शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

रब्बी सिंचनासाठी वान धरणाचे पाणी दोन वेळा मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:34 IST

आमदार प्रकाश  भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्‍यांना रब्बी  सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांसोबत यशस्वी शिष्टाई करून  चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. 

ठळक मुद्देअखेर सिंचनाचा तिढा सुटलाआ. भारसाकळेंच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा (अकोला): रब्बी हंगामामध्ये दरवर्षी वान धरणाचे पाणी सिंचनासाठी  मिळते; परंतु यावर्षी जिल्ह्यातील अन्य धरणांची पाण्याची स्थिती बिकट आहे. वान  वगळता एकही धरण भरले नाही. संपूर्ण जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी वान  धरणातील पाणी आरक्षित केले होते व केवळ एका कालव्याद्वारे एक पाणी  सिंचनासाठी देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्यामुळे, शेतकरी संतप्त झाले  होते. त्यांनी रब्बीसाठी पाणी मिळावे, ही आग्रही भूमिका घेतली. आमदार प्रकाश  भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्‍यांना रब्बी  सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांसोबत यशस्वी शिष्टाई करून  चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. तालुक्यातील वान धरण ‘हनुमान सागर’ म्हणून ओळखले जाते. संकटमोचन  असलेले हनुमान सागर शेतकर्‍यांवरील संकट दूर करण्यासाठी दरवर्षी धावून येत  होते. हनुमान सागरमधील पाण्यावर तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील हजारो हे क्टरवर रब्बी पीक घेतल्या जात होते. यावर्षी तालुक्यासह जिल्ह्यात पर्जन्यमान कमी  झाले. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील वान धरण वगळता उर्वरित धरणामध्ये  जलसाठा अल्प प्रमाणात आहे. परिणामी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण  झाला होता. म्हणून जिल्हा प्रशासनाने वान धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले  होते. रब्बी हंगामासाठी केवळ एका कॅनॉलमधून फक्त एक पाणी सोडण्याचा निर्णय  प्रशासनाने घेतला होता. या निर्णयामुळे ज्या कॅनॉलद्वारे सिंचनासाठी पाणी सोडल्या  जाणार होते, त्यालगत असलेल्या शेतमालकांची संभ्रमावस्था होती. कारण केवळ  एका पाण्यावर हरभर्‍याचे पीक येऊ शकत नाही. तसेच ज्यांच्या शेतालगत  असलेल्या कालव्याद्वारे पाणी योणारच नव्हते त्यांची अवस्था मोठी गंभीर झाली हो ती. ज्यांच्या जमिनी या धरणाच्या पाण्यावर सिंचन करण्याकरिता कालवे खोदण्यात  गेली, त्यांच्यावर हा निर्णय अन्यायकारक होता. तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांवर  अस्मानी संकट आल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आणि  कापूस यापैकी कोणतेच पीक हाती आले नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले  होते. किमान रब्बी पिकासाठी वान धरणातून पाणी मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शे तकरी होते. 

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पTelharaतेल्हाराakotअकोटAkola cityअकोला शहर