असे असताना अन्न आणि पाण्याच्या शोधात निघालेली रानडुकरे आणि नीलगायी धुमाकूळ घालत फळबागा,भाजीपाल्याचे नुकसान करीत आहे. बाग जगवणे हे सर्वात मोठे आव्हान आमच्या समोर असते. बाग जळाली की, आम्ही काय करावे, संसाराचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न आम्हाला सतावतो अशा प्रतीक्रीया शेतकºयांमधून उमटत आहेत. 

 पाण्याच्या टाक्यांना कुलपेजिल्हयात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मैलोगंती पायपीट सुरू आहे. जे काही पाणी उपलब्ध होते ते पाणी प्लॅस्टीकच्या टाकीमध्ये साठवून त्याला कुलपे लावली जात आहेत. खारपाण पट्टयातील चित्र विदारक आहे. माणसं पाणी मिळवतात पण मुक्या जनावरांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे. गुरांना पाणी मिळत नसल्याने शेतकºयांनी गुरे विक्रीचा सपाटा लावला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीagricultureशेती