शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

लोकांच्या मनाचा ठाव घेणारा कवी  डॉ. विठ्ठल वाघ - संजय धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 19:43 IST

तुकडोजी महाराजांचा वसा घेऊन चालणारा कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा सत्कार आपल्या हातून होणे हे भाग्यच, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.

अकोला : शेतकऱ्यांच्या व्यथा समाजापर्यंत पोहोचविणारा, समाजप्रबोधन करणारा अन् लोकांच्या मनाचा वेध घेणारा कवी म्हणजेच डॉ. विठ्ठल वाघ आहेत. समाजसुधारक तसेच गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांचा वसा घेऊन चालणारा कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा सत्कार आपल्या हातून होणे हे भाग्यच, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.शिवाजी महाविद्यालय येथे रविवारी आजोजित लोककवी डॉ. विठ्ठल वाघ अमृत महोत्सव सोहळ््याच्या उद््घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी सत्कारमूर्ती लोककवी डॉ. विठ्ठल वाघ, प्रतिभाताई वाघ, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, आयोजन समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, स्वागताध्यक्ष प्रा. तुकाराम बिरकड, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय नरेशचंद्र ठाकरे, महापौर अर्चना मसने, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गजानन पुंडकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य केशवराज मेतकर, रामचंद्र शेळके, हेमंतजी काळमेघ, शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक केशव गावंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अपराजित यांनी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या साहित्यावर विश्लेषण करत, वºहाडी भाषेला सातासमुद्रापार नेणारे महाराष्ट्रातील एकमेव कवी असल्याचे सांगितले. तसेच ‘सूर्य-चंद्र जरी आले हाती विसरू नको माती’ याप्रमाणे डॉ. विठ्ठल वाघ हे आपल्यावरचं नातं जपून आहेत. कळवळीतून शब्द मांडणारा कवी म्हणजे डॉ. विठ्ठल वाघ असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. यानंतर सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजदत्त यांनी डॉ. वाघ यांच्याशी असलेलं नातं अन् त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. विठ्ठल वाघ यांच्या बोलण्यातून बाण निघतात, फटाके फुटतात तसेच त्यांच्यातील कवितेमधून शेतकऱ्यांबद्दल या मातीत सामान्य शेतमुजराबद्दल कळवळादेखील दिसून येत असल्याचे मत राजदत्त यांनी व्यक्त केले. संचालन धनंजय मिश्रा आणि आभार प्रदर्शन श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी मानले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे