शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
3
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
4
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
5
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
6
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
7
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
8
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
9
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
10
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
11
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
12
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
13
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
14
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
15
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
16
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
17
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
18
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
19
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
20
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 

दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: July 3, 2017 01:36 IST

समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त, बोरगाव वैराळे परिसरातील खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे शेतात पेरले असून, समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे पेरणी केलेले बियाणे उगवते किंवा नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडला आहे.मागील पाच वर्षांत कधी कमी पावसामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात आलेले पीक अपेक्षित उत्पन्न देऊ शकले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तरीही यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हिंमत करून मृग नक्षत्रात खरिपाच्या कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, उडीद या पिकाची पेरणी केली; मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. बोरगाव वैराळे परिसरात खरिपाची ८० टक्के पेरणी आटोपली असून, येत्या दोन दिवसांत १०० टक्के पेरण्या आटोपण्याची शक्यता आहे; मात्र या पेरण्या झाल्यानंतर जर आठवडाभरात पाऊस आला नाही, तर ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. सतत चार वर्षांपासून प्रत्येक संकटाला तोंड देता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांना महागडे बियाणे, रासायनिक खते उसनवारी करून आणावी लागतात. त्यामुळे पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आगर: दुबार पेरणीचे संकटमृग नक्षत्राच्या आगमनानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामी पेरण्या खोळंबल्या असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, अशा सर्वच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पडलेल्या दमदार पावसाने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीस सुरुवात करून मूग, सोयाबीन, उडीद आदी पिकांची पेरणी केली; पण पाऊस थांबल्याने उर्वरित पेरण्या थांबवून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे. चालू आठवड्यात पाऊस न आल्यास खरीप हंगामातील सर्वच पिकातील उत्पन्न घटणार असल्याची भीती व्यक्त होत असून, शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. सौंदळा परिसरात पाण्याची पातळी खालावलीसौंदळा परिसरातील शेतकऱ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पेरणी केली आहे. यापैकी ६० टक्के क्षेत्रात कपाशीची पेरणी केली असल्यामुळे यावर्षी सर्वात जास्त पेरा कपाशी पिकाचा झाला आहे. या मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही पावसाची आस लागली आहे. या परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून, ट्युबवेलमधील पाण्याची पातळीदेखील खोल गेलेली आहे. पाऊस लांबल्याने स्प्रिंकलरद्वारे पिकांना अहोरात्र पाणी देणे सुरू आहे. काही शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू असल्याने या शेतकऱ्यांना पावसाची नितांत गरज भासत आहे. सर्व शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून, पाऊस केव्हा बरसेल, याची वाट ते चातकासारखी पाहत आहेत.माना परिसरात पेरणीस सुरुवातयावर्षी हवामान खात्याने दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्याने बळीराजा आनंदात आहे. मागील दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात आलेल्या पावसामुळे माना परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग पेरणीस सुरुवात केली. यावर्षी मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने पेरण्या आटोपल्या; पण मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे मातीतच करपले आहे. काही ठिकाणी ओलावा असलेल्या जमिनीतील बियाण्यांना मोड येऊन ते सडले. कोरडवाहू जमिनीतील बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर होते. अशातच मागील दोन दिवसांत थोडाफार पाऊस पडल्याने माना परिसरातील शेतकरी सुखावला असून, मजूर पेरणी, वेचणी व वाही पेरी करण्याच्या कामात लागला आहे.