शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

vidhan sabha 2019 : राजकीय पक्ष सज्ज; जिल्हाध्यक्ष म्हणतात, आदेशाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:19 IST

पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून, मतदार याद्यांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र समोर आले आहे.

अकोला: विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच, जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. पक्ष कार्यालयांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून, मतदार याद्यांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी शिवसेना व भाजपमधील युतीचे घोडे अद्यापही गंगेत न्हाले नसल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसून येत आहे. आजच्या घडीला सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे लक्ष नेत्यांच्या आदेशाकडे लागले आहे.विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, राजकीय मोर्चेबांधणीसाठी विविध पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सरसावले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यामुळे उमेदवारी अर्ज सादर करण्याची तारीख समजताच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते, पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला मूर्तिजापूर मतदारसंघ जाणार, हे निश्चित असले तरी आज रोजी बाळापूर आणि अकोला पश्चिमसाठी दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेनेची युती होणारच, असा दावा दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून केला जात असला तरी जागा वाटपाच्या मुद्यावरून ऐनवेळी या दोन्ही पक्षांत कधी बिनसणार, याची काहीही शाश्वती नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे भाजप-सेनेच्या गोटातून पाचही विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची तयारी केली जात असल्याचे चित्र तूर्तास समोर आले आहे.‘वंचित’मुळे बिघडणार राजकीय समीकरणे!जिल्ह्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव आहे. अ‍ॅड. आंबेडकर यांनी काँग्रेस-राकाँला टाळी न देता स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणुकीत रंगत येईल, हे निश्चित. यादरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रतिकूल परिणाम होईल, असे दिसत आहे.राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष प्रतिक्रियालोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. आमची बुथ रचना मजबूत असून, निवडणूक संचालन समिती फार पूर्वीच कामाला लागली आहे. आम्ही पाचही विधानसभा मतदारसंघांत कामाला लागलो आहोत. कार्यकर्ता, बुथ प्रमुख, पक्षप्रमुख आमची शक्तीस्थळे असून, २५ सप्टेंबरपासून मुख्यमंत्र्यांचे पत्र घरा-घरांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहे.-तेजराव थोरात, जिल्हाध्यक्ष भाजप.शिवसेनेने तीन वर्षांपूर्वीपासूनच पाचही विधानसभा मतदारसंघांत बुथ प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांची मजबूत बांधणी केली आहे. बुथ प्रमुखांना केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची प्रतीक्षा असून, तो प्राप्त होताच सर्व कामाला लागतील.-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना.राष्ट्रवादीच्या वाट्याला जिल्ह्यातून दोन मतदारसंघ येतील. त्यापैकी मूर्तिजापूर मतदारसंघात मजबूत बांधणी केली आहे. उर्वरित एका मतदारसंघावर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांकडून निर्णय घेतला जाईल. आघाडी असल्यामुळे पाचही मतदारसंघांत पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत.-संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने जिल्हाभरात बुथ कमिट्यांचे गठन करून कार्यकर्त्यांना सक्रीय केले आहे. महागाई, बेरोजगारी यांसह शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचे पैसे मिळाले नसल्याचे चित्र आहे. पीक विम्याचे पैसे खात्यात जमा झालेच नाहीत. भाजप सरकारने कापूस आयात करण्याचे धोरण आखले आहे. त्याचा स्थानिक कापूस उत्पादक शेतकºयांवर नक्कीच परिणाम होईल. या सर्व बाबी जनतेने लक्षात घेणे अपेक्षित आहे. यंदा जिल्ह्यात बदल होण्याची अपेक्षा आहे.-हिदायत पटेल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पाच विधानसभा मतदारसंघांत मजबूत, सक्षम आणि प्रभावी उमेदवार रिंगणात उभे केल्या जातील. त्यादृष्टीने आमची संपूर्ण तयारी झाली आहे. बुथ प्रमुख सक्रिय झाले असून, या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ते उत्साहित आहेत. ‘साहेबां’च्या आदेशाची प्रतीक्षा आहे.-प्रमोद देंडवे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस