शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा धरणाचे पाणी सिंचनासाठी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 16:08 IST

यावर्षी मुबलक पाऊस झाला असून, धरणातही मुबलक जलसाठा असल्याने पाटबंधारे विभागाने शेती सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काटेपूर्णा धरणातील पाणी रविवार, १५ डिसेंबरपासून सिंचनासाठी सोडण्यात आले असून, प्रतिसेंकद ४० (क्युसेस) घनमीटर असे हे सुरुवातीचे प्रमाण आहे; परंतु कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे अर्धवट असल्याने यातील किती पाणी ( हेड टू टेल) शेवटच्या शेतापर्यंत पोहोचते की नाही, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.गतवर्षी धरणात अपेक्षित पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. यावर्षी मुबलक पाऊस झाला असून, धरणातही मुबलक जलसाठा असल्याने पाटबंधारे विभागाने शेती सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे; परंतु सोडण्यापूर्वी कालवे, वितरिका, पाटचाºयांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करावी लागतात. तेव्हाच पाणी सोडले जाते.तथापि, यावर्षी देखभाल दुरुस्तीचे नियोजनच रखडल्याने आता कुठे भारतीय जैन संघटना व पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून कामे केली जात आहेत. सध्या बहादूरपूर कालवा, वितरिका व लघू कालव्याच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.काटेपूर्णा धरणांतर्गत ८ हजार ३२५ हेक्टर सिंचन लाभक्षेत्र आहे. त्यासाठी आणखी पाणी सोडावे लागणार आहे. काटेपूर्णा प्रकल्पावरील उन्नई बंधारा खांबोरा येथून सुरुवातीला प्रतिसेकंद ४० घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे.यावेळी काटेपूर्णा प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे, उपविभागीय अधिकारी अभिजित नितनवरे, शाखाधिकारी नीलेश घारे, अन्वीचे उपसरपंच प्रशांत नागे, कुकडे, सदार, पवार आदी शेतकरी उपस्थित होते. सिंचन कायदा २००५ व नियम २००६ नुसार शेतकºयांनी काटकसरीने पाणी वापरून टेल टू हेड या संकल्पनेवर भर देत पाण्याचा वापर करावा, असे आवाहन तायडे यांनी केले.लाभ क्षेत्राबाहेरील शेतकºयांना फायदा होणार!ठिबक व तुषार सिंचनामुळे लाभक्षेत्रातील शेतकºयांना तर याचा फायदा होतच असून, लाभक्षेत्राच्या बाहेरील शेतकºयांचासुद्धा चांगलच फायदा होत असल्याने ओलीत क्षेत्रफळात वाढ होत आहे; परंतु या प्रकल्पाच्या पाण्यावर बिगर सिंचनाचे आरक्षणही वाढले असून, हे असेच चालू राहिल्यास शेती सिंचनाला अपेक्षित पाणी मिळणार की नाही, हा धोका शेतकºयांना वाटत असल्याचे तायडे म्हणाले. जलसंपदा विभागाने याकडे लक्ष केंद्रित करू न सिंचनाचा शेतकरी कोटा कयम ठेवावा, ही शेतकºयांची मागणी आहे.३२ पाणी वापर संस्था काटेपूर्णा प्रकल्पावरील हेड टू टेल एकू ण ३२ पाणी वापर संस्था असून, ८३२५ हेक्टर प्रवाही सिंचनाची मर्यादा आहे. पाणी वापर संस्थांच्या चळवळीतून काटेपूर्णा प्रकल्पावरील पीक पद्धतीत मोठा बदल आणल्यामुळे सिंचनाची पद्धतसुद्धा बदलली आहे. नवीन तंत्रज्ञानाची शेतकºयांनी जोड घेऊन उपसा सिंचन तुषार व ठिबक सिंचनाचा वापर पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून प्रकल्पावर केला जात आहे.

देखभाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, बहादूरपूर शाखा कालवा, वितरिका,लघू कालव्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. इतर कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. सध्या शेतकºयांकडून पाण्याची मागणी नाही. म्हणून प्रतिसेकंद ४० घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. प्रतिसेकंद १२० घनमीटरपर्यंत पाणी सोडण्याची मर्यादा आहे. मागणी बघून निर्णय घेण्यात येईल.- उपविभागीय (अभियंता) अधिकारी,काटेपूर्णा प्रकल्प, उपविभाग, बोरगावमंजू.

 

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प