शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

रब्बी सिंचनासाठी वान धरणाचे पाणी दोन वेळा मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:34 IST

आमदार प्रकाश  भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्‍यांना रब्बी  सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांसोबत यशस्वी शिष्टाई करून  चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. 

ठळक मुद्देअखेर सिंचनाचा तिढा सुटलाआ. भारसाकळेंच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा (अकोला): रब्बी हंगामामध्ये दरवर्षी वान धरणाचे पाणी सिंचनासाठी  मिळते; परंतु यावर्षी जिल्ह्यातील अन्य धरणांची पाण्याची स्थिती बिकट आहे. वान  वगळता एकही धरण भरले नाही. संपूर्ण जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी वान  धरणातील पाणी आरक्षित केले होते व केवळ एका कालव्याद्वारे एक पाणी  सिंचनासाठी देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्यामुळे, शेतकरी संतप्त झाले  होते. त्यांनी रब्बीसाठी पाणी मिळावे, ही आग्रही भूमिका घेतली. आमदार प्रकाश  भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्‍यांना रब्बी  सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांसोबत यशस्वी शिष्टाई करून  चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. तालुक्यातील वान धरण ‘हनुमान सागर’ म्हणून ओळखले जाते. संकटमोचन  असलेले हनुमान सागर शेतकर्‍यांवरील संकट दूर करण्यासाठी दरवर्षी धावून येत  होते. हनुमान सागरमधील पाण्यावर तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील हजारो हे क्टरवर रब्बी पीक घेतल्या जात होते. यावर्षी तालुक्यासह जिल्ह्यात पर्जन्यमान कमी  झाले. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील वान धरण वगळता उर्वरित धरणामध्ये  जलसाठा अल्प प्रमाणात आहे. परिणामी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण  झाला होता. म्हणून जिल्हा प्रशासनाने वान धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले  होते. रब्बी हंगामासाठी केवळ एका कॅनॉलमधून फक्त एक पाणी सोडण्याचा निर्णय  प्रशासनाने घेतला होता. या निर्णयामुळे ज्या कॅनॉलद्वारे सिंचनासाठी पाणी सोडल्या  जाणार होते, त्यालगत असलेल्या शेतमालकांची संभ्रमावस्था होती. कारण केवळ  एका पाण्यावर हरभर्‍याचे पीक येऊ शकत नाही. तसेच ज्यांच्या शेतालगत  असलेल्या कालव्याद्वारे पाणी योणारच नव्हते त्यांची अवस्था मोठी गंभीर झाली हो ती. ज्यांच्या जमिनी या धरणाच्या पाण्यावर सिंचन करण्याकरिता कालवे खोदण्यात  गेली, त्यांच्यावर हा निर्णय अन्यायकारक होता. तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांवर  अस्मानी संकट आल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आणि  कापूस यापैकी कोणतेच पीक हाती आले नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले  होते. किमान रब्बी पिकासाठी वान धरणातून पाणी मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शे तकरी होते. 

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पTelharaतेल्हाराakotअकोटAkola cityअकोला शहर