शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

अकोलेकरांवर जलसंकट : ५.९९ टक्के जलसाठा जुलैपर्यंत पुरणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:51 PM

अकोला: एप्रिलअखेर जिल्ह्यातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठ्यात मागील तीन आठवड्यांत २.५ टक्क्यांनी घट झाली.

ठळक मुद्दे आजमितीस या धरणात केवळ ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.धरणातील जिवंत जलसाठा जुलैपर्यंत पुरणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: एप्रिलअखेर जिल्ह्यातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठ्यात मागील तीन आठवड्यांत २.५ टक्क्यांनी घट झाली. आजमितीस या धरणात केवळ ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. या पाण्यात आठ लाख अकोलेकरांची तहान भागणार कशी, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. दुसरीकडे पाणी पुरवठ्याची कोणतीच सोय नसल्याने शहरातील नागरिकांनी मोर्चे, आंदोलनाला सुरुवात केली. महिलांनी तर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर लोटांगण आंदोलन करू न पाणी प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घातले.अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हे एकमेव मोठे धरण असून, या धरणाच्या पाण्यावर आठ लाख अकोलेकरांची तहान भागविली जाते; पण मागील वर्षी पूरक पाऊस न झाल्याने या धरणात अल्प जलसाठा संचयित झाला. परिणामी, यावर्षी पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.दरम्यान,जानेवारी महिन्याच्या शेवटी काटेपूर्णा धरणात १२.८४ टक्के जलसाठा उपलब्ध होता. फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यात मात्र हा जलसाठा १०.५८ टक्के खाली आला. म्हणजे १० ते १२ दिवसांत दोन टक्केपर्यंत घट झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या धरणात नऊ टक्के जलसाठा शिल्लक होता, तर एप्रिल महिन्याच्या १२ एप्रिल रोजी हा जलसाठा ७.३४ टक्केपर्यंत घटला. २४ एप्रिल रोजी मात्र या धरणात ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. म्हणजेच बारा दिवसांत या जलसाठ्यात २.३५ टक्के घट झाली. ही घट याच वेगाने सुरू राहिल्यास या धरणातील जिवंत जलसाठा जुलैपर्यंत पुरणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- मृत जलसाठा ११ दलघमी!या धरणात ११ दशलक्ष घनमीटर मृत जलसाठा असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अर्ध्यापेक्षा जास्त त्यामध्ये गाळ आहे. त्यामुळे गाळातील पाणी जुलै महिना भागवेल, याबाबतही साशंकता आहे.

- मृतसाठा उपसणार कसा?पाणीटंचाईची भीषणता वाढली असून, जिवंत जलसाठा काही दिवसांचा शिल्लक असताना मृत जलसाठा उपसण्यासाठीची कोणती तयारी प्रशासनाने केली, असा प्रश्न अकोलेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण