शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: July 3, 2017 01:36 IST

समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त, बोरगाव वैराळे परिसरातील खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे शेतात पेरले असून, समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे पेरणी केलेले बियाणे उगवते किंवा नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडला आहे.मागील पाच वर्षांत कधी कमी पावसामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात आलेले पीक अपेक्षित उत्पन्न देऊ शकले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तरीही यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हिंमत करून मृग नक्षत्रात खरिपाच्या कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, उडीद या पिकाची पेरणी केली; मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. बोरगाव वैराळे परिसरात खरिपाची ८० टक्के पेरणी आटोपली असून, येत्या दोन दिवसांत १०० टक्के पेरण्या आटोपण्याची शक्यता आहे; मात्र या पेरण्या झाल्यानंतर जर आठवडाभरात पाऊस आला नाही, तर ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. सतत चार वर्षांपासून प्रत्येक संकटाला तोंड देता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांना महागडे बियाणे, रासायनिक खते उसनवारी करून आणावी लागतात. त्यामुळे पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आगर: दुबार पेरणीचे संकटमृग नक्षत्राच्या आगमनानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामी पेरण्या खोळंबल्या असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, अशा सर्वच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पडलेल्या दमदार पावसाने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीस सुरुवात करून मूग, सोयाबीन, उडीद आदी पिकांची पेरणी केली; पण पाऊस थांबल्याने उर्वरित पेरण्या थांबवून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे. चालू आठवड्यात पाऊस न आल्यास खरीप हंगामातील सर्वच पिकातील उत्पन्न घटणार असल्याची भीती व्यक्त होत असून, शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. सौंदळा परिसरात पाण्याची पातळी खालावलीसौंदळा परिसरातील शेतकऱ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पेरणी केली आहे. यापैकी ६० टक्के क्षेत्रात कपाशीची पेरणी केली असल्यामुळे यावर्षी सर्वात जास्त पेरा कपाशी पिकाचा झाला आहे. या मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही पावसाची आस लागली आहे. या परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून, ट्युबवेलमधील पाण्याची पातळीदेखील खोल गेलेली आहे. पाऊस लांबल्याने स्प्रिंकलरद्वारे पिकांना अहोरात्र पाणी देणे सुरू आहे. काही शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू असल्याने या शेतकऱ्यांना पावसाची नितांत गरज भासत आहे. सर्व शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून, पाऊस केव्हा बरसेल, याची वाट ते चातकासारखी पाहत आहेत.माना परिसरात पेरणीस सुरुवातयावर्षी हवामान खात्याने दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्याने बळीराजा आनंदात आहे. मागील दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात आलेल्या पावसामुळे माना परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग पेरणीस सुरुवात केली. यावर्षी मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने पेरण्या आटोपल्या; पण मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे मातीतच करपले आहे. काही ठिकाणी ओलावा असलेल्या जमिनीतील बियाण्यांना मोड येऊन ते सडले. कोरडवाहू जमिनीतील बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर होते. अशातच मागील दोन दिवसांत थोडाफार पाऊस पडल्याने माना परिसरातील शेतकरी सुखावला असून, मजूर पेरणी, वेचणी व वाही पेरी करण्याच्या कामात लागला आहे.