शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

वारीच्या धरणातून २० वर्षांपासून गाळाचा उपसाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 3:03 PM

दरवर्षी शंभर टक्के साठा असलेल्या या धरणातील गाळ गेल्या २० वर्षांपासून काढलाच नसल्याचे चित्र आहे.

- सत्यशील सावरकर लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वारी हनुमान सागर धरण हे तालुक्यासह इतरही जिल्ह्यासाठी जलसंजीवनी देणारा प्रकल्प आहे. दरवर्षी शंभर टक्के साठा असलेल्या या धरणातील गाळ गेल्या २० वर्षांपासून काढलाच नसल्याचे चित्र आहे. गाळ न काढल्याने परिसरातील भूजल पातळी वाढली नाही.वारी हनुमान सागर प्रकल्प तालुक्यातील जनतेला सिंचनासाठी मोठा आधार असलेला प्रकल्प आहे. या पाण्यावर सिंचन करून लाभक्षेत्रातील शेतकरी खरिप व रब्बीत चांगले पिके घेतात. या प्रकल्पातील पाण्यावर विद्युत प्रकल्पसुद्धा चालतो, त्यामुळे परिसरातील जनतेच्या नजरा या धरणातील जलसाठ्याकडे असतात. उन्हाळ्यात सर्वत्र भीषण दुष्काळ पडला आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावली आहे. बहुतांश बोअरवेल कोरडे पडले आहेत. बागायती शेती कोरडवाहू होत आहे. एकूणच परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, असे असताना वारी येथील हनुमान सागर प्रकल्प हा दोन जिल्ह्यातील लाखो लोकांची तहान भागवित आहे. सोबतच हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली असते, त्यामुळे या धरणातील जलसाठ्याकडे सर्वांचे लक्ष असते; परंतु या ठिकाणी भूजल पातळीत सुरुवातीला वाढ दिसली. त्यानंतर परिसरातील भूजल पातळीत वाढ दिसत नसल्याचे दिसत आहे. जेथे मोठे धरण आहे, त्या परिसरात भूजल पातळी चांगली राहते; परंतु वान प्रकल्प वीस वर्षांपासून कार्यरत असून, या परिसरात भूजल पातळीत वाढ होण्याऐवजी सतत खालावत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गत वीस वर्षात धरणातून गाळ काढला नसल्याने पाणी मुरण्याच्या प्रमाणात घट होत असल्याने भूजल पातळीत वाढ होताना दिसत नाही. परिणामी, परिसरात बागायती शेती कमी होत आहे. एकीकडे धरणातील गाळ काढण्यासाठी गाळमुक्त धरण, ही महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाची असली तरी हनुमान सागर प्रकल्पातील गाळ काढण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे.हनुमान सागर प्रकल्पाचा जलाशय परिसर हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने व गाळ काढण्याकरिता वन विभागाच्या परवानगीची गरज आहे. मागील वर्षी वान प्रकल्प अभियंत्यांनी त्याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपवन संरक्षकांकडे धरणातील गाळ काढण्याबाबत लेखी पत्राद्वारे परवानगी मागितली होती. विशेष म्हणजे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पत्राला कोणतेच उत्तर दिले नसल्याचे समजते आणि अजूनपर्यंत परवानगीही दिली नसल्याचे समजते. याबाबत ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी होत आहे.

वान प्रकल्पाच्या सभोवताली व्याघ्र प्रकल्पाची वन जमीन असल्यामुळे या कार्यालयामार्फत आम्ही सुजलाम सुफलाम योजने अंतर्गत वन विभागाला गाळ काढण्याबाबत परवानगी मागितली होती, ती अद्याप मिळालेली नाही.अ. प्र. गुल्हाने,सहायक अभियंता श्रेणी-१वान प्रकल्प, तेल्हारा.

भूजल पातळी खालावत असतानाही शासनाची गाळमुक्त धरण योजना कागदावरच आहे. वीस वर्षांपासून प्रलंबित हनुमान सागर प्रकल्पातील गाळ तत्काळ काढण्यात यावा.- संतोष बजाज

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराWan Projectवान प्रकल्प